शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद

By admin | Updated: September 2, 2015 04:22 IST

इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी

नागपूर : इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी असणे ही ओळख नाही तर आपल्या मातृभाषेतून होणारे आकलन, त्याची संस्कृती संबद्धता, उच्चार आणि भाषा, संस्कृती आणि कला यांच्या वैशिष्ट्यपूर्णतेतून स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद. हा देशीवाद विशिष्ट प्रदेश, भाषेच्या लोकांना समृद्ध करणारा आणि त्यांची ओळख जपणारा असतो, असे मत मराठी सल्लागार समिती, साहित्य अकादमीचे संयोजक ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि गिरीश गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशीवाद आणि मराठी कादंबरी’ विषयावरील द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हा कार्यक्रम श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेश देवी होते. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, मराठी सल्लागार समितीचे सदस्य रंगनाथ पठारे, डॉ. अक्षयकुमार काळे, विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख शैलेंद्र लेंडे उपस्थित होते. नेमाडे म्हणाले, आपल्याला भाषेतून आणि संस्कृतीतून होणारे आकलन महत्त्वाचे आहे. कुचिपुडी, यक्षगान, ओडिसी, धराधरी नृत्याची परंपरा निर्माण करणारी मोठी माणसे त्या-त्या प्रदेशात झाली. महाराष्ट्रात तमाशाला आपण स्थान देऊ शकलो नाही. दशावतारात प्रत्येक अवताराने कुणीतरी पळवून नेलेले पुन्हा परत आणले. त्यानंतर जे हरविले ते परत आणणारा अकरावा अवतार झाला नाही. वाङ्मय प्रकारात, तत्त्वज्ञानात किंवा सामाजिक शास्त्रात विज्ञानासारखी प्रयोगसिद्धता करता येत नाही पण त्याची सत्यता विचारांती पटते. म. गांधींनी मॅन्टेस्टर कंपनीविरोधात चरख्याची चळवळ राबविली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. यानंतर कंपनीला त्यांची चूक कळली कारण म. गांधी द्रष्टे होते. हल्ली आधुनिक होण्याच्या नादात लोक उपभोगी आणि चंगळवादी होत आहेत पण हे सारेच आपले नाही. ते बाजारीकरणाने आपल्यावर लादले गेले आहे. भाषेला पडणारे प्रश्न मांडणे हे साहित्याचे काम आहे. त्याची उत्तरे पुढची पिढी शोधत राहते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे - गणेश देवी १९ व्या शतकात उदारीकरणाच्या सपाट्यात परंपरा वाईट आणि जुनाट असल्याचे वारे वाहिले. आधुनिकता म्हणजे चंगळवाद, उपभोग असा विचार लादला गेला आणि लोकांचे विचार व आवडीनिवडी बदलण्याचाच प्रयत्न झाला. यात दिग्भ्रमितता वाढली. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषांमध्ये भूतकाळ दर्शविणाऱ्या वाक्यांची विविधता नष्ट होते आहे. भाषेतून भूतकाळ समर्थपणे सांगता येत नाही आणि स्मरणसंचित सांभाळण्यात भाषा अपयशी ठरते तेव्हा ती मृतप्राय होते. भाषिक व्यवहार ठप्प पडले की त्या भाषेत जगणे कठीण होते आणि लोक जगण्यासाठी इतर भाषा आत्मसात करतात. त्यामुळेच भाषेला भूतकाळ सांभाळता आला पाहिजे, असे गणेशदेवी म्हणाले. परकीय आक्रमणानंतर वसाहतवादातून आलेले साहित्य असा समज झाला आणि दुसरीकडे राष्ट्र या संकल्पनेची निर्मिती या दोन जखमा झाल्या. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती ही कल्पना युरोपात आली. त्याप्रमाणेच भारतातही एक भाषा लादण्याचा प्रयत्न झाला पण अखेर १४ भारतीय भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करावे लागले. वसाहतवादाचे साहित्य आणि राष्ट्र संकल्पनेच्या या दोन जखमातून बाहेर पडल्याशिवाय आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही. हा शोध सुरूच राहील, असे ते म्हणाले. रंगनाथ पठारे यांनी बीजभाषणातून देशीवाद आणि काही आव्हानांचा उहापोह करताना संपूर्ण चर्चेचे आयाम काय असू शकतात, याचे सूतोवाच केले. देशीवाद आधुनिकीकरणाला विरोध करणारा नाही पण देशी स्वरूप आत्मसात करणारा असावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक अक्षयकुमार काळे, स्वागतभाषण कृष्णा किंबहुने आणि संचालन कोमल ठाकरे यांनी केले. आभार शैलेंद्र लेंडे यांनी मानले. चर्चासत्रापूर्वी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी गिरीश गांधी, प्रमोद मुनघाटे, श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.