शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

निगरगट्ट प्रशासनासमोर काम कसे करायचे?

By admin | Updated: October 31, 2014 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीतील प्रश्नोत्तरांचा कालावधी चांगलाच वादळी ठरला. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.आर.जी.भोयर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कामचलावू

नागपूर विद्यापीठ : भोयर यांनी काढले अधिकाऱ्यांचे वाभाडेनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीतील प्रश्नोत्तरांचा कालावधी चांगलाच वादळी ठरला. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.आर.जी.भोयर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कामचलावू धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. वेगवेगळ््या सदस्यांसोबत निरनिराळी भूमिका घेणाऱ्या प्रशासनाकडून बहुतेक वेळा दिशाभूल करण्यात येते. अशा निगरगट्ट प्रशासनासोबत काम करण्यापेक्षा राजीनामा देणे चांगले या शब्दांत भोयर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांचे अक्षरश: वाभाडे काढले.गुरुवारी झालेल्या विधिसभेच्या बैठकीत सदस्यांचा फारसा उत्साह दिसून येणार नाही असे अंदाज विद्यापीठातील अधिकारांनी बोलून दाखविला होता. परंतु नेमके उलटे घडले. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणासंदर्भात अनेक सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाने २४ जुलै २०१४ रोजी अधिसूचना काढून महाविद्यालयांना १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र मागितले होते. हे हमीपत्र महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे का असा प्रश्न डॉ.आर.जी.भोयर यांनी उपस्थित केला होता. यावर विद्यापीठ प्रशासनाने नाही असे एका शब्दात उत्तर दिले. प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबत बीसीयुडीने काढलेल्या हमीपत्रात महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारची बाजू मांडू देण्यात येत नाही. तेव्हा या हमीपत्रातील शेवटला मजकूर रद्द करण्याची मागणी डॉ. भोयर यांनी केली. यावर प्रशासनाकडून बेजबाबदार उत्तर मिळाल्यामुळे भोयर संतप्त झाले.मी विचारलेले दोन प्रश्न नियमांच्या चौकटीत बसत नसल्याचे कारण देत प्रशासनाने नामंजूर केले. गेल्या ३० वर्षांपासून नियमांत राहूनच प्रश्न विचारत आहे. नेहमी विद्यापीठाला सहकार्य केले. परंतु विद्यापीठाने ज्याप्रकारे वागणूक दिली ती अपमानजनक आहे. प्रशासनाकडे प्रश्न विचारल्यावर कायद्यावर बोट ठेवून एकीकडे लपवाछपवी करण्यात येते. प्रक्रिया सुरू आहे असे नेहमीच उत्तर देऊन दिशाभूल करण्यात येते. विद्यापीठातील अधिकारी केवळ एसीमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेतात. कामाशी त्यांना काही घेणेदेणेच नाही. अशा अधिकाऱ्यांना ‘पगार लठ्ठ, अधिकारी मठ्ठ’ असेच म्हणायचे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.एकाच प्रश्नावर कधी विद्यापीठ चार ओळीची माहिती देते, तर कधी कायद्याचा आधार घेत, ती माहिती देण्यात येत नसल्याचे सांगते. एखाद्या दुसऱ्या सदस्याने संबंधित माहिती विचारली तर त्याला माहिती देण्यात येते. ही बाब आकलनाच्या बाहेरची आहे, असे भोयर म्हणाले.समन्वयाच्या बाबतीत तर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘आनंदीआनंद’च आहे. वेळेच्या आत माहिती देण्यासाठी ठोस प्रयत्न दिसून येत नाही. कामच करायचे नाही अशा निगरगट्ट प्र्रशासनासोबत काम करण्याची इच्छाच नसून राजीनामा देणे योग्य राहील. यानंतर विधीसभेच्या बैठकीत कधीच येणार नाही, या शब्दांत त्यांनी संतापाला मोकळी वाट करून दिली. भोयर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनासोबत सदस्यदेखील हादरले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रभारी कुलगुरुंनी या दिरंगाईबाबत खंत व्यक्त केली व यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)विधिसभेत बाहेरची व्यक्ती कशी?विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. निरनिराळ्या आंदोलनांचे मागील अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून विधीसभेच्या बैठकीदरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवण्यात येते. शिवाय विद्यापीठाची प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येतात. गुरुवारी पूर्ण काळजी घेण्यात आली होती. परंतु विधीसभेची बैठक सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी चक्क सभागृहात शिरला. ‘वंदे मातरम्’ सुरू असताना आत आलेल्या या पदाधिकाऱ्याला कुणीही अडवले नाही. या पदाधिकाऱ्याने विधीसभेच्या सदस्याशी काही मिनिटे चर्चा केली व त्यानंतर तो बाहेर पडला. परंतु प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. फडणवीस यांचे अभिनंदनशुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे विधीसभेने अभिनंदन केले. कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. फडणवीस यांनी विधीसभेत नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलून धरले. राज्याची धुरा सांभाळताना ते जनतेच्या समस्यांना दूर करण्यासाठी तत्परता दाखवतीलच, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्यासोबतच आमदार सुनील केदार, पंकज भोयर यांचेदेखील अभिनंदन करण्यात आले. तर सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक चळवळीतील प्रबुद्ध नेतृत्व राहिलेले माजी आमदार नेताजी राजगडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.