शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

स्टार्टअप स्मार्ट वाढ

By admin | Updated: January 23, 2016 15:24 IST

उद्योग आपल्याकडे याआधीही होतेच की! मग स्टार्टअप्सचं का एवढं कौतुक? स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानावर आधारित उद्योग; ज्यातील कार्यपद्धतीही नावीन्यपूर्ण असते. जगभरात सध्या या स्टार्टअप्सची चलती आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया- स्टँडअप इंडिया’ची घोषणा केली आणि परवा त्यासंदर्भाचं धोरणही जाहीर केलं. त्यानिमित्त स्टार्टअप्सच्या या अनोख्या जगात.

- ओंकार करंबेळकर

 
नवा विचार, नवी कल्पना आणि नवी मांडणी.
अशा नव्या गोष्टींचं स्वागत होतंच.
सरकारनंही उद्योगांच्या बाबतीत या नव्या धोरणाला आता इंधनपुरवठा सुरु केला आहे.
उद्योग काय, आपल्याकडे आधीही स्थापन होत होतेच की. मग आता त्यात असं काय नवीन आलंय, की त्याचा एवढा उदोउदो आणि कौतुक सरू झालंय असंही वाटण्याची शक्यता आहेच.
उद्योगांच्या या नव्या स्मार्ट प्रकाराचं नाव आहे ‘स्टार्टअप’.
स्टार्टअप म्हणजे अशा उद्योगाचा आरंभ जो नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्याची काम करण्याची पद्धतीही अत्यंत नावीन्यपूर्ण अशी आहे. 
पारंपरिक उद्योगांचे सर्व मार्ग हाताळून झाल्यावर सध्या जगभरात या स्टार्टअप्सचं युग आलं आहे. भारतातील तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोक:या पाहता भारतालाही या नव्या संकल्पनेपासून फार काळ आणि फार दूर राहणं शक्य नव्हतंच. 
त्यामुळेच आपल्याकडेही इतर देशांच्या तुलनेत संथ गतीनं का होईना, पण स्टार्टअप्सकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात झाली आहे. 
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया- स्टँडअप इंडिया’ची घोषणा केली आणि त्यानुसार 16 जानेवारी रोजी त्यासंबंधीचं धोरणही जाहीर केलं. 
बदलत्या काळात नवे रोजगार नव्या उद्योगांमधूनच निर्माण होतील आणि नोक:या मागणा:यांची फौज निर्माण होण्यापेक्षा नोक:या देणारे कसे वाढीस लागतील याकडे सरकारनं लक्ष वेधलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून नवउद्योग स्थापन करण्यात पूर्वीप्रमाणो येणारे अडथळे आता दूर होतील आणि युवक उद्योगांकडे वळतील अशी अपेक्षा आहे.
इन्स्पेक्टर राजची भीती, करांची डोक्यावर उभी असलेली टांगती तलवार, भांडवल कमतरता, गुंतवणुकीतील अडथळे. यातल्या कोणत्याच कारणामुळे तरुणांची पावलं अडखळू नयेत आणि जास्तीत जास्त संख्येनं तरुणांनी स्टार्टअप्सकडे वळावं यासाठीचा हा जाणीवपूर्वक प्रय}.
आज कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी आपल्या डोळ्यांसमोर नाव येतं ते फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडीलचं. आपल्याला हव्या त्या रोगासाठी हवा तो डॉक्टर शोधून देणारं ‘प्रॅक्टो’सारखं अॅप, मोबाइलवरून घरगुती कामांसाठी माणसं पुरविणारी व्यवस्था, सिनेमाची तिकिटं बुक करणारें अॅप. अशा नवकल्पना सा:यांनाच आकर्षित करताहेत. स्टार्टअप ही आपल्या देशासाठी नवी सुरुवात आहे. 1991 साली लायसन्स राजला दिलेल्या तिलांजलीनंतरही त्याचे काही अवशेष उरले होते, त्या अवशेषांमधून बाहेर पडण्याची आपल्यासाठी ही एक नवी संधी चालून आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी आपल्याला उपलब्ध नाही आणि त्यामध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे स्टार्टअप्स. त्याचाच हा लेखाजोखा.