शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पीकेचे काय चुकले?

By admin | Updated: January 3, 2015 15:10 IST

आधीच अति-संवेदनशील बनलेल्या, संकुचित झालेल्या / केल्या गेलेल्या सामाजिक चर्चाविश्‍वात एखादा सिनेमा नव्या ठिणगीचे कारण बनतो, तेव्हा तेच प्रश्न नव्याने उभे राहतात. सामान्य माणसाच्या भावना पटकन भडकण्याइतक्या ज्वलनशील खरेच असतात का?

 आधीच अति-संवेदनशील बनलेल्या, संकुचित झालेल्या / केल्या गेलेल्या सामाजिक चर्चाविश्‍वात एखादा सिनेमा नव्या ठिणगीचे कारण बनतो, तेव्हा तेच प्रश्न नव्याने उभे राहतात. सामान्य माणसाच्या भावना पटकन भडकण्याइतक्या ज्वलनशील खरेच असतात का? खुल्या अभिव्यक्तीच्या जपणुकीपेक्षा अस्मितेचे जतन त्याला जास्त महत्त्वाचे वाटते का? समाजातल्या गाठी-निरगाठी आणि ठणकत्या प्रश्नांना सिनेमा अगर टीव्हीसारख्या माध्यमाने हात घालणे कितीसे उपयुक्त असते? त्यामुळे माणसे फक्त चिडतात.. की बदलतात?

 
मुश्किल था!
सगळ्यांच्याच डोळ्यावर झापडं असतात आणि कुणाचीच चर्चेला तयारी नसते, हे अजिबात खरं नाही!
 
राजकुमार हिरानी
 
(थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि पीके या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक)
 
कांच्या धार्मिक श्रध्दांपुढे प्रश्नचिन्हं लावणारा इतका ‘नाजूक’ विषय हाती घेतला होता. लोक तो कसा स्वीकारतील हा नंतरचा प्रश्न होता, मुळात हा विषय आपल्याला पेलेल का, झेपेल का? म्हणजे आपण तो ‘उत्तम’ मांडू शकू का, याचीच मला जास्त काळजी होती.
यापूर्वीचे माझे सिनेमे तुलनेने सोपे होते. वैद्यकीय क्षेत्रातला अमानवी, त्रयस्थ रूक्षपणा आणि मुन्नाचं प्रेमानं माणसं जोडणं, गांधीगिरी करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढणं यात लोकांना न आवडण्यासारखं काय होतं? उलट थिएटरमध्ये आलेली माणसं मुन्ना कसा ग्रेट, त्याला जे जमतं ते आपल्याला का नाही याची रुखरुख घेऊनच घरी परतत होती. त्यांच्या मनातली कुठली तरी तार अचूक छेडली गेली होती. 
- तेच थ्री इडियट्सचंही. आहे ती शिक्षणव्यवस्था आपल्याला ‘पढाखू’ बनवते, पण ज्ञान देत नाही. माणसाला आयुष्यात जे आवडत, मनापासून करावंसं वाटतं तेच शिकावं, ‘लायक’ बनवावं, कामयाबी  आपल्यामागे चालत येते, असं सांगणारा हा सिनेमा. शिक्षणव्यवस्थेला कंटाळेल्या सगळ्यांनीच डोक्यावर घेतला.
खरंतर या तिन्ही सिनेमात होते सामाजिकच प्रश्न. मात्र त्या प्रश्नांवर दुसर्‍या कुणीतरी बोलणं, भाष्य करणं, दोष दाखवणं, त्यांची टिंगल करत जरा कान पिळणं लोकांना आवडलं होतं. ‘लोकप्रिय भावने’वर आधारित हे सिनेमे म्हणूनच वारेमाप गाजले. अनेकांनी आपल्या आयुष्याला ताडून पाहिलं या सिनेमाशी.
‘पीके’ मात्र अशी एक कहाणी आहे की, ज्या कहाणीतले प्रश्न लोकांना आवडणार नाहीत, रुचणार नाहीत, याची आम्हाला कल्पना होती. पहिल्यांदाच ‘न आवडणार्‍या’ विषयावर  मी सिनेमा बनवणार होतो. ‘धर्म’ या विषयावर बोलणं, त्यातल्या त्रुटींवर बोलणं, श्रद्धेशी जोडल्या गेलेल्या भावनेला हात घालणं आपल्या आजच्या  समाजात अत्यंत अवघड आहे. धर्मभ्रष्ट विचारांवर मात करून जाऊ शकेल अशी संवेदनशील धर्मभावना रुजवणारा, अनेकानेक कारणं आणि अनेकांच्या तत्कालीन फायद्यांसाठी त्यातल्या संवेदनशीलतेला सतत स्फोटक, धगधगती ठेवणारा हा काळ आहे. अशा नाजूक काळात धर्मासारख्या विषयावरच्या चर्चेसाठीचा अवकाश अधिकच आकुंचत जातो याचीही जाणीव होती; मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरचा आमचा अनुभव सांगतो की, लोक ‘समजूनच घेणार नाहीत’ हे आपण म्हणजे लेखक-दिग्दर्शक- निर्माते सारे गृहीतच धरतो. लोकांना काहीही कळत नाही, त्यांना गंभीर, सामाजिक प्रश्नांवरची चर्चा/कॉमेण्ट नको असते, ते फक्त दोन-अडीच तासांच्या निवांत मनोरंजनासाठीच सिनेमाला येतात, उगीच नस्त्या वळणाने जाऊन त्यांना अवघड प्रश्न विचारले, तर लगेच त्यांच्या  भावना दुखावतील, आपण अडचणीत येऊ, हे सारं ‘गृहीत’ धरलं जातं. गंभीर विषयांवर भूमिका घेणं नको, त्यापायी होणारा थोडाबहुत विरोध नको, म्हणून ही सोयीची भूमिका.
समाजाच्या डोळ्यावर इतकी झापडं असतात, असं मला वाटत नाही. 
गंभीर बातों की गंभीर चर्चा आसां होती है, लोगों को एण्टरटेन करते-करते कुछ सिरीयस इश्यू कहना, बहोत मुश्किल होता है. पण सिनेमांनी नाही तर हे काम कुणी करायचं? भारतासारख्या देशात सिनेमाचं माध्यमच सर्वदूर आणि एकाचवेळी सर्वांपर्यंत पोचतं. या माध्यमाने आपल्या जबाबदारीपासून पळ काढता कामा नये, अशीच माझी भूमिका आहे.
मनोरंजनाच्या निमित्ताने, ती किनार हरवू न देता लोकांना विचार करायला भाग पाडणं हे जमलं तर सिनेमा मनोरंजनाच्या दोन पावलं पुढं सरकतो. ‘पीके’ मध्ये हे पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न फक्त आम्ही केला आहे. 
 
