शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खाणींमधील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन; ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अ‍ॅण्ड बियॉन्ड’ चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:50 IST

खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.

ठळक मुद्देनीरीचे माजी संचालक एस.आर. वटे यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतनागपूर : खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरच्या वतीने ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अ‍ॅण्ड बियॉन्ड’ या विषयावर तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचा समारोप शुक्रवार, ८ डिसेंबरला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये झाला. समारोपीय समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिओलॉजी अ‍ॅण्ड मायनिंग संचालनालय, महाराष्ट्रचे संचालक आर.एस. कळमकर, आयबीएमचे कन्ट्रोलर जनरल व एमईएआयचे मुख्य संरक्षक रंजन सहाय, परिषदेच्या समितीचे चेअरमन प्रा. बी.बी. धर, मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरचे चेअरमन डी.के. सहानी, एमईएआय नागपूर चॅप्टरचे उपाध्यक्ष एच.आर. कालीहारी आणि माजी अध्यक्ष एस.एम. बोथरा उपस्थित होते.वटे म्हणाले, शाश्वत खनन हे खाणीची अर्थव्यवस्था, पर्यावरण व सामजिक दृष्टिकोन आणि योग्य संचालन या तीन बाबींवर अवलंबून आहे. रिमोट सेन्सिंग, ड्रोन यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्खननाशी संबंधित पर्यावरणाचे मुद्दे योग्यरीत्या हाताळता येतात. विकासासाठी खनिज उत्खननाचे लक्ष्य गाठताना तंत्रज्ञानाच्या संयोजनाने खाण क्षेत्रात पर्यावरणाचा परिणाम कमी करता येतो. त्यामुळे खनिज स्थायी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह बनतील आणि खाणी व खनिज उत्पादनांच्या गुणवत्तेची उच्चपातळी निश्चित गाठता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.वटे म्हणाले, भारतात या क्षेत्रात उत्तम प्रोफेशनल्स आहेत तर काही खाणी जागतिक दर्जाच्या आहेत. खाण कंपन्यांनी पर्यावरण फ्रेंड्ली बनावे. पर्यावरण विषय खूपच लवचिक आहे. कारण खाण नियोजन आणि खाण बंद होण्याबाबतच्या योजना योग्य आणि व्यवस्थित झाल्यास हवा, पाणी आणि माती प्रदूषित न करता त्याच्या मूळ टप्प्यात परत येऊ शकते. खाणींनी योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास पर्यावरण प्रमाणपत्र तीन महिन्यांत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्राने खनिज स्रोताच्या इंटर-जनरेशनल इक्विटीवर भर दिला आहे. खाण उद्योगाने यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आर.एस. कळमकर यांनी केले. कालीहारी यांनी आभार मानले. यावेळी आयबीएम, जीएसआय, एमईसीएल, नीरी आणि विविध खाणींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरण