शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

VIDEO : वृक्षसंवर्धनासाठी बाप-लेकाचा पुढाकार

By admin | Updated: April 8, 2017 12:27 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 8 - हरितनगर करावयाचे असल्यास लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या संकल्पनेतूनच वाशिम ...

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 8 - हरितनगर करावयाचे असल्यास लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या संकल्पनेतूनच वाशिम येथील शिक्षक रमेश दाभाडे व त्यांचा मुलगा रोहित यांनी भर उन्हाळ्यात स्वत:चे बोअरमधील पाण्याद्वारे शहरातील झाडे जगवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. बाप लेकाच्या या उपक्रमाने वाशिम शहरातील दत्त नगर हे आता हरितनगर होण्याचा मार्गावर कात टाकत आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

कुठलाही उपक्रम यशस्वी करावयाचा असेल, तर त्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. सामाजिक उपक्रमात जनतेचा सहभाग असल्याशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. निसगार्चे आपण शत्रू असून, आपण त्याचा ऱ्हास करीत आहोत. प्रत्येक नागरिकाचे भावनिक नाते जागृत व्हायला हवे असा संदेशच वाशिम येथील शिक्षक दाभाडे व त्यांच्या मुलाने समाजाला दिला आहे.

सद्या उन्हाळयाचे दिवस असल्याने लावलेले झाडे सुकून जावू नये याकरिता दत्तनगर लाखाळा परिसरातील रमेश दाभाडे व रोहीत रमेश दाभाडे हे बाप-लेक चक्क घरुन सायकलने पाणी आणून दररोज संध्याकाळी झाडांना देत आहेत. रमेश दाभाडे बाकलीवाल शाळेमध्ये शिक्षक असून त्यांचा मुलगा इयत्ता पाचवीचे शिक्षण घेत आहे. वृक्षसंगोपन करण्याचा या बापलेकाच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केलं जात आहे. परिसरातील २० ते २५ झाडांना ते दररोज पाणी देऊन जगवण्याचे काम करीत आहेत.

शहरात इमारती खूप सुंदर आहेत, पण इमारतीसमोर पर्यावरण संतुलन करणाऱ्या गोष्टी नाहीत, नेमकी ही गोष्ट हेरून या बाप लेकांनी वृक्षसंवर्धनासाठी पाऊल उचलले. आपल्या पूर्वजांनी जी झाडे लावली, त्यावर आपण जगत आहोत. आपण झाडे लावली, तर आपली पुढील पिढी जगेल. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करायला हवा. परसबाग योजना विलीन होत चालली आहे. झाडे ही सजीव आहेत, त्यांना जगू द्या. वृक्ष संवर्धनात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही दाभाडे यांनी केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम प्रत्येकजण भोगत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षसंवर्धन व्हायला हवे, असे ते म्हणाले.

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"आई - वडिलांचा आदर्श घेत आपण हे कार्य अनेक वर्षांपासून राबवत आहोत. अनेक झाडे ज्यांना आपण पाणी दिली ती मोठी झाली आहेत. सर्वांनीच  "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" हे राष्ट्रसंतांचे विचार अंमलात आणल्यास सर्वत्र हिरवळ पसरल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता मानसिकतेची आवश्यकता आहे एवढे मात्र नक्की- रमेश दाभाडेशिक्षक , वाशिम

https://www.dailymotion.com/video/x844v59