शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

नरखेड : ऑगस्ट अखेर जिल्ह्यात पाऊस अधिक सक्रिय झाला. नरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यासोबतच मुसळधार पावसामुळे नदी, ...

नरखेड : ऑगस्ट अखेर जिल्ह्यात पाऊस अधिक सक्रिय झाला. नरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यासोबतच मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. इकडे सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्याने तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. जून, जुलै, २५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने कापूस, सोयाबीन, मूग, तूर या पिकांची स्थिती चांगली होती. पाण्याचे साठे अर्धेही भरले नव्हते. नदी-नाले कोरडे होते. परंतु सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी अडचणी घेऊन आला. अति पावसामुळे नदी-नाल्याच्या काठावरील शेती खरडून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपूर्वी सोयाबीनच्या बहरलेल्या पिकावर येल्लो मोझॅक व खोडमाशीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरविला. आता शेतकऱ्यांची नजर कपाशीकडे, तुरीकडे लागली असताना ते पीक अति पावसामुळे धोक्यात आले आहे. लाल्या, गुलाबी बोडअळी आणि आता पाण्याचा निचारा होत नसल्याने या रोगास बळी पडून कपाशीची झाडे जाग्यावरच वाळत आहेत.

असे झाले नुकसान

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन २४६.४० हेक्टर, कापूस ५५५.४० हेक्टर, तूर ३३.३० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तालुक्यातील १३७५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. संत्रा, मोसंबीचे ८३.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसानीचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसानीचे दोन दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

----

अतिवृष्टीमुळे तालुक्यात १ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे, असा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

- नीलिमा रेवतकर

सभापती, पं. स. नरखेड

----

अति पावसामुळे पीक खराब होत आहे. सोयाबीन कापण्यायोग्य राहिले नाही. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने झाडे वाळत आहेत. संत्रा-मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

वसंत चांडक, शेतकरी

---

अति पावसामुळे संत्रा-मोसंबी गळ तसेच कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

नंदलाल मोवाडे, शेतकरी, आग्रा

---

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा-मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

डॉ. संजय ढोकणे, शेतकरी.