शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी प्रशासकीय खर्च कमी करावा

By admin | Updated: March 22, 2015 02:28 IST

बँकांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात टिकाव धरण्यासाठी बँकांनी प्रशासकीय खर्चात कपात करून व्यवसाय करणे आवश्यक आहे.

नागपूर : बँकांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात टिकाव धरण्यासाठी बँकांनी प्रशासकीय खर्चात कपात करून व्यवसाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-आॅप. सोसायटी लि. नागपूरच्या पांडे ले-आऊट, खामला येथील कार्यालयात डेटा सेंटर (सीबीएस आॅनलाईन) चे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा उपस्थित होते. सोसायटीच्य अध्यक्ष सारिका पेंडसे व उपाध्यक्ष नीलिमा बावणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. किशोर बावणे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचे गाठी घालून स्वागत केले. या वेळी सोसायटीच्यावतीने फडणवीस यांच्या हस्ते पत्रकारांना जॅकेट वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बँकेत जाऊन व्यवहार करण्याची संकल्पना आता संपुष्टात येऊ लागली आहे. मोबाईल, इंटरनेट, एटीएमद्वारे बँकेचे व्यवहार करण्यावर नागरिकांचा भर आहे. सध्या बँकेपेक्षा ‘बॅक आॅफिस’ महत्त्वाचे झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जलद सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे व्यवहारातही पारदर्शीपणा येत आहे. धरमपेठ महिला सोसायटीने कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) ही प्रणाली स्वीकारली. यामुळे या सोसायटीची कार्यक्षमता वाढेल. गेल्या काही वर्षात या सोसयटीने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.खा. विजय दर्डा म्हणाले, महिलांनी हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वी झाले आहे. या बँकेच्या महिलांवर लोकांचा विश्वास असल्यामुळेच ६०० कोटींवर ठेवी मिळाल्या आहेत. या डाटा सेंटरमुळे बँकेचे खर्च कमी होतील. एनपीएवर नियंत्रण येईल. काही सहकारी बँकांनी नागरिकांचा पैसा बुडविल्यामुळे सहकारी बँकांबाबत नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दि. धरमपेठ महिला बँक विश्वासार्ह काम करीत आहे. बँका शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज देत नाही. अनेक अटी लादतात. येत्या काळात रिझर्व्ह बँकेने अशा को- आॅप. सोसायटींना कृषी कर्ज देण्याच्या परवानगीची गरज त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात सारिका पेंडसे यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आलेख मांडला. नीलिमा बावणे म्हणाल्या, २० वर्षांपूर्वी ४० महिलांनी भिसी सुरू केली होती. तिचे आज एवढे मोठे स्वरूप झाले आहे. पेंडसे व बावणे यांनी दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांनी या कामासाठी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. व्यवस्थापन सल्लागार पी.एस. हिराणी यांनींनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. संचालन माधुरी पांडे यांनी केले. (प्रतिनिधी)