शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाचे मिशन बारावी

By admin | Updated: February 28, 2017 01:58 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

बारावी परीक्षा : विभागातून १ लाख ८० हजार विद्यार्थी बसणारनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. नागपूर विभागातून सुमारे १ लाख ८० हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दरम्यान मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील ‘कॉपीमुक्त’ अभियानावर भर दिला जाणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ८० हजार ५२२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यातील ११७६ शाळांसाठी ४३६ केंद्रे स्थापण्यात आली आहेत. परीक्षांसाठी सर्व तयारी झाली असून परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका पाठविण्याचे कामदेखील जवळपास पूर्णत्वास आले आहे. त्याचप्रमाणे सर्व परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)७० हून अधिक भरारी पथके राहणार तैनातबारावीच्या परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत याकरिता मंडळाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके राहणार आहेत. याशिवाय विशेष पथके मिळून ७० हून अधिक भरारी पथके विभागस्तरावर तैनात राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शिक्षणाधिकारी, महसूल विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अशा निरनिराळ्या पथकांचा यात समावेश असेल.विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवर ताण असतो. सोबतच पालकदेखील तणावातच असतात. अशा स्थितीत मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंडळाने समुपदेशनाची सोय केली आहे. ९९२२४५३२३५, ९६६५१९२१५६ , ९७६३६६७४१६, ९४०३३५८९९८, ८०८७८००१५५, ९४२२०५३३९१, ९८९००५४५१८ या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क करू शकणार आहेत.शाळांमध्ये तयारी पूर्णबारावीच्या परीक्षेसाठी ज्या शाळांमध्ये केंद्र ठेवण्यात आले आहे तेथे जवळपास सर्वच तयारी बुधवारी पूर्ण झाली. उपराजधानीतील सर्वच महत्त्वाच्या केंद्रांची पाहणी केली असता शाळांधील प्राचार्य व केंद्रप्रमुख स्वत: जातीने उपस्थित राहून सर्व व्यवस्था सांभाळत असल्याचे दिसून आले. शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात येत होते. पिण्याचे पाणी, बेंच, वर्गखोल्या, पंखे इत्यादी सुविधा योग्य आहेत की नाहीत याचीदेखील तपासणी करण्यात आली. विभागीय मंडळाचे अधिकारी व समन्वयक सातत्याने केंद्रप्रमुखांच्या संपर्कात होते.देवा, मला पास कर!आज शिक्षणव्यवस्था कितीही ‘हायटेक’ झाली असली तरी परीक्षेला जाण्याअगोदर देवदेवता व मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद हमखास घेतल्या जातात. वर्षभर केलेल्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळावे अशी प्रार्थना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज नागपुरातील निरनिराळ््या मंदिरांमध्ये हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिरांमध्ये विद्यार्थी व पालकांची उपस्थिती दिसून येत होती.