शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आयात शुल्क कपातीने खाद्यतेलाच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

नागपूर : दिवाळीच्या दिवसात दरदिवशी वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. दर कमी करण्याची ...

नागपूर : दिवाळीच्या दिवसात दरदिवशी वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. दर कमी करण्याची त्यांची मागणी होती. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांची दर कमी करण्याची मागणी निरंतर होती. त्यानुसार केंद्र सरकारने आयात शुल्कात ४१ टक्क्यांवरून १० ते ११ टक्के कपात करून ३० टक्क्यांपर्यात शुल्क आणल्याने सध्या सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात ६ ते ७ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पाम तेल १०८ रुपये आणि सोयाबीन तेल ११३ रुपयांपर्यंत खाली आले आहे. यापूर्वी महिन्यापूर्वी १०८ ते ११० रुपये किमतीत विकणारे सोयाबीन तेल १५ दिवसात १२० रुपयांवर पोहोचले होते. त्याकरिता साठेबाजी आणि सट्टेबाजार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. मिलमालक आणि ठोक व्यापाऱ्यांमुळे खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याचा त्यांचा आरोप होता. याकरिता प्रशासन आणि अन्न वितरण विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने काहीही कारवाई न केल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याकरिता अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. दरवाढीसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना कारणीभूत ठरविल्या जाते. पण मुख्य कारण ठोक व्यापारी असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. पण गेल्या दोन महिन्यात तेल व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई न झाल्याने ठोक व्यापाऱ्यांना मोकळे मैदान मिळाल्याचे मत किरकोळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते.

इतवारीतील किरकोळ तेल विक्रेते अनिल अग्रवाल म्हणाले, गेल्या काही दिवसात सोयाबीन आणि पाम तेलात १० ते १५ रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या सणाचा सिझन संपला आहे. त्यामुळे विक्री कमी झाली आहे. आयात शुल्क कमी झाल्यानंतर ग्राहकांना तेलाच्या भावातील घसरणीचा फायदा अजूनही मिळालेला नाही. सोयाबीन तेल पुन्हा १०० रुपये किलो दराने ग्राहकांना मिळावे, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.