शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

मिहानमध्ये काम सुरूकरा अन्यथा भूखंड परत घेणार

By admin | Updated: November 17, 2014 01:06 IST

मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू

मुख्यमंत्र्यांचा कंपन्यांना इशारा : एम्स, आयआयएमसह केंद्रीय संस्थांना देणार जागानागपूर : मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे भूखंड परत घेतले जातील, असा स्पष्ट इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी नागपूरमध्ये आल्यावर सर्वप्रथम मिहानचा आढावा घेतला होता. यावरून त्यांच्या प्राधान्यक्रमात ‘मिहान प्रकल्प’ असल्याचे स्पष्ट झाले होते. मिहानमध्ये भूखंड घेऊनही अनेक बड्या कंपन्यांनी अद्याप त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ज्या कंपन्यांनी वारंवार सांगूनही त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत त्यांचे भूखंड परत घेऊ. जागा वाटपाच्या सूत्रात बदल करून त्यात एकसूत्रता आणि पारदर्शकता आणू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून तो ९० वर्षे केला जाईल. नागपूर विमानतळाचा विकास दोन टप्प्यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले. टॅक्सी-वे च्या संदर्भात जी जागा अधिग्रहित करायची आहे त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मिहानमधील वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाल्यावर येथे अनेक कंपन्या येतील. अनेक कंपन्यांशी यासंदर्भात चर्चाही झाली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात एमएमटी (टॅक्स) उद्योजकांसाठी अडचणीचा आहे. केंद्र सरकार याचा फेरविचार करीत आहे, असे ते म्हणाले.केंद्रीय संस्थांना देणार जागाबिगर विशेष आर्थिक क्षेत्रात (नॉन एसीझेड) दोन ते अडीच हजार हेक्टर जागा शिल्लक आहे. ही जागा केंद्रीय संस्थांना देण्याचा सरकारचा विचार आहे. तशी कायद्यात दुरुस्तीसुद्धा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आयआयएम, एम्स, प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी संस्था यासह चार केंद्रीय संस्थांचा समावेश आहे,असे फडणवीस म्हणाले. नॅशनल लॉ स्कूल, ट्रिपल आयटी या संस्थांना यापूर्वीच जागा देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. अन्यथा त्यांनाही बिगर विकास आर्थिक क्षेत्रात जागा देऊन केंद्राच्या सर्व संस्था नागपूरमध्ये एकाच ठिकाणी ठेवण्याचा आपला विचार होता, असे ते म्हणाले.