शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

नरखेड : ऑगस्ट अखेर जिल्ह्यात पाऊस अधिक सक्रिय झाला. नरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यासोबतच मुसळधार पावसामुळे नदी, ...

नरखेड : ऑगस्ट अखेर जिल्ह्यात पाऊस अधिक सक्रिय झाला. नरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यासोबतच मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. इकडे सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्याने तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. जून, जुलै, २५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने कापूस, सोयाबीन, मूग, तूर या पिकांची स्थिती चांगली होती. पाण्याचे साठे अर्धेही भरले नव्हते. नदी-नाले कोरडे होते. परंतु सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी अडचणी घेऊन आला. अति पावसामुळे नदी-नाल्याच्या काठावरील शेती खरडून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपूर्वी सोयाबीनच्या बहरलेल्या पिकावर येल्लो मोझॅक व खोडमाशीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरविला. आता शेतकऱ्यांची नजर कपाशीकडे, तुरीकडे लागली असताना ते पीक अति पावसामुळे धोक्यात आले आहे. लाल्या, गुलाबी बोडअळी आणि आता पाण्याचा निचारा होत नसल्याने या रोगास बळी पडून कपाशीची झाडे जाग्यावरच वाळत आहेत.

असे झाले नुकसान

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन २४६.४० हेक्टर, कापूस ५५५.४० हेक्टर, तूर ३३.३० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तालुक्यातील १३७५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. संत्रा, मोसंबीचे ८३.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसानीचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसानीचे दोन दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

----

अतिवृष्टीमुळे तालुक्यात १ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे, असा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

- नीलिमा रेवतकर

सभापती, पं. स. नरखेड

----

अति पावसामुळे पीक खराब होत आहे. सोयाबीन कापण्यायोग्य राहिले नाही. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने झाडे वाळत आहेत. संत्रा-मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

वसंत चांडक, शेतकरी

---

अति पावसामुळे संत्रा-मोसंबी गळ तसेच कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

नंदलाल मोवाडे, शेतकरी, आग्रा

---

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा-मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

डॉ. संजय ढोकणे, शेतकरी.