शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

कृषी कायद्यामुळे शेतीत सकारात्मक बदल होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकाधिकारशाही संपुष्टात येणार आहे. हे शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे. ...

नागपूर : केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकाधिकारशाही संपुष्टात येणार आहे. हे शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष ललित पाटील बाहाळे यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यासंबंधी गठित केलेल्या समितीसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ललित पाटील बाहाळे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने नियंत्रकाची भूमिका सोडून सुविधा पुरवठादार म्हणून सेवा क्षेत्रात स्पर्धा करावी, असा संकेत कायद्याद्वारे देण्यात आला आहे. शेती मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात कुणीही सहभागी होऊ शकत असल्यामुळे एक व्यापक बाजार उभा होण्यास मदत होणार आहे. नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदार, तज्ज्ञ व सेवा पुरवठादारांशी करार करून या क्षेत्रातील उत्पादकांचे सशक्तीकरण करणे शक्य होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या मालात खराब माल मिसळण्यात येत असल्यामुळे ते भेसळीचे केंद्र असल्याचे बाहाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी झाले पाहिजे. तसेच शासनाला युद्धजन्य किंवा दुष्काळाच्या स्थितीतच शेती मालाच्या किमतीवर नियंत्रणाचा अधिकार असला पाहिजे. आवश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा सदोष असल्याचे समितीच्या लक्षात आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विलास ताथोड उपस्थित होते.

.............