शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

दौर बदला है, बदल जा, ऐ सुखनवर साथ चल!

By admin | Updated: April 23, 2016 12:55 IST

है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’ ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो

है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे  कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’
 
 ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो. पण, सुखनवर या शब्दावर येऊन गाडी अडकते अन् मग काही केल्या या ओळींचा अर्थच गवसत नाही. या शब्दाला वगळून अर्थ काढतो म्हटले तर ही शायरीच प्राणहीन होते. कारण, शायरीचा जन्मदाताच सुखनवर आहे. सुखन म्हणजे शायरी आणि सुखनवर म्हणजे शायर. उर्दूच्या अनेक नामवंत शायरांनी स्वत:ला म्हणजे सुखनवरला वाचकांपुढे कसे मांडले ते बघूयात. सुरुवात अल्फाजच्या या शेरपासून..
 
तेरे दामन ने सारे शहर को सैलाब से रोका
नही तो मेरे ये आसू समंदर हो गये होते
तुम्हे अहले सियासत ने कही का भी नही रखा
हमारे साथ रहते तो सुखनवर हो गये होते
 
काय जबरदस्त तुलना आहे बघा. कधीकाळी वैभवशाली राज्याचा प्रतीक असलेल्या तुला याच वैभवाने थेट वैराग्य पत्करण्याच्या स्थितीला आणून सोडले आहे. या वैभवाच्या नादी न लागता तू जर आमची सोबत केली असती तर तू शायर झाला असतास अन् शायराच्या महालातील शब्दांच्या श्रीमंतीला कधीच ओहटी लागत नाही. ही झाली सुखनवरची एक ओळख. पण, मुसाहिब नावाचा शायर वेगळंच सांगतोय. तो काय म्हणतो पाहा..
 
गुल गुलशन में इस कदर खो गये हैं..
खबर इतनी मिली की बेखबर हो गये है..
क्या पाया क्या खोया खबर कुछ नहीं है..
दूर होकर बस तुमसे सुखनवर हो गये है..
 
म्हणजे, प्रेमात लोकं कवी होतात असे म्हणतात ते काही खोटे नाही. सुखनवर होण्यासाठीचे निकषच प्रेम आहे, असा या शायरीचा अन्वयार्थ. ती दोन क्षणांसाठी विलग झाली अन् तिच्या विरहाच्या अग्नीने याच्या मनात शायरीची ज्योत प्रज्वलित झाली. असे घडतात सुखनवर. पण, सुखनवरचे विश्व असे इश्क आणि हुस्नपुरते मर्यादित राहू नये. बदलत्या काळासोबत त्याने आपला अंदाज-ऐ-बयाँही बदलला पाहिजे, असा विचार करणारेही काही शायर आहेत. मिथिलेश वामनकर त्यातलाच एक.
 
दौर बदला है, बदल जा, ऐ सुखनवर साथ चल 
सोचता है जिस जबां में, उस जबां में लिख गजल
खुद सुखन पैदा करेगी अपना इल्मे-फलसफा
तज्रिबा अपना सुना बस, छोड़ औरों की नकल
 
मिथिलेशच्या या ओळी अनुभवातून समृद्ध झाल्या आहेत. शायरने काळानुसार बदलले नाही तर काय घडते हीच भावना प्रमिला कशी मांडते बघा..
 
यही सुखनवर की है कहानी अश्क हैं उसकी आँखों में
हँसकर सारी महफिल चल दी उसका हाल नहीं पूछा.
- शफी पठाण
 
(लेखक ख्यातनाम शायर आणि ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे 
वरिष्ठ उपसंपादक आहेत)