शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पाणीकर वाढीचा मुद्दा गाजणार

By admin | Updated: June 13, 2016 04:08 IST

महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत पाणीदरात वाढ करण्याचा ठराव मंजूर केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत पाणीदरात वाढ करण्याचा ठराव मंजूर केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. नियमित पाणी देण्याचे नियोजन नसताना ही दरवाढ चुकीची असल्याचा संतप्त सूर सर्व स्तरांतून उमटत आहे.महासभेतील ठरावानुसार जे मालमत्ताधारक पाणीपट्टी भरतात, त्यांच्यावर या नवीन कराचा अतिरिक्त भार पडला आहे. वास्तविक, शहरातील इमारतींत राहणारे नागरिक नियमित पाणीकर भरत असताना त्यांना सोसायटीचा पाणीकर व मालमत्तेवर लावलेला पाणीकर असे दोन पाणीकर भरण्यास लावणे, ही मनपा प्रशासनाची भूमिका अन्यायकारक आहे. सध्या महानगरपालिकेच्या करवसुली विभागातील कर्मचारी ३० टक्के पाणीकर वसुली करीत आहेत. त्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून वाढ झालेली नाही. अशा स्थितीत जे नागरिक कर भरत आहेत, त्यांच्यावर अतिरिक्त बोजा टाकल्यास पालिकेचे नुकसान होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अशाच प्रकारे उलटसुलट वीजबिलाची आकारणी केली असता वीजचोरीचे प्रमाण वाढले, ते टोरेंट पॉवर कंपनी आल्यानंतर कमी झाले. मात्र, त्यांनाही गेल्या १० वर्षांत परिस्थिती पूर्ववत करता आली नाही.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही पाणीदराची आकारणी करताना वातानुकूलित दालनात बसून केवळ आकड्यांचा खेळ केल्याचे दिसून येते. मनपाच्या ३० मार्चच्या महासभेतील ठरावात मालमत्तेच्या स्वरूपानुसार पाणीकराची आकारणी केली आहे. त्यानुसार, पत्राशेड १८०० रुपये, झोपडपट्टी १५०० रुपये व आरसीसी इमारतींना २१०० रुपये, अशी नवीन पाणीकर आकारणी सुरू केली आहे. वास्तविक, पत्राशेड व झोपडपट्टीपेक्षा आरसीसी इमारतींत राहणाऱ्या नागरिकांची संख्या निश्चित कमी आहे. त्यातच, आरसीसीमधील रहिवासी नियमित पाणीकर भरत असल्याचे आढळून येईल. त्यामुळे या वस्तुस्थितीवर निश्चितपणे विचार होणे गरजेचे आहे. सर्वांना पूर्वीप्रमाणे १५०० रुपयांचा पाणीकर कायम राहिला पाहिजे.मुंबई महानगरपालिका, स्टेम व वऱ्हाळा तलाव यामधून मिळणारे ११५ एमएलटी पाणी मनपा क्षेत्रात कशा प्रकारे वितरीत केले जाते, याबाबत मनपाकडे तपशील नाही. वास्तविक, पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी व काही आजी-माजी नगरसेवक मिळून डाइंगना चोरीने पाणीपुरवठा करीत असून त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. शहरात एकात्मिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या १४ टाक्या बांधल्या आहेत. त्या टाक्या १० वर्षांपासून सुरू झालेल्या नाहीत. या टाक्या सुरू झाल्या असत्या, तर प्रत्येक विभागात जास्त दाबाने पाणी मिळाले असते. त्यामुळे पाणीकपातीचा सामना सर्वांना करावा लागत आहे. शहरातील ७० टक्के मालमत्ताधारक पाणीपट्टी भरत नसल्याने ३० टक्के लोकांना हा भुर्दंड न देता सरसकट सर्वांना पाणीकर माफ करावा, असा प्रस्ताव महानगरपालिकेचे पहिले महापौर सुरेश टावरे यांनी मांडला होता. या घटनेस १५ वर्षे झाली तरी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात व वसुलीत कोणतीही सुधारणा झाली नाही. हे मनपाच्या प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. करवाढीची मागणी करताना प्रशासनाने प्रथम पाणी वितरण व्यवस्थेकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे डाइंगकडून होणारी पाणीचोरी थांबवली पाहिजे. पुढील वर्षी मनपाची सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे पाणीकर वाढीचे नाट्य पुढे चांगलेच रंगणार आहे.- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी