शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील अल्प जलसाठा!

By admin | Updated: May 24, 2017 02:20 IST

बाष्पीभवन वाढले; टंंचाईच्या झळा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा धरणात २४ टक्केच जलसाठा आहे. उन्हाचा कडाकाही ४५ अंशांवर पोहोचला. पाण्याचे दररोज १४ ते १८ मि.मी. एवढे बाष्पीभवन होत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक सांगण्यात येत असला, तरी वेळेवरील वाऱ्याचा वेग व परिस्थिती यावर पावसाचे आगमन अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात २४.३७ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.३०, निर्गुणा १४.६९, उमा धरणात ४.७ टक्के तर दगडपारवा धरणातीलजलसाठा शून्य आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ५४.९६ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १०.१५ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा आहे. पेणटाक ळी धरणात १.७२ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २६.३७, मसमध्ये १३.३६ टक्के, कोराडी १०.२८, पलढग १८.५१, मन ३.७७, तोरणा २.२८ टक्के तर उतावळी धरणात १६.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १७.०३ टक्के, सोनलमध्ये २.७० तर एकबुर्जी प्रकल्पात २०.४० टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील उध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ३७.८७ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४७.६८, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा २०.१३ तर सपन या धरणात ४२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ९.४२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.६०, बेंबळा धरणात २५.५३, लोअर पूसमध्ये २६.६०, सायखेडा १९.४६, गोकी १७.५६, वाघाडी १६.२६, बोरगाव ७.४१ टक्के, नवरगाव धरणात १४.२६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. टँकरची मागणी वाढली !अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोल्यात सध्या चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील जलसाठा!विभागातील मोठ्या नऊ धरणांमध्ये आजमितीस २६.२८ टक्के जलसाठा असून, २३ मध्यम प्रकल्पात २२.४१ टक्के, तर ४८० लघू प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. एकूण सरासरी हा जलसाठा २१.०६ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा आहे. सध्या ज्या पद्धतीने वितरण होत आहे, या पद्धतीनेच झाले तर हा जिवंत जलसाठा जून महिन्यापर्यंत पुरू शकतो. -विजय लोळे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.