शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

सहा आठवड्यांत कशी पूर्ण करणार अकरावीची प्रवेशप्रक्रिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूरसह राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून करण्यात येते. समितीला प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पार पाडताना किमान तीन महिनांचा कालावधी लागतो. न्यायालयाच्या सहा आठवड्यांच्या आदेशामुळे केंद्रीय प्रवेश समितीपुढे पेच निर्माण झाला आहे.

नागपूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. गेल्या सत्रात अकरावीच्या प्रवेशप्रकियेला ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली होती व शेवटचा प्रवेश मार्च २०२१ मध्ये पार पडला होता. यंदाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रकियेचा टाइमटेबल घोषित केला आहे. त्यानुसार ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन भाग-१ फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून फॉर्म-बी भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येते. त्यावर विद्यार्थी पालकांकडून आक्षेप मागविण्यात येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. लगेच पहिला राउंड सुरू होईल. फॉर्म-बीपासून तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला किमान महिनाभर लागतो. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. आखणी दोन विशेष फेऱ्या घेतल्या जातात. त्यातही प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रक्रिया सुरूच असते. असा किमान तीन महिन्याचा कालावधी प्रवेशप्रक्रियेला लागतो. त्यामुळे दीड महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पाडणे समितीला शक्य नसल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

- केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दीड महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्यच नाही. समितीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. शाळा व प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अडकून पडते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पालकांचा मनस्ताप वेगळा होतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर मुख्याध्यापक, प्राचार्यालाच अधिकार द्यायला हवे. पूर्वी २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हायची.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

- केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाचा गेल्या चार वर्षांचा आढावा घेतला असता, सातत्याने अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी शहरातील ४० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया नकोच.

डॉ. जयंत जांभूळकर, सदस्य, केंद्रीय प्रवेश समिती

- केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त एकमेव उपाय

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे. औरंगाबाद शहरातील केंद्रीय प्रवेश समिती रद्द करण्यात आली आहे. नागपुरातही समिती रद्द करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. सहा आठवड्यांत प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर केंद्रीय प्रवेश समिती बरखास्तच करायला हवी.

रवींद्र फडणवीस, सचिव, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ

- चार वर्षांतील रिक्त जागांची स्थिती

वर्ष उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा टक्केवारी

२०१७-१८ ५३,१६० ३६,१९९ १६,९६१ ३१.९०

२०१८-१९ ५४,८१० ३५,३०९ १९,५०१ ३५.५८

२०१९-२० ५८,८४० ३७,५५८ २१,२८२ ३६.१७

२०२०-२१ ५९,२५० ३४,८३४ २४,४१६ ४१.२१

- दृष्टीक्षेपात

शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९२५०

कला शाखेच्या एकूण जागा - ९६६०

वाणिज्य शाखेच्या एकूण जागा - १८०००

विज्ञान शाखेच्या एकूण जागा - २७४६०

एमसीव्हीसीच्या एकूण जागा - ४१३०