शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वाशिम जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा!

By admin | Updated: July 5, 2014 23:49 IST

कुपोषित बालकांची संख्या हजारावर : मानोरा तालुक्यात सर्वाधिक कुपोषण

वाशिम : राज्यात विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या वाशिम जिल्हा कुपोषाच्या विळख्यात सापडला असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. मानोरा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असून वाशिम तालुक्याचा याबाबत दुसरा क्रमांक आहे. बालकांचे कुपोषण ही आज सार्वत्रिक समस्या बनली आहे. केवळ ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातच बालकांचे कुपोषण आहे असे नव्हे तर विकासात पुढे असणार्‍या शहरी भागातही आता बालकांचे कुपोषण आढळून येत आहे. ** महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे वय व वजनाच्या आणि उंची व लांबीच्या अशा दोन निकषानुसार दरमहा सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात वाशिम जिल्हय़ात जून महिन्यात शुन्य ते सहा वयोगटातील ९२,३७२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात वाशिम तालुक्यातील १७८८९, रिसोड १५१७५, मालेगाव १८३७४, मंगरुळपीर १३,८१0, कारंजा ११३८७ व मानोरा तालुक्यातील १५७३७ बालकांचा समावेश होता.यापैकी वय व वजनानुसार ८४९८0 बालक सामान्य श्रेणीत आढळले. किमान वजन निकषाखाली कुपोषित श्रेणीत ६३२२ तर कमाल वजन निकषाखालील तीव्र कुपोषित बालकांच्या श्रेणीत १0७0 बालक असल्याचे आढळून आले.** याचप्रमाणे लांबी उंचीनुसार ९२,३७२ बालकांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९१,४७२ बालक सर्वसाधारण श्रेणीत असल्याचे आढळून आले. यापैकी किमान लांबीव उंचीच्या निकषाखालील कुपोषित श्रेणीत ७२१ तर कमाल लांबी व उंचीच्या निकषाखालील तीव्र कुपोषित श्रेणीत १७९ बालक असल्याचे आढळून आले.यात कुपोषणाच्या सर्वेक्षणाच्या दोन्ही पद्धतीत मानोरा तालुक्यात सर्वाधिक तर वाशिम तालुक्यात त्या खालोखाल कुपोषित बालक आढळून आले आहेत.** मागीलवषी जिल्ह्यामध्ये पावसाळय़ात अतवृष्टीने तर हिवाळय़ात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांची स्थिती यंदा हलाखीची झाली आहे. अशा स्थितीचा परिणाम बालक कुपोषित होण्यावर झाला आहे.वाशिम जिल्हय़ात मानोरा तालुका जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांपेक्षा विकासाच्या प्रक्रियेत मागासलेला आहे. जिल्हय़ातील कारंजा तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात एमआयडीसीने औद्योगिक वसाहती विकसित केल्या असल्या तरी तेथे एकही मोठा उद्योग आजस्थितीत सुरु नाही. परिणामी, शेती व लहान-मोठे व्यवसाय हेच लोकांचे रोजगाराचे साधन आहे. त्यातही जिल्हय़ातील लागवडीयोग्य ४ लाख ३१ हजार शेतजमिनीपैकी केवळ ६८ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली असल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कोरडवाहू शेती व रोजमजुरी हे आहे.