शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यवतमाळची तरुणी झळकली 'फोर्ब्स'च्या मुखपृष्ठावर; शेतकऱ्यांसाठीच्या 'ग्रामहित'ची जगभरात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 14:51 IST

यवतमाळ जिल्ह्यातील या श्वेता ठाकरे-महल्ले यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील श्वेता ठाकरे (महल्ले) या प्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकेच्या मुखपृष्टावर झळकल्या आहेत. पंकज महल्ले व श्वेता ठाकरे-महल्ले या दाम्पत्याने सुरू केलेल्या 'ग्रामहित' या कंपनीची नोंद यावर्षी 'फोर्ब्स एशिया-१०० टू वॉच'च्या यादीत करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मासिकाने ठाकरे-महल्ले जोडीची दखल घेतल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. 

फोर्ब्सने डिसेंबर महिन्याचा अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाच्या फ्रंट पेजवर ४ तरुण व्यावसायिकांसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे. या अंकात आशिया पॅसिफिक भागातील ११ क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देण्यात आली आहे. यात श्वेता ठाकरे आणि पंकच महल्ले या युवा शेतकरी दाम्पत्याच्या 'ग्रामहित' कंपनीचा समावेश आहे. पंकज-श्वेता दोघांनीही कार्पोरेट कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ग्रामहित कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरु केलं. 

‘ग्रामहित’ काय करते?

पंकज महल्ले, श्वेता ठाकरे हे शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. तसेच साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धताही करून देतात. शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांचे शोषण थांबवून बाजार व्यवस्था सुलभ करणाऱ्यासाठी 'ग्रामहित' काम करते. ही सुविधा घरूनच मोबाईलवर क्लिकवरून दिली जात असून यामुळे वारंवार बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. यापूर्वी ‘ग्रामहित’ची अमेरिकेतील 'सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्वर चॅलेंज-२०२१'साठी निवड झाली होती.

गुंतवणूक, वित्त, विपणन अशा विविध विषयांवर विस्तृत माहिती आणि संशोधन प्रसिद्ध करणारे फोर्ब्स हे मासिक वर्षातून आठ वेळा प्रकाशित होते. यात तंत्रज्ञान, संप्रेशन,विज्ञान, राजकारण यासह विविध क्षेत्रांशी आणि विषयांशी निगडीत माहिती प्रसिद्ध केली जाते. या मासिकात नाव येणे प्रतिष्ठेचे मानले जात असून यात प्रसिद्ध होणारे लेख व माहितीची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाते. त्यामुळे या मासिकात नाव यावं अशी अनेकांची इच्छा असते मात्र ते वाटतं तितकं सोपं काम नाही. 'फोर्ब्स' यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहितचाही समावेश होता. पंकज-श्वेताच्या कामाची दखल घेत फोर्ब्सने त्यांना मूखपृष्ठावर स्थान दिलं असून निवडक १०० कंपन्यांमध्ये ग्रामहितची निवड करण्यात आलीये. यामुळे जिल्ह्याचा लौकिक वाढलाय.

टॅग्स :SocialसामाजिकForbesफोर्ब्सYavatmalयवतमाळ