शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

सहा आठवड्यांत कशी पूर्ण करणार अकरावीची प्रवेशप्रक्रिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूरसह राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून करण्यात येते. समितीला प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पार पाडताना किमान तीन महिनांचा कालावधी लागतो. न्यायालयाच्या सहा आठवड्यांच्या आदेशामुळे केंद्रीय प्रवेश समितीपुढे पेच निर्माण झाला आहे.

नागपूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. गेल्या सत्रात अकरावीच्या प्रवेशप्रकियेला ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली होती व शेवटचा प्रवेश मार्च २०२१ मध्ये पार पडला होता. यंदाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रकियेचा टाइमटेबल घोषित केला आहे. त्यानुसार ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन भाग-१ फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून फॉर्म-बी भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येते. त्यावर विद्यार्थी पालकांकडून आक्षेप मागविण्यात येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. लगेच पहिला राउंड सुरू होईल. फॉर्म-बीपासून तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला किमान महिनाभर लागतो. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. आखणी दोन विशेष फेऱ्या घेतल्या जातात. त्यातही प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रक्रिया सुरूच असते. असा किमान तीन महिन्याचा कालावधी प्रवेशप्रक्रियेला लागतो. त्यामुळे दीड महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पाडणे समितीला शक्य नसल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

- केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दीड महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्यच नाही. समितीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. शाळा व प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अडकून पडते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पालकांचा मनस्ताप वेगळा होतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर मुख्याध्यापक, प्राचार्यालाच अधिकार द्यायला हवे. पूर्वी २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हायची.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

- केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाचा गेल्या चार वर्षांचा आढावा घेतला असता, सातत्याने अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी शहरातील ४० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया नकोच.

डॉ. जयंत जांभूळकर, सदस्य, केंद्रीय प्रवेश समिती

- केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त एकमेव उपाय

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे. औरंगाबाद शहरातील केंद्रीय प्रवेश समिती रद्द करण्यात आली आहे. नागपुरातही समिती रद्द करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. सहा आठवड्यांत प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर केंद्रीय प्रवेश समिती बरखास्तच करायला हवी.

रवींद्र फडणवीस, सचिव, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ

- चार वर्षांतील रिक्त जागांची स्थिती

वर्ष उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा टक्केवारी

२०१७-१८ ५३,१६० ३६,१९९ १६,९६१ ३१.९०

२०१८-१९ ५४,८१० ३५,३०९ १९,५०१ ३५.५८

२०१९-२० ५८,८४० ३७,५५८ २१,२८२ ३६.१७

२०२०-२१ ५९,२५० ३४,८३४ २४,४१६ ४१.२१

- दृष्टीक्षेपात

शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९२५०

कला शाखेच्या एकूण जागा - ९६६०

वाणिज्य शाखेच्या एकूण जागा - १८०००

विज्ञान शाखेच्या एकूण जागा - २७४६०

एमसीव्हीसीच्या एकूण जागा - ४१३०