शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पश्चिम महाराष्ट्रात उसनवारीच!

By admin | Updated: June 18, 2016 00:52 IST

महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना आज स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात आजही स्वबळ उभी करण्यात अपयशीच ठरली आहे, असे म्हणायला

- वसंत भोसले (पश्चिम महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना आज स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात आजही स्वबळ उभी करण्यात अपयशीच ठरली आहे, असे म्हणायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय बळाच्या जोरावर कॉँग्रेसने अनेक वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. या पक्षाला पर्याय देण्याची निर्णायक ताकद इतर कोणत्याही पक्षांनी आजवर निर्माण केली नाही. याची कारणे दोन आहेत. एक तर सहकारी संस्थात्मक रचनेच्या माध्यमातून कॉँग्रेस विचारांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. त्यातून सामान्य माणसाला आधार देणारी शिवसेना ज्या पध्दतीने मुंबईत काम करते. तसेच काम कॉँग्रेस अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रात करत असल्याने या पक्षाचा आधार भक्कम आहे. तो तोडणे शिवसेनेला आजही कठीण जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून ५८ आमदार व दहा खासदार निवडून जातात. विद्यमान सभागृहात यापैकी बारा आमदार व दोन खासदार शिवसेनेचे आहेत. बारापैकी केवळ चार आमदार व एक खासदार मूळचे शिवसैनिक आहेत. बाकीचे सर्व आज शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत असले तरी त्यांची जडणघडण ही विविध पक्षांमध्ये झाली आहे. एकीकडे कॉँग्रेस विचारांच्या पक्षांची गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी असताना शिवसेनेला आपला पक्ष रुजविणे कठीण गेले. कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, म्हणून नेते तयार होत नाहीत. नेतृत्व नसल्याने संस्थात्मक बांधणी करुन कॉँग्रेसविरोधात टिकाव धरता येत नाही. आजही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेचे स्थान नगण्यच आहे. मुंबई किंवा कोकणात, तसेच काही प्रमाणात मराठवाड्यात शिवसेना ज्या पध्दतीने सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाते, लोकांना त्यांचा आधार वाटतो तशा स्वरुपाची कामे करण्यासाठी कॉँग्रेसची यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सामान्य माणस आजही शिवसेनेला स्वीकारत नाहीत किंवा त्यांच्याकडे जात नाहीत. आज जे आमदार किंवा खासदार निवडून आलेत, त्यातील बहुतांश जण हे कॉँग्रेसअंतर्गत निर्माण झालेल्या सत्तास्पर्धेतून शिवसेनेकडे वळले आहेत. त्यांच्या निवडणुकीपुरती शिवसेना दिसते आणि इतरवेळी मात्र ते कॉँग्रेस पक्षाप्रमाणे, कॉँग्रेसबरोबर काम करत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे सर्वाधिक सहा आमदार निवडून आले आहेत. मात्र दोघांचा अपवाद सोडला तर बाकीचे केव्हाही समाजात शिवसेना म्हणून सहभागी होत नाहीत. परिणामी शिवसेनेचा एक पक्ष म्हणून विस्तार खुंटलेलाच आहे. कॉँग्रेस पक्षांच्या अंतर्गत स्पर्धेतून ज्यांना संधी मिळत नाही, तेच शिवसेनेचा आधार घेतात आणि शिवसेनेकडे बहुतांश भागात नेतृत्व नसल्याने शिवसेना त्यांचा उसनवारीसारखा आधार घेऊन कॉँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सेनेची पश्चिम महाराष्ट्रातील वाटचालही उसनवारीवर चालू आहे. २ खासदार । १२ आमदार बलस्थाने : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून ५८ आमदार व दहा खासदार निवडून जातात. विद्यमान सभागृहात यापैकी बारा आमदार व दोन खासदार शिवसेनेचे आहेत. बारापैकी केवळ चार आमदार व एक खासदार मूळचे शिवसैनिक आहेत.कमकुवत बाजू : मुंबई किंवा कोकणात, तसेच काही प्रमाणात मराठवाड्यात शिवसेना ज्या पध्दतीने सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाते, लोकांना त्यांचा आधार वाटतो तशा स्वरुपाची कामे करण्यासाठी कॉँग्रेसची यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सामान्य माणस आजही शिवसेनेला स्वीकारत नाहीत किंवा त्यांच्याकडे जात नाहीत.