शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

लेखक-प्रकाशकांचे संबंध अतिशय गलिच्छ

By admin | Updated: April 20, 2016 00:57 IST

लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकाच्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहितीच काय पण पैशाचा हिशोबही प्रकाशकांकडून लेखकाला दिला

पुणे : लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकाच्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहितीच काय पण पैशाचा हिशोबही प्रकाशकांकडून लेखकाला दिला जात नाही, असा आरोप करीत ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी मराठीतील लेखक आणि प्रकाशकांचे संबंध गलिच्छ आहेत, अशा शब्दांत प्रकाशकांवर तोफ डागली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मसाप कट्ट्या’चे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते मंगळवारी झाले. पहिले पुष्प राजन खान यांच्या मुलाखतीमधून गुंफण्यात आले. नीलिमा बोरवणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. खान म्हणाले, ‘‘लेखकांच्या बुडाखाली याच प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकांच्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या गेल्या, याचा हिशेब दिला जात नाही. मराठी साहित्यामध्ये प्रकाशक केवळ पैसे कमाविण्यासाठी आले आहेत. मराठी साहित्य उन्नत करायचे असेल, तर मराठीमध्ये आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक झाले पाहिजेत. साहित्यिक आणि प्रकाशकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परिषदेने पुढाकार घ्यावा.’’ साहित्य संमेलनाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वार्षिक बाजार भरतो, त्याला माझा पाठिंबाच आहे. या संमेलनामध्ये वाद, राडा होतो, पण होऊ दे. जोपर्यंत कुणाचा खून होत नाही तोपर्यंत संमेलन बंद व्हायला पाहिजे, असे मी म्हणणार नाही, कारण ‘साहित्य’ या शब्दाने माणसाचे किमान लक्ष्य तरी साहित्याकडे केंद्रित होते.’’(प्रतिनिधी)> ई-बुकला माझा नेहमीच विरोध आहे. मला न विचारता एका ई-बुक संकेतस्थळावर माझे पुस्तक टाकण्यात आले आहे. हा कॉपीराईटचा भंग असल्याने ई-बुक प्रकाशक आणि संकेतस्थळावर दावा दाखल करणार असल्याचे सूतोवाच राजन खान यांनी केले. या पृथ्वीवर अद्याप स्वत:चे घर नाही, हे एक अपुरे राहिलेले स्वप्न आहे. ६५ पुस्तके नावावर असलेल्या लेखकाकडे स्वत:चे घर नाही. ते स्वप्न पूर्णही होणार नाही. या स्वप्नपूर्तीसाठी तडफडत लिहीत राहिलो. पण हेच अपूर्ण स्वप्न जगण्याची उमेद देते. ते पूर्ण होऊ नये, असेच वाटते. विषय सुचणे ही उत्स्फूर्त गोष्ट आहे. मी लिहिण्याला सुरूवात करतो पुढे तो विषय ठरवतो. लघुकथा लिहायला जातो आणि होतात त्याच्या दीर्घकथा. मुळात ही लघु, दीर्घ, लघुत्तम अशी मांडणीच मला मान्य नाही.