शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

गांधीसागर बळींनी कासावीस

By admin | Updated: July 8, 2014 01:15 IST

गुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे.

राहुल अवसरे - नागपूरगुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे. मृत्युपूर्व जबाबाचा कायदा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या या पोलीस ठाण्याचा इतिहास काहीसा रोचक आहे. ९ मे १९५२ रोजी पोलीस उपमहानिरीक्षक खान यांनी या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या ठाण्याने अनेक चढउतार पाहिले. खास वैशिष्ट्य म्हणजे या ठाण्यातील एका प्रकरणाने संपूर्ण देशाला ‘मृत्यूपूर्व जबाबा’चा कायदा दिला. हे प्रकरण असे की, एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल कामगारांकडून खंडणी वसुलीवरून खुशाल, तुकाराम, संपत आणि टोळीच्या तंटू, इनायतउल्ला ऊर्फ कालिया, बाबूलाल यांच्या टोळीसोबत चकमकी होत होत्या. बजेरिया भागात १२ फेब्रुवारी १९५६ रोजी खुशालदादा खोब्रागडे पहेलवान आणि साथीदारांनी बाबूलाल पहेलवानाचा खून केला होता. बाबूलालने मरताना घडलेली घटना सांगितली होती. त्या आधारावर खुशालदादाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा झाली होती. त्याने राष्ट्रपतींकडे केलेली दयायाचिका मंजूर होऊन फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तीत झाली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार ए. ए. खान यांनी केला होता. कमी मनुष्यबळअतिवर्दळीचा भाग म्हणून या पोलीस ठाण्याचा समावेश होतो. तरीही ठाण्यातील मनुष्य बळाचे प्रमाण अडीच हजार लोकसंख्येमागे एक कर्मचारी असे आहे. सध्या एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक, चार सहायक पोलीस उपनिरीक्षक, १६ हेड कॉन्स्टेबल, ४९ कॉन्स्टेबल, दोन महिला हेड कॉन्स्टेबल, १६ महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत. एकूणच १० अधिकारी ९३ कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष मंजुरी १० अधिकारी आणि १७५ कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे ८१ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. चोऱ्यांचे प्रमाण अधिकमध्यवर्ती बसस्थानक आणि कॉटनमार्केट, अशी अतिवर्दळीची ठिकाणे असल्याने या भागात चोऱ्या, वाहनचोऱ्यांचे आणि मोबाईल फोन पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. या ठाण्याचा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा आलेखही वाढता आहे. २०११ मध्ये २३८, २०१२ मध्ये २४९ आणि २०१३ मध्ये २५४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. मन सुन्न करणारे मृत्यूदर दोन-तीन दिवसाआड एक तरी मृतदेह गांधीसागर तलावात तरंगताना आढळतो. बहुतांश जीवनाला कंटाळूनच आत्महत्या करतात. हे मृतदेह पाहूनच मन सुन्न होते. दरवर्षी सरासरी ७० ते ८० मृतदेह एकट्या गांधीसागर तलावात आढळतात. येथील आत्महत्यांना रोख लागेल की नाही, असा एकच प्रश्न उपस्थित केला जातो. २०१३ मध्ये १३० जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. चालू वर्षी आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ७० ते ८० % मृत्यू या तलावातील आहे.