शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक क्षणाच्या अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी काय करावं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:55 IST

हर क्षणाचा अनुभव जगण्यासाठी मदत करणारा साक्षीभाव

-डॉ. यश  वेलणकर

माणसाच्या कर्ता, भोक्ता आणि साक्षी अशा तीन भूमिका असतात. यातील कर्ता आणि भोक्ता अगदी जन्माला आल्यापासून माणूस असतोच. बाळ आईचे दूध चोखत असते त्यावेळी कर्ता असते, ते दूध प्यायल्याने त्याचे समाधान होते. त्यावेळी ते भोक्ता असते. साक्षीभाव मात्र जन्मत: नसतो. तो शिकून घ्यावा लागतो. 

माइंडफुलनेसचा सराव हा साक्षीभाव विकसित करण्यासाठीच आहे. हा साक्षीभाव विकसित झाला की माणूस अधिक चांगला कर्ता, अधिक चांगला रसिक भोक्ता होऊ लागतो. आता कोणत्या रोलमध्ये, कोणत्या भूमिकेत आपण राहायचे आहे हे तो ठरवू शकतो, त्यानुसार लवचीकतेने स्वत:च्या भूमिका बदलू शकतो. साक्षी व्हायचे म्हणजे मन वर्तमानात आणून त्या क्षणी परिसरात, मनात आणि शरीरात जे काही होत आहे ते जाणायचे, त्याचा स्वीकार करायचा. ..आणि पुढील क्षणी साक्षी राहायचे की कर्ता, भोक्ता व्हायचे हे ठरवायचे. हे कौशल्य नियमित सरावाने वाढते. 

कोणत्याही क्षणी आपला अनुभव सुखद- दु:खद किंवा न्यूट्रल म्हणजे असुखद-अदु:खद असतो. साक्षी व्हायचे म्हणजे हा अनुभव जाणायचा. तो सुखद असेल तर त्याचा आनंद घ्यायचा, भोक्ता व्हायचे, रसिक व्हायचे. तो सुखद नसेल तर ती परिस्थिती बदलण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, ते ठरवायचे आणि ते प्रयत्न करायचे म्हणजे कर्ता व्हायचे. ते करताना सजगतेने त्या कृतीमध्ये पूर्ण तन्मय व्हायचे, त्या कृतीचाच आनंद घ्यायचा. 

हेही लक्षात घ्यायचे की माणसाचे सर्व प्रयत्न नेहमी यशस्वी होतातच असे नाही. काही गोष्टी आपण बदलवू शकतो, त्या बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. त्यांचा स्वीकार करायचा. म्हणजेच साक्षी व्हायचे. असे साक्षी झाल्याने अस्वीकाराचे दु:ख कमी होते, अस्वस्थता, तणाव कमी होतो. हे शरीराच्या आजारांसाठी करायचे, मानसिक भावनांसाठी करायचे, बाह्य परिस्थितीसाठीही करायचे.  शरीरात जे काही घडते आहे त्याविषयी साक्षीभाव विकसित करण्याचे पहिले पाऊल म्हणजे नैसर्गिक श्वासामुळे होणारी छातीपोटाची हालचाल जाणत राहायची. मतिमंद मुले आणि काही मानसिक आजार असलेल्या व्यक्ती सोडल्या तर अन्य सर्व माणसे ही श्वासाची हालचाल जाणू शकतात, म्हणजेच साक्षीभाव अनुभवू शकतात. आपण श्वासाची गती प्रयत्नपूर्वक बदलवतो म्हणजे प्राणायाम करतो, त्यावेळी कर्ता असतो. 

साक्षी व्हायचे म्हणजे श्वासामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न न करता तो जसा आहे तसा जाणायचा. याच साक्षीभावाने मनातील विचार आणि भावनादेखील जाणता येतात. मनात येणारे भीतीदायक विचार आपण नाकारतो, ते विचार बदलण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळा हे प्रयत्न यशस्वी होतात पण प्रत्येक वेळी होतातच असे नाही. भीतीचे विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहतात, माणसाला अस्वस्थ करतात. आपण विचार बदलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कर्ता असतो. पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा भीतीचे विचार मनात येत असतील तर हे विचार आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत हे मान्य करायचे आणि  साक्षी व्हायचे. त्या विचारांना नाकारण्याचा, त्यांना बदलवण्याचा प्रयत्न न करता, त्यांचा स्वीकार करायचा आणि आपले लक्ष शरीरावर आणायचे. त्या विचारांचा परिणाम म्हणून शरीरात काय होते आहे, छातीत धडधड, पोटात गोळा, कपाळावर घाम, हातापायात कंप जे काही जाणवते आहे त्या संवेदनांचा स्वीकार करायचा. आजचे मेंदूविज्ञान सांगते की असा स्वीकार माणूस करतो त्यावेळी त्याच्या भावनिक मेंदूची सक्रियता कमी होते. 

माइंडफुलनेस म्हणजे साक्षीभाव कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल तरच उपयुक्त असतो, असे नाही. हा साक्षीभाव रोजच्या आयुष्यातील आनंद वाढवणारा आहे. साक्षीभावाने मनातील विचारांपासून अलग झालो तरच आपण वर्तमानातील छोटे छोटे आनंद अनुभवू शकतो. 

छोट्या छोट्या आनंदक्षणांसाठी.* आपले मन भूत आणि भविष्यात भटकत असते. मनात सतत येणारे विचार आपल्याला वर्तमानात ठेवत नाहीत. 

* आपले मन अनावश्यक विचारात आहे हे लक्षात येईल त्यावेळी आपले लक्ष त्याक्षणी येणारे आवाज, जाणवणारे स्पर्श,रूप,गंध यावर आणायचे. 

* साक्षीभावाने मनातील विचारांपासून अलग झालो तरच आपण वर्तमानातील छोटे छोटे आनंद अनुभवू शकतो. तो क्षण आनंददायी असेल तर भोक्ता होऊ शकतो. 

* अस्वस्थता साक्षीभावाने कमी करू शकतो,  भोक्ता भावाने आनंद अनुभवू शकतो.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com