शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

खाणींमधील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन; ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अ‍ॅण्ड बियॉन्ड’ चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:50 IST

खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.

ठळक मुद्देनीरीचे माजी संचालक एस.आर. वटे यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतनागपूर : खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरच्या वतीने ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अ‍ॅण्ड बियॉन्ड’ या विषयावर तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचा समारोप शुक्रवार, ८ डिसेंबरला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये झाला. समारोपीय समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिओलॉजी अ‍ॅण्ड मायनिंग संचालनालय, महाराष्ट्रचे संचालक आर.एस. कळमकर, आयबीएमचे कन्ट्रोलर जनरल व एमईएआयचे मुख्य संरक्षक रंजन सहाय, परिषदेच्या समितीचे चेअरमन प्रा. बी.बी. धर, मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरचे चेअरमन डी.के. सहानी, एमईएआय नागपूर चॅप्टरचे उपाध्यक्ष एच.आर. कालीहारी आणि माजी अध्यक्ष एस.एम. बोथरा उपस्थित होते.वटे म्हणाले, शाश्वत खनन हे खाणीची अर्थव्यवस्था, पर्यावरण व सामजिक दृष्टिकोन आणि योग्य संचालन या तीन बाबींवर अवलंबून आहे. रिमोट सेन्सिंग, ड्रोन यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्खननाशी संबंधित पर्यावरणाचे मुद्दे योग्यरीत्या हाताळता येतात. विकासासाठी खनिज उत्खननाचे लक्ष्य गाठताना तंत्रज्ञानाच्या संयोजनाने खाण क्षेत्रात पर्यावरणाचा परिणाम कमी करता येतो. त्यामुळे खनिज स्थायी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह बनतील आणि खाणी व खनिज उत्पादनांच्या गुणवत्तेची उच्चपातळी निश्चित गाठता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.वटे म्हणाले, भारतात या क्षेत्रात उत्तम प्रोफेशनल्स आहेत तर काही खाणी जागतिक दर्जाच्या आहेत. खाण कंपन्यांनी पर्यावरण फ्रेंड्ली बनावे. पर्यावरण विषय खूपच लवचिक आहे. कारण खाण नियोजन आणि खाण बंद होण्याबाबतच्या योजना योग्य आणि व्यवस्थित झाल्यास हवा, पाणी आणि माती प्रदूषित न करता त्याच्या मूळ टप्प्यात परत येऊ शकते. खाणींनी योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास पर्यावरण प्रमाणपत्र तीन महिन्यांत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्राने खनिज स्रोताच्या इंटर-जनरेशनल इक्विटीवर भर दिला आहे. खाण उद्योगाने यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आर.एस. कळमकर यांनी केले. कालीहारी यांनी आभार मानले. यावेळी आयबीएम, जीएसआय, एमईसीएल, नीरी आणि विविध खाणींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरण