शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यात जेव्हा शहर येते..

By admin | Updated: January 3, 2015 15:03 IST

पिकवणार्‍यापेक्षा विकणारा महत्त्वाचा आणि उत्पादकतेपेक्षा क्रयशक्तीला मोल! अशा परिस्थितीत शहरे विरुद्ध खेडी हा संघर्ष अटळ आहे.

 मिलिंद थत्ते

 
 
जगण्यासाठी, टिकण्यासाठी धडपड करणे हे प्रत्येक जीव करतच असतो. माणूसही त्यात आलाच. माणसांचे कुटुंब, माणसांचे वेगवेगळ्या कारणांनी होणारे समूह हेही एखाद्या जिवाप्रमाणेच वर्तन करतात. या समूहांनाही भूक असते. जसे देह राखण्यासाठी काही पेशी मरतात, तसे आपला समूह राखण्यासाठी माणसे जीवही द्यायला तयार होतात. या समूहांना जगण्यासाठी स्वत:ची ओळख, संस्कृती, अस्मिता वगैरे लागते. तसेच त्यांना आपला समूह राखण्यासाठी निसर्गसंपदेवरची मालकीही लागते. जमीन, पाणी, जंगल, जनावरे, खनिजे या सगळ्यातूनच संपत्ती निर्माण होते. संपत्तीतून सत्ता येते. त्यामुळे माणसाचा इतिहास हा या नैसर्गिक संसाधनांवरच रचलेला आहे. या संसाधनांची मालकी, उपलब्धता, अनुकूलता यानुसार मानवसमूह आणि  देश श्रीमंत किंवा दळिद्री होतात.
पण मानवसमूह हा एका देहाचा, एका मनाचा नसतो. एकत्र राहण्यात फायदा असतो, तोवरच तो एकत्र असतो. पूर्वी माणूस घनदाट जंगलात, वैराण वाळवंटात, दुस्तर पहाडात निसर्गाशी झुंजत जगत होता. तेव्हा सुरक्षित जगण्यासाठी समूहात राहणे गरजेचेच होते. समूहाने एकत्र रहायचे तर काही नियम काही रीती पाळाव्या लागतात. शिकार करणार्‍या समूहांमध्ये शिकारीचे समान वाटे करण्याची पद्धत आजही रूढ आहे. शिकारीत कोणी किती महत्त्वाची भूमिका पार पाडली, यानुसार वाटे लहान-मोठे होत नाहीत. समूहाने शिकार केली नाही तर कोणाचेच पोट भरणार नसते. सर्वांचा फायदा असल्यामुळेच यात समान वाटे स्वीकारले जातात. अशा समूहात प्रमुखाचा शब्द अंतिम असतो. ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ वगैरे भानगडी जगण्याच्या दृष्टीने कुचकामी असतात.
अशा समूहात शेतीचा प्रवेश झाला की जमिनीची मालकी येते. तुकडे पडतात, कुंपण येते. शेती एकेक कुटुंब करत असते, शिकारीप्रमाणे यात समूह एकत्र राहत नाही. फायदा झाला तरी कुटुंबाचा आणि झळ लागली तरी कुटुंबाला. समूहप्रमुखाचे स्वामित्व कमी होते. कुटुंबप्रमुखाचे वाढते.
शेती हा मुख्य व्यवसाय असणार्‍या समूहांमध्ये ज्याची जास्त जमिनीवर मालकी तो बलवान होतो. छोट्या जमिनी असणारे कमी बलवान आणि बिनजमिनीचे दुर्बल होतात. दुर्बलांना आपली जीविका चालवण्यासाठी अतुल्याबलुत्याची भूमिका घ्यावी लागते. जमीनमालकाला या ना त्या प्रकारे सेवा पुरवून त्यातून आपले पोट चालवण्याची त्यांची भूमिका असते. सेवा आणि शेती या परस्परपूरक असतात, तोपर्यंत दोघांचेही भले त्यातून होत असते. फायदा असतो तोवर हीही व्यवस्था टिकते. पण जमीनमालकाच्या गरजेपलीकडे सेवा उपलब्ध असतील, तर सेवेची किंमत कमी होते. सेवा देणार्‍यांचे शोषण सुरू होते. शोषणाने दबून पिचून तसेच जगत राहणे किंवा ती व्यवस्था भेदून बाहेर पडणे असे पर्याय शोषितांच्या हातात उरतात. अशाचवेळी शोषितांचा एखादा द्रष्टा नेता ‘शहराकडे चला’ म्हणतो. 
