शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

५G - नुसतेच मनोरे की स्वप्न साकारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST

५ जी म्हणजे आहे तरी काय? ५जी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन सेल्युलर टेक्नॉलॉजी’! पहिले जनरेशन म्हणजे मोबाईलवर फक्त ‘व्हॉईस कॉल’, ...

५ जी म्हणजे आहे तरी काय?

५जी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन सेल्युलर टेक्नॉलॉजी’! पहिले जनरेशन म्हणजे मोबाईलवर फक्त ‘व्हॉईस कॉल’, २ जी म्हणजे ‘एसएमएस’ ही ‘मेसेजिंग’ सुविधा, ३ जी म्हणजे मोबाईलवर इंटरनेट आणि ४ जी म्हणजे अधिक स्पीड असलेले इंटरनेट ज्यावर ओटीटी व अन्य सुविधा वापरता येतील. ५ जी स्पेक्ट्रम स्पीडमुळे स्वयंचलित गाड्या, अधिक स्पीडचे ‘आयओटी’, दूरवरच्या शस्त्रक्रिया आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिॲलिटी) चे वेगवेगळे आविष्कार मोबाईलवर साकारतील. ४जीच्या शंभरपट स्पीड मिळेल. मनोरंजनाशिवाय टेलिमेडिसीन, टेलिएज्युकेशन या आरोग्य, शिक्षणाच्या अद्ययावत सुविधा ५जी मुळे सर्वत्र उपलब्ध होतील.

दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका पुढे

जग, विशेषत: दक्षिण कोरिया, चीन व अमेरिका हे देश ५जी बाबत आपल्या खूप पुढे आहेत. या देशांमधील प्रत्येकी ५० शहरांमध्ये सध्याच ५जी सेवा उपलब्ध आहे. भारतात अजूनही ते स्वप्नच आहे. त्याचे कारण या सेवेसाठी ‘ऑप्टिकल फायबर केबल’चे (ओएफसी) नेटवर्क आणि मोबाईल टॉवरची संख्या खूप वाढविण्याची गरज आहे. टॉवर्सची संख्या खूपच कमी असल्यामुळे सध्या भारतात ‘ब्रॉडबॅन्ड पेनिट्रेशन’ अवघे ७ टक्के आहे. युरोप किंवा उत्तर अमेरिकेत ते ७५ टक्के आहे. ‘वेव्हलेंग्थ कॅरिअर’ मर्यादित असल्याने रेडिएशन (किरणोत्सर्ग) अधिक होते, असा आक्षेप आहे. भारतातील ‘ओएफसी नेटवर्क’ जेमतेम २५ लाख किलोमीटर आहे आणि ५जी सुविधा पूर्ण क्षमतेने वापरायची असेल तर हे जाळे किमान तिपटीने वाढविण्याची गरज आहे. हे असे आकडे सांगण्याइतके सोपे नाही. दूरसंचार मंत्रालयाच्याच अंदाजानुसार सरकार व मोबाईल कंपन्यांनी खूपच जोर लावला तरी ७५ लाख किलोमीटरचे जाळे तयार व्हायला २०२२ चा डिसेंबर उजाडेल.

पुन्हा ग्राहकांवरच भुर्दंड का?

मुळात ५जी स्पेक्ट्रमचे लिलावच अजून झालेेले नाहीत. मुळात भारतात स्पेक्ट्रम खूप महाग आहे. त्यामुळेच मोबाईल सेवा खूप महाग झाली आहे. ग्राहकांकडून प्रचंड पैसा वसूल केल्यानंतरही बहुतेक मोबाईल कंपन्या भयंकर तोट्यात आहेत. २ जी स्पेक्ट्रमचा लिलाव, त्यात कथितरीत्या झालेले राष्ट्रीय नुकसान, आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याविरुद्ध उठवलेला आवाज, ए. राजा-कनिमोळी व इतरांविरुद्धचा खटला, त्यातून ते निर्दोष सुटल्यामुळे भाजपवर होणारी टीका, हा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तर ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव हे दिसते तितके सरळ प्रकरण राहणार नाही. अर्थात, रिलायन्सचे अंबानी किंवा एअरटेलचे मित्तल कितीही दावा करीत असले तरी खऱ्या अर्थाने भारतात स्मार्ट फोन ५ जीच्या स्पीडने चालतीलच असे नाही. घोषणा झाली तरी मिळणारी सेवा ५ जी नसण्याचीच शक्यता अधिक आहे.

चिनी कंपन्यांना पर्याय काय?

या स्वप्नांच्या पूर्ततेतील आणखी एक अडथळा म्हणजे चीनशी सध्या सुरू भारताचा पंगा. नोकिया, इरिक्सन व हुवेई या कंपन्या सध्या ५जी सेवा देण्यासंदर्भात आघाडीवर आहेत. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची सेवा खास भारतीय असेल व त्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे सांगितले असले तरी ते अजून पूर्णपणे सिद्ध व्हायचे आहे. चिनी कंपन्यांची अजिबात मदत घ्यायची नाही, असे सरकारचे सध्याचे धोरण आहे. ते तसेच राहिले तर भारतात ५जी चे स्वप्न साकारण्यात आणखी अडचण तयार होईल.

--------------------------------------------------