शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या पॅकेजची प्रतीक्षा

By admin | Updated: November 30, 2014 00:53 IST

दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे.

उद्ध्वस्त शेती : खरीप हंगाम बुडाला, रबीही बुडतोय, पाणी आहे पण वीज नाही यवतमाळ : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात बहुतांश पेरा हा सोयाबीन व कापसाचा आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम बुडाला आहे. पश्चिम विदर्भातील बहुतांश गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. यवतमाळ जिल्हा तर पूर्णत: दुष्काळात गेला आहे. येथील सर्वच गावांची पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या आत आहे. यवतमाळ जिल्ह्याची सरासरी आणेवारी ४६ टक्के आहे. सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्यानंतर कपाशीकडून शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. सोयाबीन ज्वारीच्या आकाराचा झाला. त्याचे एकरी उत्पादन अवघे ५० ते २०० क्ंिवटल एवढे झाले. अनेक शेतकऱ्यांनी तर खर्च परवडत नाही म्हणून सोयाबीन काढण्याऐवजी त्यात जनावरे सोडली. आता कपाशीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. कापसाचे बोंड भरले नाही. त्यातच बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. खरीप हंगाम बुडाल्यानंतर शेतकरी रबी हंगामावर अवलंबून होता. एकट्या अमरावती विभागात रबीचे क्षेत्र १० लाख हेक्टर एवढे आहे. त्यात तब्बल पाच लाख हेक्टरमध्ये हरभरा लागवड केली जाते. आधीच या विभागात सिंचनाच्या सोई नाहीत. कुठे धरण आहे तर कालवे नाहीत, कुठे कालवे फुटलेले आहेत, त्यात झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे ‘टेल’पर्यंत पाणी पोहोचत नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेतून विहिरी खोदल्या मात्र विहिरींसाठी लागणाऱ्या खर्चाच्या अर्धीच रक्कम शासनाकडून मिळाली, त्यासाठीही प्रचंड येरझारा मारुनही चिरीमिरी द्यावीच लागली. अखेर काही शेतकऱ्यांनी पुरेसे पैसे न मिळाल्याने या विहिरी बुजविल्या तर कुणी दागिने गहाण ठेवून या विहिरी खणल्या. त्यावर कर्ज करून मोटारपंप बसविले. परंतु वीज मंडळ सिंचनासाठी पुरेशी वीज देण्यात अपयशी ठरले आहे. तासन्तास वीज पुरवठा खंडित राहतो. दिवसा तर भारनियमनामुळे वीज मिळतच नाही. रात्रीला अवघी दोन ते तीन तास वीज मिळते. जीव धोक्यात घालून रात्रीला सिंचनासाठी शेतात जावे लागते. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते तत्काळ दुरुस्त करण्याची तसदीही वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी घेत नाहीत. आधी पैसे भरा, नंतर ट्रान्सफार्मर देऊ, अशी ताठर भूमिका या दुष्काळी परिस्थितीतही वीज कंपनीकडून शेतकऱ्यांप्रती घेतली जात आहे. विहिरीत पाणी आहे पण ते काढण्यासाठी वीजच नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पर्यायाने खरिपापाठोपाठ शेतकऱ्यांचा रबी हंगामही बुडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असल्याने शासनाने ३३ टक्के वीज बिल माफी, सक्तीच्या कर्ज वसुलीला चाप लावला असला तरी बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष सक्ती करीत आहेत. त्यासाठी तुमचे कर्ज वाढेल, व्याज वाढेल, चक्रवाढ व्याज लागेल, पुढील वर्षी कर्ज मिळणार नाही, शेती जप्ती होईल, अशी भीती दाखविली जात आहे. या दुष्काळी स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने केंद्राकडे साडेचार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. तशी घोषणाही झाली. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटींच्या या पॅकेजकडे लक्ष लागले आहे. या पॅकेजमधून मदत वाटप करताना नेमके कोणते निकष लावले जातील हे मात्र स्पष्ट नाही. (जिल्हा प्रतिनिधी)