शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा आठवड्यांत कशी पूर्ण करणार अकरावीची प्रवेशप्रक्रिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूरसह राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून करण्यात येते. समितीला प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पार पाडताना किमान तीन महिनांचा कालावधी लागतो. न्यायालयाच्या सहा आठवड्यांच्या आदेशामुळे केंद्रीय प्रवेश समितीपुढे पेच निर्माण झाला आहे.

नागपूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. गेल्या सत्रात अकरावीच्या प्रवेशप्रकियेला ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली होती व शेवटचा प्रवेश मार्च २०२१ मध्ये पार पडला होता. यंदाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रकियेचा टाइमटेबल घोषित केला आहे. त्यानुसार ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन भाग-१ फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून फॉर्म-बी भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येते. त्यावर विद्यार्थी पालकांकडून आक्षेप मागविण्यात येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. लगेच पहिला राउंड सुरू होईल. फॉर्म-बीपासून तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला किमान महिनाभर लागतो. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. आखणी दोन विशेष फेऱ्या घेतल्या जातात. त्यातही प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रक्रिया सुरूच असते. असा किमान तीन महिन्याचा कालावधी प्रवेशप्रक्रियेला लागतो. त्यामुळे दीड महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पाडणे समितीला शक्य नसल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

- केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दीड महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्यच नाही. समितीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. शाळा व प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अडकून पडते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पालकांचा मनस्ताप वेगळा होतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर मुख्याध्यापक, प्राचार्यालाच अधिकार द्यायला हवे. पूर्वी २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हायची.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

- केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाचा गेल्या चार वर्षांचा आढावा घेतला असता, सातत्याने अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी शहरातील ४० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया नकोच.

डॉ. जयंत जांभूळकर, सदस्य, केंद्रीय प्रवेश समिती

- केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त एकमेव उपाय

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे. औरंगाबाद शहरातील केंद्रीय प्रवेश समिती रद्द करण्यात आली आहे. नागपुरातही समिती रद्द करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. सहा आठवड्यांत प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर केंद्रीय प्रवेश समिती बरखास्तच करायला हवी.

रवींद्र फडणवीस, सचिव, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ

- चार वर्षांतील रिक्त जागांची स्थिती

वर्ष उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा टक्केवारी

२०१७-१८ ५३,१६० ३६,१९९ १६,९६१ ३१.९०

२०१८-१९ ५४,८१० ३५,३०९ १९,५०१ ३५.५८

२०१९-२० ५८,८४० ३७,५५८ २१,२८२ ३६.१७

२०२०-२१ ५९,२५० ३४,८३४ २४,४१६ ४१.२१

- दृष्टीक्षेपात

शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९२५०

कला शाखेच्या एकूण जागा - ९६६०

वाणिज्य शाखेच्या एकूण जागा - १८०००

विज्ञान शाखेच्या एकूण जागा - २७४६०

एमसीव्हीसीच्या एकूण जागा - ४१३०