शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

दौर बदला है, बदल जा, ऐ सुखनवर साथ चल!

By admin | Updated: April 23, 2016 12:55 IST

है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’ ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो

है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे  कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’
 
 ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो. पण, सुखनवर या शब्दावर येऊन गाडी अडकते अन् मग काही केल्या या ओळींचा अर्थच गवसत नाही. या शब्दाला वगळून अर्थ काढतो म्हटले तर ही शायरीच प्राणहीन होते. कारण, शायरीचा जन्मदाताच सुखनवर आहे. सुखन म्हणजे शायरी आणि सुखनवर म्हणजे शायर. उर्दूच्या अनेक नामवंत शायरांनी स्वत:ला म्हणजे सुखनवरला वाचकांपुढे कसे मांडले ते बघूयात. सुरुवात अल्फाजच्या या शेरपासून..
 
तेरे दामन ने सारे शहर को सैलाब से रोका
नही तो मेरे ये आसू समंदर हो गये होते
तुम्हे अहले सियासत ने कही का भी नही रखा
हमारे साथ रहते तो सुखनवर हो गये होते
 
काय जबरदस्त तुलना आहे बघा. कधीकाळी वैभवशाली राज्याचा प्रतीक असलेल्या तुला याच वैभवाने थेट वैराग्य पत्करण्याच्या स्थितीला आणून सोडले आहे. या वैभवाच्या नादी न लागता तू जर आमची सोबत केली असती तर तू शायर झाला असतास अन् शायराच्या महालातील शब्दांच्या श्रीमंतीला कधीच ओहटी लागत नाही. ही झाली सुखनवरची एक ओळख. पण, मुसाहिब नावाचा शायर वेगळंच सांगतोय. तो काय म्हणतो पाहा..
 
गुल गुलशन में इस कदर खो गये हैं..
खबर इतनी मिली की बेखबर हो गये है..
क्या पाया क्या खोया खबर कुछ नहीं है..
दूर होकर बस तुमसे सुखनवर हो गये है..
 
म्हणजे, प्रेमात लोकं कवी होतात असे म्हणतात ते काही खोटे नाही. सुखनवर होण्यासाठीचे निकषच प्रेम आहे, असा या शायरीचा अन्वयार्थ. ती दोन क्षणांसाठी विलग झाली अन् तिच्या विरहाच्या अग्नीने याच्या मनात शायरीची ज्योत प्रज्वलित झाली. असे घडतात सुखनवर. पण, सुखनवरचे विश्व असे इश्क आणि हुस्नपुरते मर्यादित राहू नये. बदलत्या काळासोबत त्याने आपला अंदाज-ऐ-बयाँही बदलला पाहिजे, असा विचार करणारेही काही शायर आहेत. मिथिलेश वामनकर त्यातलाच एक.
 
दौर बदला है, बदल जा, ऐ सुखनवर साथ चल 
सोचता है जिस जबां में, उस जबां में लिख गजल
खुद सुखन पैदा करेगी अपना इल्मे-फलसफा
तज्रिबा अपना सुना बस, छोड़ औरों की नकल
 
मिथिलेशच्या या ओळी अनुभवातून समृद्ध झाल्या आहेत. शायरने काळानुसार बदलले नाही तर काय घडते हीच भावना प्रमिला कशी मांडते बघा..
 
यही सुखनवर की है कहानी अश्क हैं उसकी आँखों में
हँसकर सारी महफिल चल दी उसका हाल नहीं पूछा.
- शफी पठाण
 
(लेखक ख्यातनाम शायर आणि ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे 
वरिष्ठ उपसंपादक आहेत)