शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वृद्ध पित्याच्या निर्वाहाची जबाबदारी मुलांचीच

By admin | Updated: July 10, 2015 02:43 IST

वृद्ध पित्याच्या निर्वाहाची जबाबदारी मुलांचीच आहे. ही जबाबदारी वयस्क मुलांना टाकून देता येणार नाही,

२५ रुपये रोजप्रमाणे द्यावा निर्वाह भत्ता : कौटुंबिक न्यायालयाचा दोन्ही मुलांना आदेशराहुल अवसरे नागपूरवृद्ध पित्याच्या निर्वाहाची जबाबदारी मुलांचीच आहे. ही जबाबदारी वयस्क मुलांना टाकून देता येणार नाही, असा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आय.एम. बोहरी यांनी एका वृद्ध पित्याला आंतरिम निर्वाह भत्ता लागू करताना दिला. याचिकाकर्त्या पित्याला दोन्ही प्रतिवादी मुलांनी २५ रुपये रोजप्रमाणे प्रत्येकी ७५० रुपये महिना उदरनिर्वाहसाठी द्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गोपीचंद नावाच्या या ७५ वर्षीय वृद्धाने गत वर्षी आपल्या दोन मुलांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्याच्या कलम १२५ अन्वये उदरनिर्वाह भत्त्यासाठी याचिका दाखल केली होती. दोन्ही मुलांकडून दरमहा २००० रुपये मिळावे आणि याचिका प्रलंबित काळात १००० रुपये दरमहा देण्यात यावे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले होते. आपली पत्नी शेवंताबाई १८ मे २००७ रोजी मरण पावली. आम्ही दोघांनी काबाडकष्ट केले आणि मुलांना लहानाचे मोठे केले. आता थकलेल्या वयोमानामुळे कष्ट होत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी आपणाला दोन्ही मुलांनी भत्ता द्यावा. ौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर ते सामोपचाराने सोडवण्यासाठी १६ आॅक्टोबर २०१४ रोजी समोपदेशक एस. पी. लानकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. परंतु समझोता होऊ शकला नव्हता. पुढे प्रकरण पुन्हा न्यायालयात आले होते. आमचेच भागत नाही हो !दोन्ही प्रतिवादी मुलांना न्यायालयाने नोटीस जारी केली होती. मुलांनी न्यायालयात आपले उत्तर दाखल केले होते. त्यांनी उत्तरात असे नमूद केले होते की, आपले वडील हे प्रभाकर नावाच्या आपल्या मोठ्या मुलासोबत राहतात. या दोघांनी संगनमताने विष्णू गोपाल नावाच्या एका व्यक्तीला २० लाख रुपयात शेतजमीन विकली. प्रभाकरने या पैशातून १३ लाख रुपयात भूखंड खरेदी केला. प्रभाकर हा सरकारी कर्मचारी असून कूकचे काम करतो. तो महिन्याचे ३० हजार रुपये कमावतो. याचिकाकर्त्याने आपली संपूर्ण ३२ एकर जमीन विकून टाकली आहे. आमच्यासाठी त्याने काहीही ठेवलेले नाही. आम्ही रोजंदारी मजूर असून आम्हाला दररोज १०० रुपये रोजी मिळते. एका मुलाने आपणास पत्नी, तीन मुले तर दुसऱ्याने पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे सांगून याचिकाकर्त्या पित्यास उदरनिर्वाह भत्ता देण्याची आपली ऐपत नसल्याचे सांगितले. प्रतिवादींनी वडील मोठ्या मुलासोबत राहात असल्याचे कोणतेही दस्तऐवज न्यायालयात सादर केले नाहीत. याचिकाकर्त्याने असे सांगितले की, शेतजमीन विकल्यानंतर प्रत्येकी चार लाख रुपये तीन मुलांना वाटून टाकले. एक चतुर्थांस भाग त्याने स्वत:जवळ ठेवला होता. आपल्या वाट्यातील चार लाख रुपये याचिकाकर्त्याने घर बांधण्यात खर्च केले.