शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

९ पैकी ६ तलावांचे अस्तित्व धाेक्यात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST

श्रेयस हाेले नागपूर : गेल्या काही आठवड्यापासून फुटाळा तलावाचा जलस्तर सातत्याने घटत असल्याने या ऐतिहासिक वारसा स्थळाचे अस्तित्व संकटात ...

श्रेयस हाेले

नागपूर : गेल्या काही आठवड्यापासून फुटाळा तलावाचा जलस्तर सातत्याने घटत असल्याने या ऐतिहासिक वारसा स्थळाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. मात्र सध्या फुटाळा एकमेव नाही तर जवळपास सर्वच तलाव संकटाचा सामना करीत आहेत. शहरातील ९ पैकी ६ तलावांचा कॅचमेंट एरिया कमी झाला असून त्यांचे डबक्यात रूपांतर हाेत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व अविचारी विकासकामांचा फटका या जलस्रोतांना बसत आहे.

पर्यावरण कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे यांनी लाेकमतशी बाेलताना तलावांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. जबाबदार प्रशासनाचे असेच दुर्लक्ष हाेत राहिले तर येणाऱ्या भविष्यात शहराला भयंकर जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला आधी तलाव आणि डबका यातील वैज्ञानिक फरक समजून घेणे आवश्यक आहे. कॅचमेंट एरिया असेल ते तलाव आणि ज्याला नसेल ते डबके ठरते. नागपूर महापालिकेने १९६४ साली शहराचे ‘नागपूर शताब्दी ग्रंथ’ तयार केले हाेते. त्यानुसार शहरात ९ माेठ्या तलावांचे अस्तित्व हाेते. यामध्ये गाेरेवाडा, फुटाळा, अंबाझरी, साेनेगाव, पांढराबाेडी, सक्करदरा, गांधीसागर, लेंडी तलाव व नाईक तलावाचा समावेश हाेताे. आता त्यातील केवळ गाेरेवाडा, फुटाळा आणि अंबाझरी तलावाचे कॅचमेंट शिल्लक राहिले आहे. उर्वरित तलाव आता डबक्याप्रमाणे झाले आहेत. चांगल्या स्थितीत असलेले तलावही किती काळ टिकतील, याची शाश्वती नाही, अशी खंतही देशपांडे यांनी व्यक्त केली. सर्व तलावांच्या कॅचमेंट एरियात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. हे अतिक्रमण असेच वाढत राहिले तर हे तलावही डबक्यात रूपांतरित हाेतील. नागपूर हे नेहमीच हिरवळीचे शहर राहिले आहे. तलावांच्या मुबलक संख्येमुळे शहराचा भूजलस्तर चांगल्या स्थितीत आहे. मात्र आता विकासकामांच्या नावावर सुरू असलेली वृक्षताेड, तलावांवर हाेणारे अतिक्रमण यामुळे भूजलपातळी सातत्याने खाली जात आहे. अशा अवस्थेत तलावांचे संवर्धन झाले नाही तर भूजलपातळी भयंकर स्थितीत पाेहचू शकते. सरकारने विकासकामांचे नियाेजन करण्यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.