शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र धोरणाच्या प्रभावासाठी देश एकात्म असावा

By admin | Updated: October 5, 2015 03:07 IST

देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी शेजारच्या देशांशी आणि संपूर्ण जगाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच परराष्ट्र धोरण प्रभावी असले पाहिजे.

चर्चेतील मान्यवरांचा सूर : भारताचे परराष्ट्र धोरण व आजची स्थिती नागपूर : देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी शेजारच्या देशांशी आणि संपूर्ण जगाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच परराष्ट्र धोरण प्रभावी असले पाहिजे. पण परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ नेतृत्वाने घेतलेले निर्णय नव्हे. त्यात लोकसहभाग असला पाहिजे. भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती, धर्म, संप्रदाय आणि विविध विचारांचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक विचारांचा, धर्माचा आदर ठेवून त्यांचीही मते विचारात घेऊन परराष्ट्र धोरण आखलेले असावे. कुठल्याच विचारधारेच्या लोकांवर नेतृत्वाने विशिष्ट विचार लादणे, योग्य ठरणार नाही. मोदी सरकार परराष्ट्र धोरण प्रभावीपणे राबवित आहे पण यात उणिवाही जास्त आहेत. प्रभावी परराष्ट्र धोरणासाठी अंतर्गत कलह संपवून संपूर्ण देश एकात्म करण्याचा प्रयत्न करावा लागेल, असा सूर चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. गिरीश गांधी प्रतिष्ठानच्यावतीने ‘भारताचे परराष्ट्र धोरण व आजची स्थिती’ विषयावर बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार तर वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, सरहद संस्थेचे संजय नहार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांनी मत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. प्रमोद मुनघाटे, अजय पाटील उपस्थित होते. पाडगावकर म्हणाले, जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींवर नेतृत्वाचे लक्ष असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर कोल्ड वॉरची स्थिती, आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यामुळे पाकिस्तान, चीन या देशांशी फारसे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकले नाही. नरसिंहराव यांच्या काळात आर्थिक प्रगतीचे प्रयत्न झाले. वाजपेयींनीही त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर न्युक्लिअर टेस्ट झाल्या आणि भारतावर दबाव वाढला. एखाद्या सरकारने घेतलेला निर्णय त्यानंतरच्या प्रत्येक सरकारने समोर नेला. हे सातत्य भारतात राहिले पण प्रत्येक सरकारने आपापल्या पद्धतीने हे निर्णय राबविले. सध्या मोदी वेगळ्या पद्धतीने परराष्ट्र धोरण राबवित आहेत आणि जागतिक संबंधात ते महत्त्वाचे काम करीत आहेत. मोदींनी परराष्ट्र संबंधात एक ऊर्जा निर्माण केली पण त्यांच्या काही निर्णयाने भारतीय समाजाला फूट पडण्यासापासून वाचविण्याची गरज आहे. सुरेश द्वादशीवार म्हणाले, नेहरूंनी परराष्ट्र धोरणाला प्रारंभ केला. पण त्यावेळची स्थिती बिकट होती. पाकिस्तान अमेरिकेच्या लष्करी गटात सहभागी झाला आणि रशियात स्टॅलिन नेहरू आणि पटेलांना भांडवलवादी मानत होता. त्यामुळे अमेरिकेशी आणि रशियाशी संबंध ठेवणे कठीण होते. त्यामुळेच नेहरूंनी अलिप्त राहणे स्वीकारले पण सहभागी होण्याचे स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवले. त्याचा चांगला परिणाम नंतर दिसला. शस्त्र बळावरच परराष्ट्र धोरण ठरते. त्यामुळे अनेक मर्यादा पडतात. सध्याची जागतिक स्थिती आणि भारतीय वातावरण आहे. मोदी इतर देशांसोबत संबंध प्रस्थापित करीत असले तरी जागतिक स्तरावर ते बोलतात त्याच्या विपरित स्थिती भारतात असेल तर त्यांच्या वक्तव्याला अर्थ उरत नाही. धार्मिक, राजकीय, सामाजिक सलोखा सांभाळण्याचे आव्हान मोदींना पेलावे लागेल. त्याशिवाय परराष्ट्र धोरण यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले. संजय नहार म्हणाले, परराष्ट्र धोरणात संपूर्ण जगाचा विचार करणे अपेक्षित आहे. पण भारतीय परराष्ट्र धोरण नेहमीच पाकिस्तानशी संबंधित राहिले. मोदी इतर देशांशी सलोखा वाढवित आहेत पण त्यात टीमवर्क जाणवत नाही. पाकिस्तान, काश्मीरचा मुद्दा, जातीयता, दहशतवाद, धर्मांधता या साऱ्याच बाबी परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. ी आव्हाने सरकारने गांभीर्याने घ्यायला हवीत. मोहन काशीकर म्हणाले, मोदींनी परराष्ट्र धोरणावर स्वत:ची मुद्रा उमटविली आहे. इथर देशांशी संबंधात बळकटी आणून व्यापारी, आर्थिक, राजकीय प्रगती भारत करीत आहे. पाकिस्तानला जगात एकटे पाडण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. यात ते लोकसहभागही वाढवित आहेत ही चांगली बाब आहे. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)