शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय नावाचेच, पुस्तके कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:42 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय मुलीसाठी चार नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देअनुदानाची प्रतीक्षा : सीतानगर येथील वसतिगृहातील विद्यार्थिनी त्रस्त

सुमेध वाघमारे/आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय मुलीसाठी चार नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले. परंतु ते सुरू करताना कुठलेही नियोजन नसल्याने घाईगडबडीत सुरू झालेल्या या वसतिगृहांमध्ये सोयी-सुविधांची बोंब आहे. कपाट, टेबल खुर्ची, निर्वाह भत्त्यासह स्टेशनरीचे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थिनींना आटापिटा करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.राज्य सरकारतर्फे २०१५ हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरु करण्यात आलेल्या चारपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह डिगडोह सीतानगर येथे ८ मार्च २०१६ रोजी सुरु करण्यात आले. या वसतिगृहाला स्वत:ची इमारत नाही. भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू आहे. या वसतिगृहात १०० मुलींच्या प्रवेशाची मान्यता आहे. परंतु वसतिगृहात केवळ ८५ मुलींचीच प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे येथे केवळ ८५ मुली आहेत. वसतिगृह सुरू झाले तेव्हा बार्टीकडून काही अनुदान मिळाले होते. त्यातून केवळ वसतिगृहाचे भाडे, मुलींसाठी पलंग, गाद्या याच सुविधा उपलब्ध करून देता आल्या. या वर्षीचे अनुदान मिळालेच नाही.त्यामुळे शैक्षणिक साहित्य, गणवेश आदींसाठी सर्वांनाच अनुदानाची प्रतीक्षा आहे.१५ लाखाचे अनुदान प्रलंबितया वसतिगृहाचे जवळपास १५ लाखाचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे मेस कंत्राटदार, वीज, पाणी, विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्याचे बिल प्रलंबित आहे.मेस कॉन्ट्रॅक्टरचे बिल वर्षभरपासून थकीतवसतिगृह सुरू झाले तेव्हापासून येथील मेस कॉन्ट्रॅक्टरला एक नवीन रुपयाही मिळालेला नाही. वर्षभरापासून त्यांचे बिल पेंडिंग आहे. शासकीय काम असल्याने ते आज ना उद्या मिळेलच या अपेक्षेने मेस कॉन्ट्रॅक्टर थांबून आहे. परंतु त्यांनाही मर्यादा आहे. असे असले तरी येथील मेस चालकाने कधी मुलींना उपाशी राहू दिले नाही, असे येथील मुलींनी आवर्जून सांगितले.फर्निचर मिळालेच नाहीवसतिगृह सुरू झाले, तेव्हापासून वसतिगृहाला फर्निचर मिळालेलेच नाही. टेबल खुर्ची नाही. पुस्तके ठेवायचे शोकेस नाही. त्यामुळे येथील ग्रंथालय केवळ नावाचेच आहे. ग्रंथालयात पुस्तक ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने येथील पुस्तके गृहपालांच्या कार्यालयात ठेवावी लागतात.संगणक व टीव्हीची प्रतीक्षाशासकीय नियमानुसार दहा विद्यार्थिनीमागे एक संगणक असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी टीव्ही असावा. परंतु या वसतिगृहात या दोन्ही सुविधा नाही. येथील विद्यार्थिनींना याची प्रतीक्षा आहे.उन्हाळ्यात पाण्याची टंचाईवसतिगृहातील पाण्याच्या सुविधेसाठी नळ व विहिरीची सुविधा आहे. परंतु उन्हाळ्यात येथील विहीर आटते. तेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते. टँकर बोलवावा लागतो.शासकीय इमारतीसाठी जागा मंजूरसीतानगर येथील वसतिगृहासाठी शासनाने वानाडोंगरी येथे जागा मंजूर केली असल्याचे सांगितले जाते. परंतु जागा मंजूर करून होणार नाही. वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी शासनाने तातडीने पाऊल उचलल्याची गरज आहे. तसेच सर्व सुविधा निर्माण केल्यावरच वसतिगृह सुरू व्हावे, अशी विद्यार्थिनींची अपेक्षा आहे.इमारतीतील दोन खोल्या मिळाल्यास १०० ची संख्या पूर्णवसतिगृहाला १०० विद्यार्थिनींची मान्यता आहे. परंतु सध्या येथील विद्याथिनींची क्षमता ८५ इतकी आहे. इमारतीमध्ये २१ खोल्या आहेत. यात प्रत्येकी चार ते पाच विद्यार्थिनी एका खोलीत असतात. वरच्या माळ्यावर दोन खोल्या आहेत. त्या घरमालकाच्या ताब्यात आहेत. त्या दोन खोल्या मिळाल्यास १०० विद्यार्थिनीना प्रवेश देता येऊ शकतो यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.आर्थिक तरतूद महत्त्वाचीवसतिगृह सुरू झाले. पण त्यासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची आहे. पैशाअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आम्हीही हतबल असतो. क्रेडिटवर पुस्तके वगैरे उपलब्ध करून देता येऊ शकतात. पण इतर शैक्षणिक साहित्यासाठी मोठी अडचण जाते. तेव्हा आर्थिक तरतूद आवश्यक आहे.- के.डब्ल्यू. पाटील, गृहप्रमुख