शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे ‘आरोग्य’ बिघडले!

By admin | Updated: July 18, 2015 02:43 IST

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. मात्र शेतकरी हा जमिनीच्या ...

शेतकरी संकटात : माती परीक्षण विभागाचा अहवाल जीवन रामावत  नागपूर मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. मात्र शेतकरी हा जमिनीच्या आरोग्याकडे नेहमीच दुलर्क्ष करीत आला आहे. जमिनीचा अति वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, पाणी व रासायनिक खतांचा असंतुलित वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनींचे आरोग्य बिघडले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा मृद परीक्षण विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. परिणामत: जमिनीची उत्पादकता कमी झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी जिल्हा माती परीक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गंत ‘माती परीक्षण कार्यक्रम’राबविण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील एकूण १०४६ गावांमधील ३६ हजार ५० शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करू न त्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. भरघोस उत्पादनासाठी जमिनीमध्ये प्रमुख १६ अन्न घटकांची गरज असते. यात हायड्रोजन (एच-२), आॅक्सिजन (ओ-२), कार्बन (सी), नत्र (एन), स्फुरद (पी२ओ५) व पालाश (के-२ओ) यासह कॅल्शियम, मग्नेशियम, गंघक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन व क्लोरीन या सूक्ष्म मूलद्रव्यांचा समावेश असतो. मात्र माती परीक्षण विभागाच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील जमिनीत ही सर्व मूलद्रव्ये कमी-अधिक प्रमाणात आढळून आली आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, जमिनीचा सामु (पीएच) हा साधारण ७ (प्रति कि. हेक्टर) आवश्यक असतो. परंतु जिल्ह्यातील जमिनीचा सामु हा ७.५ ते ८ पर्यंत आढळून आला आहे. याशिवाय नत्र ०.४१ ते ०.६१ (प्रति कि. हेक्टर), स्पुरद १५ ते २१ व पालाशचे प्रमाण १५१ ते २५० (प्रति कि. हेक्टर) पर्यंत आवश्यक असते. मात्र जिल्ह्यातील जमिनीत नत्रासह स्पुरद ०.६१ ते ०.८० पर्यंत व पालाशचे प्रमाण ३६० पेक्षा अधिक वाढले आहे. याशिवाय तांबे, लोह, मंगल व जस्त या मूलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली असून जमिनी नापिक होऊ लागल्या आहेत.शेतकऱ्यांसाठी नि:शुल्क माती परीक्षण मागील काही वर्षांपासून शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. दुसरीकडे जमिनीत नत्र गोळा करणाऱ्या तूर, मुंग व उडीद यासारख्या पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून उत्पादनात घट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करू न, त्यानुसार पाणी व खताचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात शेतकऱ्यांसाठी नि:शुल्क माती परीक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. - अर्चना राऊत (कोचरे), जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी