शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST

नागपूर : विशेष जाती व जमातीच्या शाळेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण ...

नागपूर : विशेष जाती व जमातीच्या शाळेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे नियोजन केले जाते. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास ७ ते ८ प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला फटका बसला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाही. पण यापूर्वीच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या आहे, त्याची टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत विभागच गंभीर नसल्याचे दिसते आहे.

२०२०-२१ है शैक्षणिक सत्र कोरोनामुळे पूर्णत: कोसळले. मार्च २०२० पासून बंद झालेल्या शाळा डिसेंबर २०२० मध्ये उघडल्या. शाळा उघडल्या तरी १०० टक्के विद्यार्थी शाळेत पोहचले नाही. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणाम समाजकल्याण विभाग, शिक्षण विभागाकडे शिष्यवृत्तीचे अर्जच आले नाही. अद्यापही शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरूच आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही ४० टक्केच विद्यार्थ्यांचे अर्ज विभागाकडे जमा झाले आहे.

- सावित्रीबाईची व्यथा

मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी समाजकल्याण विभागाद्वारे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यात इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अनुसूचित जाती, विजा, भज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६० व १०० प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात ४ हजारावर शाळा आहे. दरवर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी किमान २ ते २.५० लाख विद्यार्थिनी पात्र ठरतात. पण गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून लक्षात येते की १० टक्के विद्यार्थीनींनाच शिष्यवृत्ती मिळत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ३६४३६, २०१६-१७ मध्ये २७४१५ व २०१७-१८ मध्ये २२२२० विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

- बऱ्याच शाळांना या योजनबद्दलची माहिती नसल्याने मोजक्याच शाळांचे अहवाल विभागाकडे प्राप्त होते. विद्यार्थिनींची संख्या वाढविण्यासाठी विभागही विशेष प्रयत्न करीत नाही. विशेष म्हणजे विभागही शाळांवर कोणतेच बंधन न घालता योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतात. शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थिनींचे खाते उघडण्यात आलेले आहेत. मात्र त्यात रक्कमेचा अद्यापही पता नाही.

आशिष फुलझेले, मानव अधिकारी संरक्षण मंच

- कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात अडचणी आल्या. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्यच आहे. विभागातर्फे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे. पण शाळांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

मिलींद वानखेडे, प्राचार्य