शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
3
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
4
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
5
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका
6
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची मित्रराष्ट्रांकडे मदतीची याचना, अधिकचं कर्ज मागितलं
8
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
9
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
10
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
11
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
12
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
13
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
16
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
17
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
18
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
19
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
20
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या

ओळख भारतरत्नांची - इंदिरा गांधी

By admin | Updated: September 13, 2014 15:00 IST

गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

(भारतरत्न पुरस्कार सन १९७१)
 
गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. इंदिराजींचं शिक्षण महात्मा गांधींच्या आश्रमात, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ‘कायदेभंगाच्या चळवळी’त भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘बालसेना’ स्थापन केली. इंदिराजींचा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग होता. चळवळी, मोर्चे, सत्याग्रह, जखमींची सेवा, तुरुंगवास हे इंदिराजींच्या जीवनाचे अंग बनले होते.
इंदिरा गांधींनी अपंगांविषयी सहानुभूती होती. दीनदुबळ्या लोकांविषयी कळकळ वाटत होती. त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठे समाजकार्य केलं. त्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेने त्यांना १९५३ मध्ये ‘मातृ’ पारितोषिक दिलं. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा राष्ट्रीय संरक्षण मंडळाच्या सभासद म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर भारताच्या माहिती आणि नभोवणी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९६६ला भारताच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची निवड झाली. भारताच्या इतिहासात या एकाच स्त्रीनं पंतप्रधानपद भूषविलं. प्रौढ शिक्षण, शेतीचा विकास, पाणी, वीज, औद्योगिक विकास, संशोधन, अणुशक्ती, अंतराळ संशोधन, बँकांचे राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी इंदिरा गांधींनी भरपूर परिश्रम घेतले. १९७१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशविरुद्धचे युद्ध जिंकले होते. कुशल, कणखर, धाडसी, कर्तबगार व झुंजार नेत्या म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा राजकीय क्षेत्रावर उमटवला होता.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली. 
‘मृत्यू जवळपास वावरतो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत मी देशसेवेचे व्रत सोडणार नाही! ’ हे मृत्यूपुर्वी काढलेले उद्गार इंदिराजींनी खरे करून दाखविले.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)