शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

पर्यटनस्थळांचा विकास पालिका कधी करणार?

By admin | Updated: May 18, 2016 03:50 IST

पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

हुसेन मेमन,

जव्हार- पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र तसेच दमण व गुजरात राज्यातील शेकडो पर्यटक येथे येत असतात. समुद्र सपाटीपासून १७०० फुट उंचीवर असलेल्या या शहरात व तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. पर्यटन विकास निधीतून काही स्थळांचा थोडाफार विकास झाला खरा परंतु शहरातील हनुमान पॉइंट , सनसेट पॉइंट , शिरपामाळ , जयसागर धरण , शिवाजी उद्यान , सूर्य तलाव , यांचा म्हणावा तितका विकास आजही झालेला नाही. १० वर्षा पूर्वी पालिकेत शिवसेनेची सत्ता असतांना त्यांनी खासदार निधीतून सनसेट व हनुमान पॉइंट येथे संरक्षक भिंत व पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून काही प्रमाणात कामे केली. मात्र मध्यंतरीच्या काळात या स्थळांकडे दुर्लक्षच झाले. लाल माती हे जव्हार चे विशिष्ट परंतु विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण केल्यामुळे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वास्तविक नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करावयास हवा होता.ओसाड ठिकाणी विविध आकर्षक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले असते तर प्रत्तेक ठिकाणी गर्द मोठे वृक्ष होऊन वनराई झाली असती. परंतु आजपर्यंत दरवर्षी नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या वृक्ष करातून पावसाळ्यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली पालिका निकृष्ट दर्जाची छोटी रोपे लावते व आपला कर सत्कारणी लावल्याचा देखावा निर्माण करते. त्याकडे नंतर ढुंकूनही पाहिले जात नसल्यामुळे ती रोपे मरून जातात. पुन्हा पुढील वर्षी त्याच ठिकाणी लाखोंचा खर्च करून वृक्षारोपण केले जाते. हा गोरखधंदा आजही चालू आहे. ।हिरवळ वाळली, खेळण्यांची झाली वाताहतवृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावयास हवे होते.ते काम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दासांनी ५ वर्षापासून केल्यामुळे आज अनेक झाडांना नवी पालवी फुटली आहे. परंतु प्रत्येक स्थळांच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी बसविणे , हिरवळ लावणे , हि कामे झालीच नाहीच उलट शिवाजी उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हनुमान पॉर्इंट येथे तर महिन्यापूर्वी बसण्यासाठी एकही बाक नसल्यामुळे पर्यटकांत तीव्र नाराजी होती. जव्हार मर्चंट पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून तिथे ५ बाक बसविण्यात आलेत.परंतु ते पुरेसे नाहीत. लहान मुले , महिला , व जेष्ठ नागरिकांची त्यामुळे मोठी कुचंबणा होते. लहान मुले तेथील लोखंडी पाईप वर बसत असतात खाली मोठी दरी असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी तरी पालिकेने वृक्ष कराचा योग्य विनियोग करावा , सर्वसाधारण निधीतून प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय करावी व लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरण न करता निसर्ग सौंदर्य वाढवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे