शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वऱ्हाडातील अल्प जलसाठा!

By admin | Updated: May 24, 2017 02:20 IST

बाष्पीभवन वाढले; टंंचाईच्या झळा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा धरणात २४ टक्केच जलसाठा आहे. उन्हाचा कडाकाही ४५ अंशांवर पोहोचला. पाण्याचे दररोज १४ ते १८ मि.मी. एवढे बाष्पीभवन होत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक सांगण्यात येत असला, तरी वेळेवरील वाऱ्याचा वेग व परिस्थिती यावर पावसाचे आगमन अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात २४.३७ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.३०, निर्गुणा १४.६९, उमा धरणात ४.७ टक्के तर दगडपारवा धरणातीलजलसाठा शून्य आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ५४.९६ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १०.१५ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा आहे. पेणटाक ळी धरणात १.७२ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २६.३७, मसमध्ये १३.३६ टक्के, कोराडी १०.२८, पलढग १८.५१, मन ३.७७, तोरणा २.२८ टक्के तर उतावळी धरणात १६.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १७.०३ टक्के, सोनलमध्ये २.७० तर एकबुर्जी प्रकल्पात २०.४० टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील उध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ३७.८७ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४७.६८, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा २०.१३ तर सपन या धरणात ४२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ९.४२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.६०, बेंबळा धरणात २५.५३, लोअर पूसमध्ये २६.६०, सायखेडा १९.४६, गोकी १७.५६, वाघाडी १६.२६, बोरगाव ७.४१ टक्के, नवरगाव धरणात १४.२६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. टँकरची मागणी वाढली !अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोल्यात सध्या चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील जलसाठा!विभागातील मोठ्या नऊ धरणांमध्ये आजमितीस २६.२८ टक्के जलसाठा असून, २३ मध्यम प्रकल्पात २२.४१ टक्के, तर ४८० लघू प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. एकूण सरासरी हा जलसाठा २१.०६ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा आहे. सध्या ज्या पद्धतीने वितरण होत आहे, या पद्धतीनेच झाले तर हा जिवंत जलसाठा जून महिन्यापर्यंत पुरू शकतो. -विजय लोळे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.