शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

उष्माघाताची धास्ती !

By admin | Updated: June 8, 2014 01:19 IST

शहराचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना सनस्ट्रोकची धास्तीही वाढली आहे. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. वैद्यकीय भाषेत त्याला म्हणतात हायपरथर्मिया म्हणतात.

नागपूर : शहराचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना सनस्ट्रोकची धास्तीही वाढली आहे. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात.  वैद्यकीय भाषेत त्याला म्हणतात हायपरथर्मिया म्हणतात. उपराजधानीत उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आजार होऊच नये यासाठी  प्रत्येकाने जागरुक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल)  औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, मानवाच्या शरीराचं सामान्य तापमान ३५.९ सेल्सिअस स्थिर  असतं. हवेतला उष्मा वाढला किंवा कमी झाला तरीही शरीराच्या सामान्य तापमानात फारसा बदल होत नाही. तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या  त्वचेच्या, रक्ताच्या, मेंदूच्या संरचनेत आहेच. (प्रतिनिधी)उपाय या लक्षणांसाठी वैद्यकीय उपचारांची खरं म्हणजे गरजच नसते. भरपूर पाणी पिणं, सैल कपडे घालणं, सुती कपडे वापरणं, घाम पुसून काढणं, पंखा  लावणं एवढय़ा उपायांनीच सामान्यत: बरं वाटतं, गुण येतो. ताप वाढत असल्यास गार पाण्याने अगदी बर्फाच्या पाण्याने वारंवार अंग पुसून काढावं. गार  पाणी, नारळपाणी, नैसर्गिक सरबतं, फळांचे रस, गूळपाणी दर २0 मिनिटांनी तहान नसली तरीही घोट घोट पीत राहावं. तीव्र लक्षणे दिसताच किंवा ताप  आल्यास वैद्यकीय सल्ला घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.मादक पेय टाळावेउन्हाळ्यात चहा कॉफी उत्तेजक पेयं मुळीच पिऊ नयेत. कोणत्याही स्वरूपातील मादक पेय पिऊ नयेत. विशेषत: बीअर पिऊ नये. बीअरमुळे लघवीचं  प्रमाण वाढतं, घाम कमी येतो आणि उष्माघाताची तीव्रता उलट वाढते. सावलीत राहावे. खेळाडूंनी दर २0 मिनिटांनी स्पोर्ट ड्रिंक, लिंबू सरबत, जीवनसत्व  कयुक्त पेय, मीठ साखरेचा आणि क्षारांचा समतोल सांभाळणारी पेयं जरूर प्यावीत. उष्माघात म्हणजे काय? वाढत्या वातावरणातील तापमानामुळे मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण न राहिल्यास शरीरावर होणारा अपाय यास उष्माघात म्हणता येईल.  उष्माघात वातावरणातील वाढलेले तापमान व वाढलेल्या आद्र्रतामुळे होतो, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.सामान्य लक्षणे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानिसक बेचैन व अस्वस्थता,  बेशुद्ध होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.तीव्र लक्षणे उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणं दिसू लागतात. त्वचा रु क्ष होणे आणि सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते.  हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते, कोमात जाण्याची शक्यता असते.