शहरे हे एक वेगळे जग असते. तिथे समूह नसतो. व्यक्तींची गर्दी असते. त्या गर्दीला स्वत:ची एक ओळख, अस्मिता वगैरे नसते. शिकार आणि शेती व्यवस्थेतल्या समूहांना टिकून राहण्याच्या गरजेतून स्वाभाविकच एक ओळख असते. तसे शहराला नसते. तशी काही अस्मिता तयार झालीच तरी ती कचकड्याची असते. सर्वजण एकेकटे स्पर्धा करत जगतात. जगण्यासाठी त्यांना एकमेकांची गरज नसते. एकमेकांकडून सेवा आणि वस्तू घेण्यासाठी त्यांच्याकडे एक अद्धूत माध्यम असते. या माध्यमाला स्वभाव-संस्कृती वगैरे काही नसते. फक्त रोकडा भाव असतो. ज्याच्या खिशात हे माध्यम खुळखुळते, त्याला काही कमी पडत नाही!
मी राहतो त्या गावात नळाने येणारे पाणी नाही. कुणाच्या घरी लग्न असले की सर्व घरातल्या मुली त्या घरी पाणी भरायला जातात. पुरुषमाणसे मांडव बांधायला, स्वयंपाक करायला, ताडी वाहायला मदत करतात. या कामांसाठी पैशाची अपेक्षा नसते. ‘फक्त माझ्या घरचे लग्न असेल, तेव्हा तुम्ही मदतीला आले पाहिजे’ अशी अपेक्षा असते. लेखी करार नसतो, सामाजिक समंजसपणा असतो. गावातले एक धनको दुकानदार आहेत. त्यांची मुले सरकारी नोकरीत आहेत. घरात पैसा खुळखुळतो आहे. त्यांच्या घरचे लग्न होते, तेव्हा त्यांनी मोटर लावली अन् पाणी भरले. मांडवासाठी कंत्राट दिले. त्यांच्या घरात शहरातले ते अद्धूत माध्यम आले आहे.
आता शहर आणि गाव ही दोन वेगळी ठिकाणे राहिली नाहीत. शहर गावातही आले आहे. गावात शेती आहे, पण व्यवस्था शेतीप्रधान नाही. माणसांचे ‘पोट’ आजही सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाने भरत नाही, ते अन्न आणि पाण्यानेच भरते. पण पिकवणार्‍यापेक्षा विकणारा महत्त्वाचा झाला आहे. उत्पादकतेपेक्षा क्रयशक्तीला महत्त्व आहे.
- हे एक युगांतर आहे. या युगांतरात अनेक गुंतागुंतीची चक्रे आहेत. त्या चक्रांना चालवण्याचा संघर्ष वेगवेगळ्या मानवसमूहांमध्ये होतो आहे आणि होणार आहे. 
शहरे आणि खेडी यांच्यातले आंतरसंबंध निश्‍चित करण्याच्या संघर्षात आपल्या देशात ही चक्रे कशी फिरतील? यात आपलेच बांधव पिळले जातील की सुखरूप निघतील? टिकण्याच्या स्पर्धेतून संघर्ष होईल की समन्वयानेही मार्ग निघेल? -अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सदरातून शोधायची आहेत. 
साकव म्हणजे पूल.
‘आम्ही’ विरुद्ध  ‘तुम्ही’ आणि  ‘शहरे’ विरुद्ध  ‘खेडी’ या आंधळ्या संघर्षाला पर्याय शोधून  ‘सर्वांच्या’ एकत्रित, परस्परपूरक शाश्‍वत प्रगतीकडे नेणार्‍या उत्तरांचे रस्ते नसले तरी पायवाटा जरूर सापडतात. त्या वाटेवरून पुढे गेले तर नवे साकव उभारणे कठीण नाही.
मी ज्या आडबाजूच्या आदिवासी पाड्यात राहातो, तिथून मला दिसणारे जग वेगळे का आहे, हेही थोडे सांगीन म्हणतो. कारण त्या  रोकड्या अनुभवांनीच प्रश्नांची आणि उत्तरांचीही वेगळी बाजू मला दाखवली आहे. 
(ठाणे जिल्ह्यातल्या कोगदा पाटील पाड्यात मुक्कामाला असणारा लेखक आदिवासी युवकांबरोबर काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचा कार्यकर्ता आहे)
(हे सदर दर १५ दिवसांनी प्रसिद्ध होईल.)