शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST

नागपूर : विशेष जाती व जमातीच्या शाळेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण ...

नागपूर : विशेष जाती व जमातीच्या शाळेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे नियोजन केले जाते. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास ७ ते ८ प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला फटका बसला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाही. पण यापूर्वीच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या आहे, त्याची टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत विभागच गंभीर नसल्याचे दिसते आहे.

२०२०-२१ है शैक्षणिक सत्र कोरोनामुळे पूर्णत: कोसळले. मार्च २०२० पासून बंद झालेल्या शाळा डिसेंबर २०२० मध्ये उघडल्या. शाळा उघडल्या तरी १०० टक्के विद्यार्थी शाळेत पोहचले नाही. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणाम समाजकल्याण विभाग, शिक्षण विभागाकडे शिष्यवृत्तीचे अर्जच आले नाही. अद्यापही शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरूच आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही ४० टक्केच विद्यार्थ्यांचे अर्ज विभागाकडे जमा झाले आहे.

- सावित्रीबाईची व्यथा

मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी समाजकल्याण विभागाद्वारे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यात इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अनुसूचित जाती, विजा, भज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६० व १०० प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात ४ हजारावर शाळा आहे. दरवर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी किमान २ ते २.५० लाख विद्यार्थिनी पात्र ठरतात. पण गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून लक्षात येते की १० टक्के विद्यार्थीनींनाच शिष्यवृत्ती मिळत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ३६४३६, २०१६-१७ मध्ये २७४१५ व २०१७-१८ मध्ये २२२२० विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

- बऱ्याच शाळांना या योजनबद्दलची माहिती नसल्याने मोजक्याच शाळांचे अहवाल विभागाकडे प्राप्त होते. विद्यार्थिनींची संख्या वाढविण्यासाठी विभागही विशेष प्रयत्न करीत नाही. विशेष म्हणजे विभागही शाळांवर कोणतेच बंधन न घालता योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतात. शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थिनींचे खाते उघडण्यात आलेले आहेत. मात्र त्यात रक्कमेचा अद्यापही पता नाही.

आशिष फुलझेले, मानव अधिकारी संरक्षण मंच

- कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात अडचणी आल्या. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्यच आहे. विभागातर्फे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे. पण शाळांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

मिलींद वानखेडे, प्राचार्य