शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद

By admin | Updated: September 2, 2015 04:22 IST

इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी

नागपूर : इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी असणे ही ओळख नाही तर आपल्या मातृभाषेतून होणारे आकलन, त्याची संस्कृती संबद्धता, उच्चार आणि भाषा, संस्कृती आणि कला यांच्या वैशिष्ट्यपूर्णतेतून स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद. हा देशीवाद विशिष्ट प्रदेश, भाषेच्या लोकांना समृद्ध करणारा आणि त्यांची ओळख जपणारा असतो, असे मत मराठी सल्लागार समिती, साहित्य अकादमीचे संयोजक ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि गिरीश गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशीवाद आणि मराठी कादंबरी’ विषयावरील द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हा कार्यक्रम श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेश देवी होते. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, मराठी सल्लागार समितीचे सदस्य रंगनाथ पठारे, डॉ. अक्षयकुमार काळे, विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख शैलेंद्र लेंडे उपस्थित होते. नेमाडे म्हणाले, आपल्याला भाषेतून आणि संस्कृतीतून होणारे आकलन महत्त्वाचे आहे. कुचिपुडी, यक्षगान, ओडिसी, धराधरी नृत्याची परंपरा निर्माण करणारी मोठी माणसे त्या-त्या प्रदेशात झाली. महाराष्ट्रात तमाशाला आपण स्थान देऊ शकलो नाही. दशावतारात प्रत्येक अवताराने कुणीतरी पळवून नेलेले पुन्हा परत आणले. त्यानंतर जे हरविले ते परत आणणारा अकरावा अवतार झाला नाही. वाङ्मय प्रकारात, तत्त्वज्ञानात किंवा सामाजिक शास्त्रात विज्ञानासारखी प्रयोगसिद्धता करता येत नाही पण त्याची सत्यता विचारांती पटते. म. गांधींनी मॅन्टेस्टर कंपनीविरोधात चरख्याची चळवळ राबविली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. यानंतर कंपनीला त्यांची चूक कळली कारण म. गांधी द्रष्टे होते. हल्ली आधुनिक होण्याच्या नादात लोक उपभोगी आणि चंगळवादी होत आहेत पण हे सारेच आपले नाही. ते बाजारीकरणाने आपल्यावर लादले गेले आहे. भाषेला पडणारे प्रश्न मांडणे हे साहित्याचे काम आहे. त्याची उत्तरे पुढची पिढी शोधत राहते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे - गणेश देवी १९ व्या शतकात उदारीकरणाच्या सपाट्यात परंपरा वाईट आणि जुनाट असल्याचे वारे वाहिले. आधुनिकता म्हणजे चंगळवाद, उपभोग असा विचार लादला गेला आणि लोकांचे विचार व आवडीनिवडी बदलण्याचाच प्रयत्न झाला. यात दिग्भ्रमितता वाढली. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषांमध्ये भूतकाळ दर्शविणाऱ्या वाक्यांची विविधता नष्ट होते आहे. भाषेतून भूतकाळ समर्थपणे सांगता येत नाही आणि स्मरणसंचित सांभाळण्यात भाषा अपयशी ठरते तेव्हा ती मृतप्राय होते. भाषिक व्यवहार ठप्प पडले की त्या भाषेत जगणे कठीण होते आणि लोक जगण्यासाठी इतर भाषा आत्मसात करतात. त्यामुळेच भाषेला भूतकाळ सांभाळता आला पाहिजे, असे गणेशदेवी म्हणाले. परकीय आक्रमणानंतर वसाहतवादातून आलेले साहित्य असा समज झाला आणि दुसरीकडे राष्ट्र या संकल्पनेची निर्मिती या दोन जखमा झाल्या. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती ही कल्पना युरोपात आली. त्याप्रमाणेच भारतातही एक भाषा लादण्याचा प्रयत्न झाला पण अखेर १४ भारतीय भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करावे लागले. वसाहतवादाचे साहित्य आणि राष्ट्र संकल्पनेच्या या दोन जखमातून बाहेर पडल्याशिवाय आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही. हा शोध सुरूच राहील, असे ते म्हणाले. रंगनाथ पठारे यांनी बीजभाषणातून देशीवाद आणि काही आव्हानांचा उहापोह करताना संपूर्ण चर्चेचे आयाम काय असू शकतात, याचे सूतोवाच केले. देशीवाद आधुनिकीकरणाला विरोध करणारा नाही पण देशी स्वरूप आत्मसात करणारा असावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक अक्षयकुमार काळे, स्वागतभाषण कृष्णा किंबहुने आणि संचालन कोमल ठाकरे यांनी केले. आभार शैलेंद्र लेंडे यांनी मानले. चर्चासत्रापूर्वी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी गिरीश गांधी, प्रमोद मुनघाटे, श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.