शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

बँकांनी प्रशासकीय खर्च कमी करावा

By admin | Updated: March 22, 2015 02:28 IST

बँकांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात टिकाव धरण्यासाठी बँकांनी प्रशासकीय खर्चात कपात करून व्यवसाय करणे आवश्यक आहे.

नागपूर : बँकांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात टिकाव धरण्यासाठी बँकांनी प्रशासकीय खर्चात कपात करून व्यवसाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-आॅप. सोसायटी लि. नागपूरच्या पांडे ले-आऊट, खामला येथील कार्यालयात डेटा सेंटर (सीबीएस आॅनलाईन) चे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा उपस्थित होते. सोसायटीच्य अध्यक्ष सारिका पेंडसे व उपाध्यक्ष नीलिमा बावणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. किशोर बावणे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचे गाठी घालून स्वागत केले. या वेळी सोसायटीच्यावतीने फडणवीस यांच्या हस्ते पत्रकारांना जॅकेट वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बँकेत जाऊन व्यवहार करण्याची संकल्पना आता संपुष्टात येऊ लागली आहे. मोबाईल, इंटरनेट, एटीएमद्वारे बँकेचे व्यवहार करण्यावर नागरिकांचा भर आहे. सध्या बँकेपेक्षा ‘बॅक आॅफिस’ महत्त्वाचे झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जलद सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे व्यवहारातही पारदर्शीपणा येत आहे. धरमपेठ महिला सोसायटीने कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) ही प्रणाली स्वीकारली. यामुळे या सोसायटीची कार्यक्षमता वाढेल. गेल्या काही वर्षात या सोसयटीने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.खा. विजय दर्डा म्हणाले, महिलांनी हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वी झाले आहे. या बँकेच्या महिलांवर लोकांचा विश्वास असल्यामुळेच ६०० कोटींवर ठेवी मिळाल्या आहेत. या डाटा सेंटरमुळे बँकेचे खर्च कमी होतील. एनपीएवर नियंत्रण येईल. काही सहकारी बँकांनी नागरिकांचा पैसा बुडविल्यामुळे सहकारी बँकांबाबत नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दि. धरमपेठ महिला बँक विश्वासार्ह काम करीत आहे. बँका शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज देत नाही. अनेक अटी लादतात. येत्या काळात रिझर्व्ह बँकेने अशा को- आॅप. सोसायटींना कृषी कर्ज देण्याच्या परवानगीची गरज त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात सारिका पेंडसे यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आलेख मांडला. नीलिमा बावणे म्हणाल्या, २० वर्षांपूर्वी ४० महिलांनी भिसी सुरू केली होती. तिचे आज एवढे मोठे स्वरूप झाले आहे. पेंडसे व बावणे यांनी दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांनी या कामासाठी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. व्यवस्थापन सल्लागार पी.एस. हिराणी यांनींनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. संचालन माधुरी पांडे यांनी केले. (प्रतिनिधी)