शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

उदंड वाहनांमुळे गुदमरतोय श्वास

By admin | Updated: October 26, 2014 00:17 IST

नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न,

शहरात १४ लाखांवर खासगी वाहने नागपूर : नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात, असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. गेल्या वर्षात खासगी वाहनांच्या संख्येत ६० हजाराने भर पडली आहे. त्या त्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ ७ टक्केच आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागपूरकरांचा श्वास गुदमरतोय.शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी ते ३० स्पटेंबर २०१३ या नऊ महिन्याच्या कालावधीत ७७० अपघात झाले असून यात तब्बल १९९ जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक मृत्यू कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी रिंगरोडवर सर्वात जास्त ६५ अपघात तर मृत्यूची संख्या ४४ वर गेली आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटारसायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरवासीयांना वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गर्दीच्या तासांमध्ये तासभरही उभे राहणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत (स्टार बसेस) खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक असल्याचे दिसून येते. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने असतात. रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्यइतर खासगी वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. २०१३ मध्ये ११ लाख २९ हजार ९४९ दुचाकींची नोंदणी झाली, तर या वर्षी यात सुमारे ६ लाख दुचाकींची भर पडली. (प्रतिनिधी)खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडीचे कारणगेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनीच वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये खासगी वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती. २०१३ मध्ये १३ लाख ५८ हजारावर पोहचली. या वर्षी ती १४ लाखांच्या वर गेली आहे. रस्ता रु ंदीकरण करून वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे सचिव रवी कासखेडीकर यांचे म्हणणे आहे.