शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

आयात शुल्क कपातीने खाद्यतेलाच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

नागपूर : दिवाळीच्या दिवसात दरदिवशी वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. दर कमी करण्याची ...

नागपूर : दिवाळीच्या दिवसात दरदिवशी वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. दर कमी करण्याची त्यांची मागणी होती. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांची दर कमी करण्याची मागणी निरंतर होती. त्यानुसार केंद्र सरकारने आयात शुल्कात ४१ टक्क्यांवरून १० ते ११ टक्के कपात करून ३० टक्क्यांपर्यात शुल्क आणल्याने सध्या सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात ६ ते ७ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पाम तेल १०८ रुपये आणि सोयाबीन तेल ११३ रुपयांपर्यंत खाली आले आहे. यापूर्वी महिन्यापूर्वी १०८ ते ११० रुपये किमतीत विकणारे सोयाबीन तेल १५ दिवसात १२० रुपयांवर पोहोचले होते. त्याकरिता साठेबाजी आणि सट्टेबाजार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. मिलमालक आणि ठोक व्यापाऱ्यांमुळे खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याचा त्यांचा आरोप होता. याकरिता प्रशासन आणि अन्न वितरण विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने काहीही कारवाई न केल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याकरिता अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. दरवाढीसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना कारणीभूत ठरविल्या जाते. पण मुख्य कारण ठोक व्यापारी असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. पण गेल्या दोन महिन्यात तेल व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई न झाल्याने ठोक व्यापाऱ्यांना मोकळे मैदान मिळाल्याचे मत किरकोळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते.

इतवारीतील किरकोळ तेल विक्रेते अनिल अग्रवाल म्हणाले, गेल्या काही दिवसात सोयाबीन आणि पाम तेलात १० ते १५ रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या सणाचा सिझन संपला आहे. त्यामुळे विक्री कमी झाली आहे. आयात शुल्क कमी झाल्यानंतर ग्राहकांना तेलाच्या भावातील घसरणीचा फायदा अजूनही मिळालेला नाही. सोयाबीन तेल पुन्हा १०० रुपये किलो दराने ग्राहकांना मिळावे, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.