का आणि किती 
घाबरायचं?
 
काही लिहिण्यापूर्वीच जर आपण हा विचार केला की, अमुक लिहिलं, तर तमुक लोक नाराज होतील, समाज विरोध करेल, टीकेचं वादळ उठेल, आपल्या हेतूविषयीच शंका घेतली जाईल तर काही लिहिणंच अवघड होऊन बसेल.
किती घाबरायचं आणि किती भीत-भीत लिहायचं यालाही काही र्मयादा आहेत.
‘पीके’ हा सिनेमा लिहिताना एकच गोष्ट माझ्या डोक्यात पक्की होती, कुणाच्याही धार्मिक भावनांची टिंगलटवाळी, चेष्टा, अकारण आकस ठेवून विरोध असं  काहीही या गोष्टीत असणार नाही.
एक सामान्य, अतिव निर्मळ, लहान मुलासारखा  माणूस  अत्यंत नितळ मनानं जेव्हा धर्माचा विचार करतो, तेव्हा त्याला काय दिसतं? आपल्या जगण्यातले कोणते प्रश्न त्यातून समोर येतात, हे एकदा तपासून पाहावं एवढंच ही गोष्ट करते. ती स्पष्ट बोलते पण उद्धटपणे नव्हे. 
मला एवढंच वाटतं की, लेखक आणि कलाकारांनी कळीचे सामाजिक प्रश्न अवश्य मांडावेत, पण न्यायाधीशाच्या भूमिकेतून निर्णायक मते अगर सल्ले देत बोलू नये. खुल्या चर्चेला निमित्त पुरवणं एवढंच माझ्यासारख्या सिनेमालेखकाचं काम.
 
अभिजात जोशी
 
(पीके, लगे रहो मुन्नाभाई, मिशन काश्मीर, एकलव्य यासारख्या गाजलेल्या सिनेमाचे लेखक)