शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आहार आणि आरोग्याचे महत्त्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST

आपले ५० टक्के शरीर हे प्रोटिन्सनीच बनलेले आहे. संपूर्ण आयुष्याची मदारच त्यावर अवलंबून असते. हे प्रोटिन्स आपल्याला डाळी, दूध, ...

आपले ५० टक्के शरीर हे प्रोटिन्सनीच बनलेले आहे. संपूर्ण आयुष्याची मदारच त्यावर अवलंबून असते. हे प्रोटिन्स आपल्याला डाळी, दूध, दही, अंडी, मासे, तेलबिया, सुकामेवा यातून मिळते. प्रोटिन्सची गरज मनुष्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत दर तीन तासांनी असते. प्रत्येकवेळी ८ ते ९ ग्रॅम इतकी, म्हणूनच अनेकजण कामावर, ऑफिसमध्ये, शाळेत डबा नेतात. त्यात नुसत्या भाजीपोळीबरोबर पिठलं, बेसन, डाळ नाहीतर पनीर असणं महत्त्वाचं. जोडीला काकडी, टमाटर, गाजर, मुळा न्यावा, दिवसभरात दोन ते तीन वाट्या वरण प्रत्येकाने दोन वेळच्या जेवणातून खावे. एकाचवेळी नव्हे. खाद्यपदार्थांना बेसन, शेंगदाणे, डाळी, दूध, दही, पनीरची जोड असावी. प्रोटीन हा महागडा प्रकार आहे, पण बालकांच्या वाढीच्या वयात, किशोरवयात मुलींना, गर्भावस्थेत, स्तनदा मातेला त्याची गरज अधिक असते. आजारपण, ऑपरेशन, अपघात, जखम भरण्यासाठी वगैरे सर्व अवस्थांमध्ये प्रोटीन्सची गरज वाढते.

खेळाडू, कामकरी, शेतकरी, मजुरांना प्रोटीन्सची गरज जास्त असते. घामावाटे १५ टक्के प्रोटीन्स जातात. वातावरणातील बदल, प्रदूषण, कशाचा शॉक बसणे, यात प्रोटीन्सची गरज वाढते. वय झाल्यावरही मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी प्रोटीन्सची अधिक गरज असते. तर शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, पचनेंद्रियात उपयुक्त रसांची निर्मिती करण्यासाठी, हार्मोन्स, एन्झाईम्स, रक्त मांसपेशींच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी प्रोटीन्स अत्यावश्यक आहे. रोज आपल्याला ५० ते ६० ग्रॅम प्रोटीन्स खायला हवे. एक वाटी वरण खाण्याने ६ ते ७ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. म्हणून आहारात वरणासोबतच शेंगदाणे, तीळ, बेसन, फुटाणे, दूध, दही, ताक भरपूर हवेत.

प्रोटीन्सचे कुपोषण सर्वदूर आढळते. पाच वर्षांपर्यंतच्या बालकात, खेडी, आदिवासी भाग मेळघाटात यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. ही फार चिंतेची बाब आहे. प्रोटीन्स म्हणजे डाळी, दूध, दही, अंडी, मासे सर्व महाग असते. डाळीला शिजायलाही वेळ लागतो. कामकरी महिलांना एवढा वेळ नसतो. खेड्यापाड्यात डाळ करतच नाहीत. म्हणून बालकांचे, मुलींचे वजन फार कमी असते. स्त्रिया कृश आणि अ‍ॅनिमिकच आढळतात. १५ ते २० कॅलरीज यापासून मिळायला हव्यात.

प्रोटीन्सची कार्यक्षमता इतर आहार घटकांवर अवलंबून असते. विशेषकरून अ जीवनसत्त्वावर. म्हणून जेवणात भरपूर हिरव्या नारिंगी भाज्या, फळे असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मिश्र पद्धतीचा वापर केल्यास चांगल्या दर्जाची प्रोटीन्स मिळतात. जसे थालीपीठ, इडली, दोसा, मेतकूट, धिरडी, ढोकळा, डाळभाजी व आहारात शेंगदाणे, तीळ, खसखस, खोबरे, मेथीदाणे, सोप, ओवा, जिरे, धण्याचा भरपूर वापर करावा.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. हे मुख्यत्वे धान्यातून, फळे, साखर यातून मिळतात. आहारात धान्याचे प्रमाण सर्वात अधिक असते. त्यापासून मुख्यत्वे ऊर्जा म्हणजेच शक्ती मिळते. ६० ते ७० टक्के कॅलरीज यापासून मिळणे जरुरीचे असते. गर्भावस्थेत याचे प्रमाण फार कमी होणे हे धोक्याचे असते. हे धान्ये डाळी, साखर, फळे, मैदा, बेड यातून मिळतात. यापासून पोट भरल्याचे समाधान मिळते. कार्बोहायड्रेट्स जीवनसत्त्व ब, कॅल्शियमच्या आणि अन्य क्षारांच्या शोषणासाठी आवश्यक असतात. यांचे खूप जास्त सेवन केल्याने चरबी वाढते. साखर, मैदा यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. प्रक्रिया केलेले धान्य जसे मैदा, पॉलिश केलेला तांदूळ खाऊ नये. ज्या खाद्यपदार्थात एकही जीवनसत्त्व अथवा क्षार नसतात ते आपलं पोषण करीत नाहीत. त्यांनाच जंक फूड म्हणतात. सर्व धान्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, सर्व फळांचा आपल्या आहारात ऋतुमानानुसार समावेश करावा. फळांची साले काढू नये किंवा त्यांचा नुसता रस घेऊ नये. साखरेऐवजी गूळ, मध खावा.

तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्निग्ध पदार्थ. ते तेल, तूप, लोणी, वनस्पती तेलबिया यातून मिळतात आणि शरीराला आवश्यक असतात. आपल्या पेशींच्या आवरणात तेलातील घटक असतो. मेंदूच्या पेशींसाठीही तो आवश्यक असतो. तेलात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स असतात. जीवनसत्त्व अ, ड, ई, क करिता आहारात तेल, तूप असणे आवश्यक आहे. तेल घाणीचे असल्यास उत्तम. नाहीतर गाळलेले असावे, पण रिफाईण्ड नको. रिफाईनिंगच्या प्रक्रियेत तेलातील चांगले क्षार, जीवनसत्त्वे नष्ट होतात. आपल्या संपूर्ण दिवसभरात तीन ते चार चमचे तेल आणि तूप खायला हवे.