शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
3
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
4
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
5
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
6
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
7
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
8
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
9
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
11
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
12
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
13
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
15
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
16
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
17
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
18
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
19
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
20
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  

उदंड वाहनांमुळे गुदमरतोय श्वास

By admin | Updated: October 26, 2014 00:17 IST

नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न,

शहरात १४ लाखांवर खासगी वाहने नागपूर : नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात, असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. गेल्या वर्षात खासगी वाहनांच्या संख्येत ६० हजाराने भर पडली आहे. त्या त्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ ७ टक्केच आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागपूरकरांचा श्वास गुदमरतोय.शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी ते ३० स्पटेंबर २०१३ या नऊ महिन्याच्या कालावधीत ७७० अपघात झाले असून यात तब्बल १९९ जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक मृत्यू कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी रिंगरोडवर सर्वात जास्त ६५ अपघात तर मृत्यूची संख्या ४४ वर गेली आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटारसायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरवासीयांना वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गर्दीच्या तासांमध्ये तासभरही उभे राहणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत (स्टार बसेस) खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक असल्याचे दिसून येते. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने असतात. रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्यइतर खासगी वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. २०१३ मध्ये ११ लाख २९ हजार ९४९ दुचाकींची नोंदणी झाली, तर या वर्षी यात सुमारे ६ लाख दुचाकींची भर पडली. (प्रतिनिधी)खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडीचे कारणगेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनीच वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये खासगी वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती. २०१३ मध्ये १३ लाख ५८ हजारावर पोहचली. या वर्षी ती १४ लाखांच्या वर गेली आहे. रस्ता रु ंदीकरण करून वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे सचिव रवी कासखेडीकर यांचे म्हणणे आहे.