शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

‘लेटरबॉम्ब’वरून भाजपची गृहमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ची दाहकता नागपुरातदेखील जाणवली. गृहमंत्री अनिल देशमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ची दाहकता नागपुरातदेखील जाणवली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला व त्यांच्या घरावरच हल्लाबोल केला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने गृहमंत्र्यांची बाजू लावून धरत सिंग यांच्याविरोधात आंदोलन केले.

गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे देशमुख यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारदेखील नाही, असा भाजपच्या नेत्यांचा सूर होता. संविधान चौकात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. गृहमंत्र्यांना पैशाची कमतरता असल्याने त्यांनी १०० कोटी मागितले. त्यांना पैसे देण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी पैसे गोळा केले.

दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या नागपुरातील घरासमोर आंदोलन केले. यावेळी गृहमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून धरणे आंदोलन सुरू केले. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजयुमोचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांनी केली. यावेळी प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, राहुल खंगार प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिसांनी पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राष्ट्रवादीकडून भाजपविरोधात संताप

दुसरीकडे राष्ट्रवादीने गृहमंत्र्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. संविधान चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी भाजपवर आरोप लावले व ठिय्या मांडला. परमबीर सिंग यांनी याबाबत आतापर्यंत मौन का साधले होते, असा सवाल यावेळी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी उपस्थित केला.

‘कोरोना’ नियमावलीचा फज्जा

शहरात ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने रविवारीदेखील ‘लॉकडाऊन’चे पालन करणे अनिवार्य होते. अशा स्थितीत आंदोलन झाले आणि आश्चर्याची बाब म्हणजे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांपैकी कुणीही आंदोलनकर्त्यांना रोखले नाही. एकीकडे सोशल मीडियावर लोकांना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे नियमांना तिलांजली देत दाटीवाटीने आंदोलन करायचे असे चित्र दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे अनेकांनी, तर मास्कदेखील घातला नव्हता. त्यांच्यावर पोलीस प्रशासन किंवा मनपा प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई झाली नाही.