शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळांचा विकास पालिका कधी करणार?

By admin | Updated: May 18, 2016 03:50 IST

पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

हुसेन मेमन,

जव्हार- पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र तसेच दमण व गुजरात राज्यातील शेकडो पर्यटक येथे येत असतात. समुद्र सपाटीपासून १७०० फुट उंचीवर असलेल्या या शहरात व तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. पर्यटन विकास निधीतून काही स्थळांचा थोडाफार विकास झाला खरा परंतु शहरातील हनुमान पॉइंट , सनसेट पॉइंट , शिरपामाळ , जयसागर धरण , शिवाजी उद्यान , सूर्य तलाव , यांचा म्हणावा तितका विकास आजही झालेला नाही. १० वर्षा पूर्वी पालिकेत शिवसेनेची सत्ता असतांना त्यांनी खासदार निधीतून सनसेट व हनुमान पॉइंट येथे संरक्षक भिंत व पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून काही प्रमाणात कामे केली. मात्र मध्यंतरीच्या काळात या स्थळांकडे दुर्लक्षच झाले. लाल माती हे जव्हार चे विशिष्ट परंतु विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण केल्यामुळे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वास्तविक नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करावयास हवा होता.ओसाड ठिकाणी विविध आकर्षक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले असते तर प्रत्तेक ठिकाणी गर्द मोठे वृक्ष होऊन वनराई झाली असती. परंतु आजपर्यंत दरवर्षी नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या वृक्ष करातून पावसाळ्यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली पालिका निकृष्ट दर्जाची छोटी रोपे लावते व आपला कर सत्कारणी लावल्याचा देखावा निर्माण करते. त्याकडे नंतर ढुंकूनही पाहिले जात नसल्यामुळे ती रोपे मरून जातात. पुन्हा पुढील वर्षी त्याच ठिकाणी लाखोंचा खर्च करून वृक्षारोपण केले जाते. हा गोरखधंदा आजही चालू आहे. ।हिरवळ वाळली, खेळण्यांची झाली वाताहतवृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावयास हवे होते.ते काम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दासांनी ५ वर्षापासून केल्यामुळे आज अनेक झाडांना नवी पालवी फुटली आहे. परंतु प्रत्येक स्थळांच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी बसविणे , हिरवळ लावणे , हि कामे झालीच नाहीच उलट शिवाजी उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हनुमान पॉर्इंट येथे तर महिन्यापूर्वी बसण्यासाठी एकही बाक नसल्यामुळे पर्यटकांत तीव्र नाराजी होती. जव्हार मर्चंट पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून तिथे ५ बाक बसविण्यात आलेत.परंतु ते पुरेसे नाहीत. लहान मुले , महिला , व जेष्ठ नागरिकांची त्यामुळे मोठी कुचंबणा होते. लहान मुले तेथील लोखंडी पाईप वर बसत असतात खाली मोठी दरी असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी तरी पालिकेने वृक्ष कराचा योग्य विनियोग करावा , सर्वसाधारण निधीतून प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय करावी व लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरण न करता निसर्ग सौंदर्य वाढवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे