शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेला कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:52 IST

मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना २०१७-१८ पासून लागू झाली. मात्र दोन वर्षातच योजनेला कासवगती आली. अनुदानाचेही पुरेसे वाटप झाले नाही.

ठळक मुद्देनिम्म्याहून कमी अनुदानाचे वाटप दोन वर्षांत प्रक्रिया केंद्रही नाही

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतमाल प्रक्रिया उद्योगाला तसेच धान्य व फळे साठवणुकीला प्रोत्साहन मिळावे यासोबतच अनुदानात्मक निधीतून उद्योगांची उभारणी होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना २०१७-१८ पासून लागू झाली. मात्र दोन वर्षातच योजनेला कासवगती आली. अनुदानाचेही पुरेसे वाटप झाले नाही. यामुळे योजना चांगली असली तरी त्याची फ लश्रुती मात्र दिसून आली नाही.या योजनेमध्ये कृषी व अन्न साखळी प्रस्थापिक करून दर्जा वाढविणे आणि या साखळीचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित आहे. उत्पादित फळे, फुले, धान्य टिकविण्यासाठी आणि निर्यातक्षम करण्याच्या दृष्टीने शीतसाखळी योजनाही राबवायची होती. या सर्व कार्यासाठी मनुष्यबळाची निर्मिती करून त्याचा विकास करणे अपेक्षित होते. या योजनेसाठी २०१८-१९ या वर्षात ५९ प्रकल्प मंजूर करण्यात आले. या प्रक ल्पांच्या माध्यमातून ही योजना सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी पहिल्या वर्षी १७ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. मात्र त्यातील फक्त ८ कोटी ८५ लाख २० हजार ५०० रुपयांचेच अनुदान वितरित करण्यात आले.दुसºया वर्षी २०१९-२० मध्ये जानेवारी अखेरपर्यंत ९९ प्रक ल्प मंजूर करण्यात आले. त्यासाठी ३१ कोटी ८३ लाख ६९ हजार ९०० रुपयांचे अनुदान मंजूर झाले. प्रत्यक्षात ७ कोटी ५० लाख ४२ हजार ३०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. या दोन्ही वर्षांमिळून ४९ कोटी ५४ लाख १० हजार ९०० रुपयांचे अनुदान मंजूर असले तरी, वितरित झालेल्या अनुदानाचा आकडा मात्र १६ कोटी ३५ लाख ६२ हजार ८०० रुपयांवरच आहे. मंजूर अनुदानाच्या निम्म्यापेक्षाही कमी अनुदान वितरित झाल्याने ही योजना अद्यापही पूर्णत: सक्षमपणे कार्यान्वित झालेली नाही.कृषी धोरणाच्या सक्षमतेची गरजया योजनेच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे धोरण सक्षम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावरूनच या कार्याला गती मिळावी यासाठी कृ षी सहायकाची पदे निर्माण करून स्वतंत्र स्थायी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. कृषी विभागात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र पदे नाहीत. महसूल, कृ षी, वन या विभागात समन्वय नाही. परिमणामत: योजनांना खीळ बसते. कृषी कार्यालयांची सक्षमता अद्यापही वाढलेली नाही. हे लक्षात घेता कृषी धोरण सक्षम करणे यासाठी गरजेचे मानले जाते.या योजनेनुसार, ग्रामीण भागातील सक्षम कृषी उद्योगाला शेतकरी उत्पादक कंपन्यांशी जोडण्याचे शासनाचे धोरण असणे अपेक्षित होते. क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीमअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषीवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यासंदर्भातही उपाययोजना सुचविण्यात आली होती. कृषी विद्यापीठ आणि अन्य संशोधन संस्थांमार्फ त विकसित झालेले अन्न प्रक्रियेचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे धोरण असणेही यात अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्ह्याचे कृषी क्षेत्रातील पिकांचे क्लस्टर वेगवेगळे असते. ते विचारात घेऊन त्यावर आधारित प्राथमिक प्रक्रिया केंद्र सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र दोन वर्षात त्यासाठी फारसा वेग आलेला दिसत नाही.

टॅग्स :agricultureशेती