शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

दीक्षाभूमीचा होणार जागतिक विकास

By admin | Updated: March 8, 2016 02:54 IST

जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला. या

नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे लोकमतने सुरू केलेल्या लोकलढ्यास यश आले. तसेच आंबेडकरी जनतेची मागणी मान्य झाली असून आता दीक्षाभूमीचा विकास खऱ्या अर्थाने जागतिक दर्जानुसार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशीला बनली आहे. जगभरातील लोकांचा ओढा दीक्षाभूमीच्या दिशेने वाढत आहे. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दीक्षाभूमीचा जागतिक स्तरानुसार विकास आता होऊ शकेल. शासनाने त्यादृष्टीने विकास प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश अगोदरच दिलेले आहेत. मध्यवर्ती स्मारकावरील काळवंडलेल्या डोमच्या स्वच्छतेचा मार्ग आता मोकळा होईल. कारण या डोमच्या स्वच्छतेवरच किमान नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय भव्य उद्यान, लॅण्डस्केपिंग, पार्किंग आणि शौचालय आदींचा विकास जागतिक स्तरावरच्या सुविधेनुसार होईल.असा झाला पाठपुरावा ४आंबेडकरी जनतेचा हा सवाल योग्य होता. लोकमतनेसुद्धा आंबेडकरी जनतेचा हा विषय वृत्तमालिकेच्या स्वरूपात लावून धरला. ‘दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी’ या शीर्षकांतर्गत लोकमतने चालवलेल्या वृत्त मालिकेमुळेच योग्य परिणाम झाला. आंबेडकरी संघटनांनीसुद्धा हा विषय शासन दरबारी मांडला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकमतने सुरू केलेल्या या लढ्याचे चित्र स्पष्ट पाहायला मिळाले. प्रा. जोगेंंद्र कवाडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे आदींनी ही मागणी उचलून धरली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीसुद्धा तीच मागणी होती. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा मिळावा, असा एकमुखी ठराव जिल्हा नियोजन समितीने पारित करून शासनाकडे पाठविला. तत्पूर्वी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनीसुद्धा यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली होती. दलित मित्र संघाचे भूषण दडवे हेसुद्धा अगोदरपासूनच या मागणीसाठी प्रयत्नशील होते.केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला अभिमान वाटावा आणि या जगातील प्रत्येक माणसाला इथे येऊन डोके टेकवावे असे मनापासून वाटते. त्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्याबाबत पालकमंत्री या नात्याने आपण सातत्याने पाठपुरावा केला होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. पवित्र दीक्षाभूमीला केवळ ‘अ’ दर्जा मिळवून देणे एवढेच ध्येय नसून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ आणि संशोधन केंद्र व्हावे. एकूणच दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, हेच आपले स्वप्न आहे. चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री,नागपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. त्यांनी वेळोवेळी तसे जाहीरसुद्धा केले आहे. हा निर्णय सुद्धा त्याचाच परिणाम आहे. दीक्षाभूमीच्या विकासाला यामुळे गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांसह शासनाचे आभारी आहोत. सदानंद फुलझेलेसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी