शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील अल्प जलसाठा!

By admin | Updated: May 24, 2017 02:20 IST

बाष्पीभवन वाढले; टंंचाईच्या झळा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा धरणात २४ टक्केच जलसाठा आहे. उन्हाचा कडाकाही ४५ अंशांवर पोहोचला. पाण्याचे दररोज १४ ते १८ मि.मी. एवढे बाष्पीभवन होत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक सांगण्यात येत असला, तरी वेळेवरील वाऱ्याचा वेग व परिस्थिती यावर पावसाचे आगमन अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात २४.३७ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.३०, निर्गुणा १४.६९, उमा धरणात ४.७ टक्के तर दगडपारवा धरणातीलजलसाठा शून्य आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ५४.९६ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १०.१५ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा आहे. पेणटाक ळी धरणात १.७२ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २६.३७, मसमध्ये १३.३६ टक्के, कोराडी १०.२८, पलढग १८.५१, मन ३.७७, तोरणा २.२८ टक्के तर उतावळी धरणात १६.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १७.०३ टक्के, सोनलमध्ये २.७० तर एकबुर्जी प्रकल्पात २०.४० टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील उध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ३७.८७ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४७.६८, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा २०.१३ तर सपन या धरणात ४२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ९.४२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.६०, बेंबळा धरणात २५.५३, लोअर पूसमध्ये २६.६०, सायखेडा १९.४६, गोकी १७.५६, वाघाडी १६.२६, बोरगाव ७.४१ टक्के, नवरगाव धरणात १४.२६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. टँकरची मागणी वाढली !अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोल्यात सध्या चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील जलसाठा!विभागातील मोठ्या नऊ धरणांमध्ये आजमितीस २६.२८ टक्के जलसाठा असून, २३ मध्यम प्रकल्पात २२.४१ टक्के, तर ४८० लघू प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. एकूण सरासरी हा जलसाठा २१.०६ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा आहे. सध्या ज्या पद्धतीने वितरण होत आहे, या पद्धतीनेच झाले तर हा जिवंत जलसाठा जून महिन्यापर्यंत पुरू शकतो. -विजय लोळे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.