शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सहा आठवड्यांत कशी पूर्ण करणार अकरावीची प्रवेशप्रक्रिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीसाठी होणारी सीईटी रद्द करीत, सहा आठवड्यांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूरसह राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून करण्यात येते. समितीला प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पार पाडताना किमान तीन महिनांचा कालावधी लागतो. न्यायालयाच्या सहा आठवड्यांच्या आदेशामुळे केंद्रीय प्रवेश समितीपुढे पेच निर्माण झाला आहे.

नागपूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. गेल्या सत्रात अकरावीच्या प्रवेशप्रकियेला ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली होती व शेवटचा प्रवेश मार्च २०२१ मध्ये पार पडला होता. यंदाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रकियेचा टाइमटेबल घोषित केला आहे. त्यानुसार ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन भाग-१ फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून फॉर्म-बी भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येते. त्यावर विद्यार्थी पालकांकडून आक्षेप मागविण्यात येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. लगेच पहिला राउंड सुरू होईल. फॉर्म-बीपासून तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला किमान महिनाभर लागतो. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. आखणी दोन विशेष फेऱ्या घेतल्या जातात. त्यातही प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रक्रिया सुरूच असते. असा किमान तीन महिन्याचा कालावधी प्रवेशप्रक्रियेला लागतो. त्यामुळे दीड महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पाडणे समितीला शक्य नसल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

- केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दीड महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्यच नाही. समितीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. शाळा व प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अडकून पडते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पालकांचा मनस्ताप वेगळा होतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर मुख्याध्यापक, प्राचार्यालाच अधिकार द्यायला हवे. पूर्वी २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हायची.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

- केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाचा गेल्या चार वर्षांचा आढावा घेतला असता, सातत्याने अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी शहरातील ४० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया नकोच.

डॉ. जयंत जांभूळकर, सदस्य, केंद्रीय प्रवेश समिती

- केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त एकमेव उपाय

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे. औरंगाबाद शहरातील केंद्रीय प्रवेश समिती रद्द करण्यात आली आहे. नागपुरातही समिती रद्द करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. सहा आठवड्यांत प्रवेशप्रक्रिया पार पाडायची असेल तर केंद्रीय प्रवेश समिती बरखास्तच करायला हवी.

रवींद्र फडणवीस, सचिव, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ

- चार वर्षांतील रिक्त जागांची स्थिती

वर्ष उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा टक्केवारी

२०१७-१८ ५३,१६० ३६,१९९ १६,९६१ ३१.९०

२०१८-१९ ५४,८१० ३५,३०९ १९,५०१ ३५.५८

२०१९-२० ५८,८४० ३७,५५८ २१,२८२ ३६.१७

२०२०-२१ ५९,२५० ३४,८३४ २४,४१६ ४१.२१

- दृष्टीक्षेपात

शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९२५०

कला शाखेच्या एकूण जागा - ९६६०

वाणिज्य शाखेच्या एकूण जागा - १८०००

विज्ञान शाखेच्या एकूण जागा - २७४६०

एमसीव्हीसीच्या एकूण जागा - ४१३०