शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ओळख भारतरत्नांची - इंदिरा गांधी

By admin | Updated: September 13, 2014 15:00 IST

गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

(भारतरत्न पुरस्कार सन १९७१)
 
गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. इंदिराजींचं शिक्षण महात्मा गांधींच्या आश्रमात, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ‘कायदेभंगाच्या चळवळी’त भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘बालसेना’ स्थापन केली. इंदिराजींचा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग होता. चळवळी, मोर्चे, सत्याग्रह, जखमींची सेवा, तुरुंगवास हे इंदिराजींच्या जीवनाचे अंग बनले होते.
इंदिरा गांधींनी अपंगांविषयी सहानुभूती होती. दीनदुबळ्या लोकांविषयी कळकळ वाटत होती. त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठे समाजकार्य केलं. त्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेने त्यांना १९५३ मध्ये ‘मातृ’ पारितोषिक दिलं. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा राष्ट्रीय संरक्षण मंडळाच्या सभासद म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर भारताच्या माहिती आणि नभोवणी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९६६ला भारताच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची निवड झाली. भारताच्या इतिहासात या एकाच स्त्रीनं पंतप्रधानपद भूषविलं. प्रौढ शिक्षण, शेतीचा विकास, पाणी, वीज, औद्योगिक विकास, संशोधन, अणुशक्ती, अंतराळ संशोधन, बँकांचे राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी इंदिरा गांधींनी भरपूर परिश्रम घेतले. १९७१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशविरुद्धचे युद्ध जिंकले होते. कुशल, कणखर, धाडसी, कर्तबगार व झुंजार नेत्या म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा राजकीय क्षेत्रावर उमटवला होता.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली. 
‘मृत्यू जवळपास वावरतो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत मी देशसेवेचे व्रत सोडणार नाही! ’ हे मृत्यूपुर्वी काढलेले उद्गार इंदिराजींनी खरे करून दाखविले.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)