शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या पॅकेजची प्रतीक्षा

By admin | Updated: November 30, 2014 00:53 IST

दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे.

उद्ध्वस्त शेती : खरीप हंगाम बुडाला, रबीही बुडतोय, पाणी आहे पण वीज नाही यवतमाळ : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात बहुतांश पेरा हा सोयाबीन व कापसाचा आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम बुडाला आहे. पश्चिम विदर्भातील बहुतांश गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. यवतमाळ जिल्हा तर पूर्णत: दुष्काळात गेला आहे. येथील सर्वच गावांची पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या आत आहे. यवतमाळ जिल्ह्याची सरासरी आणेवारी ४६ टक्के आहे. सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्यानंतर कपाशीकडून शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. सोयाबीन ज्वारीच्या आकाराचा झाला. त्याचे एकरी उत्पादन अवघे ५० ते २०० क्ंिवटल एवढे झाले. अनेक शेतकऱ्यांनी तर खर्च परवडत नाही म्हणून सोयाबीन काढण्याऐवजी त्यात जनावरे सोडली. आता कपाशीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. कापसाचे बोंड भरले नाही. त्यातच बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. खरीप हंगाम बुडाल्यानंतर शेतकरी रबी हंगामावर अवलंबून होता. एकट्या अमरावती विभागात रबीचे क्षेत्र १० लाख हेक्टर एवढे आहे. त्यात तब्बल पाच लाख हेक्टरमध्ये हरभरा लागवड केली जाते. आधीच या विभागात सिंचनाच्या सोई नाहीत. कुठे धरण आहे तर कालवे नाहीत, कुठे कालवे फुटलेले आहेत, त्यात झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे ‘टेल’पर्यंत पाणी पोहोचत नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेतून विहिरी खोदल्या मात्र विहिरींसाठी लागणाऱ्या खर्चाच्या अर्धीच रक्कम शासनाकडून मिळाली, त्यासाठीही प्रचंड येरझारा मारुनही चिरीमिरी द्यावीच लागली. अखेर काही शेतकऱ्यांनी पुरेसे पैसे न मिळाल्याने या विहिरी बुजविल्या तर कुणी दागिने गहाण ठेवून या विहिरी खणल्या. त्यावर कर्ज करून मोटारपंप बसविले. परंतु वीज मंडळ सिंचनासाठी पुरेशी वीज देण्यात अपयशी ठरले आहे. तासन्तास वीज पुरवठा खंडित राहतो. दिवसा तर भारनियमनामुळे वीज मिळतच नाही. रात्रीला अवघी दोन ते तीन तास वीज मिळते. जीव धोक्यात घालून रात्रीला सिंचनासाठी शेतात जावे लागते. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते तत्काळ दुरुस्त करण्याची तसदीही वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी घेत नाहीत. आधी पैसे भरा, नंतर ट्रान्सफार्मर देऊ, अशी ताठर भूमिका या दुष्काळी परिस्थितीतही वीज कंपनीकडून शेतकऱ्यांप्रती घेतली जात आहे. विहिरीत पाणी आहे पण ते काढण्यासाठी वीजच नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पर्यायाने खरिपापाठोपाठ शेतकऱ्यांचा रबी हंगामही बुडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असल्याने शासनाने ३३ टक्के वीज बिल माफी, सक्तीच्या कर्ज वसुलीला चाप लावला असला तरी बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष सक्ती करीत आहेत. त्यासाठी तुमचे कर्ज वाढेल, व्याज वाढेल, चक्रवाढ व्याज लागेल, पुढील वर्षी कर्ज मिळणार नाही, शेती जप्ती होईल, अशी भीती दाखविली जात आहे. या दुष्काळी स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने केंद्राकडे साडेचार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. तशी घोषणाही झाली. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटींच्या या पॅकेजकडे लक्ष लागले आहे. या पॅकेजमधून मदत वाटप करताना नेमके कोणते निकष लावले जातील हे मात्र स्पष्ट नाही. (जिल्हा प्रतिनिधी)