शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागर बळींनी कासावीस

By admin | Updated: July 8, 2014 01:15 IST

गुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे.

राहुल अवसरे - नागपूरगुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे. मृत्युपूर्व जबाबाचा कायदा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या या पोलीस ठाण्याचा इतिहास काहीसा रोचक आहे. ९ मे १९५२ रोजी पोलीस उपमहानिरीक्षक खान यांनी या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या ठाण्याने अनेक चढउतार पाहिले. खास वैशिष्ट्य म्हणजे या ठाण्यातील एका प्रकरणाने संपूर्ण देशाला ‘मृत्यूपूर्व जबाबा’चा कायदा दिला. हे प्रकरण असे की, एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल कामगारांकडून खंडणी वसुलीवरून खुशाल, तुकाराम, संपत आणि टोळीच्या तंटू, इनायतउल्ला ऊर्फ कालिया, बाबूलाल यांच्या टोळीसोबत चकमकी होत होत्या. बजेरिया भागात १२ फेब्रुवारी १९५६ रोजी खुशालदादा खोब्रागडे पहेलवान आणि साथीदारांनी बाबूलाल पहेलवानाचा खून केला होता. बाबूलालने मरताना घडलेली घटना सांगितली होती. त्या आधारावर खुशालदादाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा झाली होती. त्याने राष्ट्रपतींकडे केलेली दयायाचिका मंजूर होऊन फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तीत झाली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार ए. ए. खान यांनी केला होता. कमी मनुष्यबळअतिवर्दळीचा भाग म्हणून या पोलीस ठाण्याचा समावेश होतो. तरीही ठाण्यातील मनुष्य बळाचे प्रमाण अडीच हजार लोकसंख्येमागे एक कर्मचारी असे आहे. सध्या एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक, चार सहायक पोलीस उपनिरीक्षक, १६ हेड कॉन्स्टेबल, ४९ कॉन्स्टेबल, दोन महिला हेड कॉन्स्टेबल, १६ महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत. एकूणच १० अधिकारी ९३ कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष मंजुरी १० अधिकारी आणि १७५ कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे ८१ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. चोऱ्यांचे प्रमाण अधिकमध्यवर्ती बसस्थानक आणि कॉटनमार्केट, अशी अतिवर्दळीची ठिकाणे असल्याने या भागात चोऱ्या, वाहनचोऱ्यांचे आणि मोबाईल फोन पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. या ठाण्याचा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा आलेखही वाढता आहे. २०११ मध्ये २३८, २०१२ मध्ये २४९ आणि २०१३ मध्ये २५४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. मन सुन्न करणारे मृत्यूदर दोन-तीन दिवसाआड एक तरी मृतदेह गांधीसागर तलावात तरंगताना आढळतो. बहुतांश जीवनाला कंटाळूनच आत्महत्या करतात. हे मृतदेह पाहूनच मन सुन्न होते. दरवर्षी सरासरी ७० ते ८० मृतदेह एकट्या गांधीसागर तलावात आढळतात. येथील आत्महत्यांना रोख लागेल की नाही, असा एकच प्रश्न उपस्थित केला जातो. २०१३ मध्ये १३० जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. चालू वर्षी आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ७० ते ८० % मृत्यू या तलावातील आहे.