शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

उत्पादन वाढीसाठी स्वदेशीवर भर

By admin | Updated: December 6, 2014 02:45 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे. देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनच ते विकसित करण्यावर अधिक भर दिला जावा, असा सूर देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. सध्या जगभारत नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. दररोज नवनवी यंत्रसामग्री येत आहे. भारतातही काही प्रमाणावर त्याचा वापर होतो आहे, परंतु या यंत्रसामग्रीचा वापर करावा किंवा नाही, यावर वाद सुरू आहेत. यावर चर्चा व्हावी, आणि यातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस मार्ग निघावा, या उद्देशाने रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अ‍ॅग्रोव्हिजन-२०१४’ मध्ये शुक्रवारी ‘आधुनिक यंत्रसामग्रीतून कृषी उत्पादन वाढ आणि पर्यावरणाचा संबंध’ या विषयावर देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शेती व पर्यावरणावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरंच हित होत असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शविली. परंतु आपल्याच देशातील संशोधकांनी संशोधन केल्यास ते येथील शेतकरी व एकूण परिस्थिती लक्षात घेऊन केले असेल. तसेच त्यातून खर्च कमी येईल. तेव्हा स्वदेशी संशोधनावर भर देण्यात यावा. यासाठी शासनाने संशोधनासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करावी, असेही सांगण्यात आले. केंद्रीय वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या चर्चासत्रात आयसीएआर (सिड्स)चे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. स्वरुप दत्ता, स्वदेशी जागरण मंचचे अश्विनी महाजन, नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉ. के.सी. बंसल, भारतीय किसान संघाचे सचिव प्रभाकर केळकर, फाऊंडेशन फॉर बायोटेक्नोलॉजी अव्हर्नेस अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रो. सी. कामेश्वर राव, विजन्ना भारतीचे जनरल सेक्रेटरी जयकुमार, पंजाब विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. आय.एस. दुआ, कॉटन इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. के.आर. क्रांती, भारतीय किसान समाजचे डॉ. क्रिष्णबीर चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बायोटेक्नोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमेस्ट्री विभागाचे विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोरे, मायकोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र बारवाले, रासी सीडस् प्रा.लि.चे डॉ. अरविंद कपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनचे डॉ. बी. दिनेशकुमार, महाराष्ट्र कृषी विभागाचे जॉर्इंट डायरेक्टर व्ही.एन. घवाते प्रामुख्याने सहभागी झाले होते. डॉ. सी.डी. मायी यांनी प्रास्ताविक सादर केले. बायोस्प्रेक्ट्रमचे ग्रुप एडिटर नारायणन सुरेश यांनी ओळख करून दिली. आयोजन समितीचे रवी बोरटकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)