शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

VIDEO - थेट मालविक्रीमुळे शेतक-यांना दुप्पट फायदा

By admin | Updated: July 12, 2016 13:46 IST

फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विकण्यास सरकारने शेतक-यांना परवानगी दिल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ -  फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विकण्यास सरकारने शेतक-यांना परवानगी दिल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतक-यांकडून घेतली जाणारी सहा टक्के अडत वसुल करण्यास व्यापा-यांना बंदी घातल्याने शेतक-यांना पुर्वीपेक्षा दुप्पट फायदा मालाची विक्री करताना होत आहे. शेतक-यांना रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना माफक दरात फळे-भाजीपाला मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडुन मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. 
बाजार समिती कायद्यातून फळे, भाजीपाला वगळल्यानंतर अडतबंदी झाल्याच्या निषेधार्थ पुणे  कृषी Þउत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यांनी सोमवार पासुन बंद पुकारला आहे. त्यामुळे शेतक-यांनी स्वत:च फळे व भाजीपाल्याची विक्री केली. 
  शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत मंगळवारी पहाटेपासूनच शेतक-यांची लगबग दिसत होती .  शेतकºयांचीअडत,हमाली, तोलाई मापाई व इतर कारणास्तव कापले जाणारे पैसे वाचले त्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंदाचे भाव दिसत होते. शेतक-यांना फळ व भाजीपाला विक्र मध्ये आज दुप्पट भाव  मिळत होता. ग्राहकाला फळे भाजीपाला थेट विक्री होत असल्यामुळे  ग्राहकाशी थेट संपर्क येत असल्यामुळे शेतक-यांना अडत तोलाइ मापाइचा भुर्दंड शेतक-यांना आज सोसावा लागला नाही. सकाळी  सातपर्यंतच  शेतक-यांच्या सगळ्या मालाचा उठाव झाला.  
अडत बंदीमुळे शेतक-यांचा नफा होत असुन शेतमालाला मनासारखा भाव मिळत आहे, टॉमॅटोच्या प्रत्येक  पंचवीस किलो कॅरेटला सातशे ते आठशे रूपये भाव मिळत आहे. तसेच कॅरेट मागे तीस ते चाळीस रूपये बचत होत आहे. बारामतीहुन टॉमेटो विक्रीला घेवुन आलेले शेतकरी संदीप जगताप म्हणाले. 
 अडतबंदीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होणार आहे. भाजीपाला खरेदी मध्ये ग्राहकाचे किलोमागे दहा ते पंधरा रूपये वाचतात .  सहा टक्के अडत व दोन टक्के हमाली वाचल्यामुळे आनंदी आहे.   शिरूरहुन आलेले भाजीपाला विक्रीसाठी घेवुन आलेले शेतकरी रंगनाथ पवार म्हणाले. 
 अडतबंही शेतक-यांच्या फायद्याची असल्याने शेतक-यांनी स्वत: मालविक्री साठी ठाम राहीले पाहीजे अडत बंदीमुळे शेतक-यांना त्यांच्या मालाचा अचुक भाव कळतो, वजन मापे कळतात त्यात होणारी फसवणुक आडतबंदी मुळे होणार नाही त्यामुळे शासनाता हा निर्णय स्वागतार्ह आहे. कांद्याला पंन्नास किलो मागे पंन्नास रूपये वाटले त्यामुळे आनंदी आहे असे कांदा विक्री साठी घेवुन आलेले दामोदर शेवाळे म्हणाले. 
  माळशिरसवरुन विक्रीसाठी वांगी घेऊन आलेले शेतकरी अर्जुन रुपन्वर म्हणाले, अडत पद्धती असताना एका कॅरेट मागे केवळ दोनशे रुपये मिळायचे, त्यामध्ये वाहतुक खर्च पस्तीस रुपये प्रति कॅरेट. पुर्ण खर्च वगळता हातात केवळ दिडशे रुपये मिळत होते. आता मात्र प्रति कॅरेट कमीत कमी पाचशे रुपये मिळत आहेत. सरकारची अशीच मेहरबानी राहिली तर बळीराजा आत्महत्येचा विचार सुद्धा करणार नाही. 
 बारामतीचे रविंद्र गाडवी म्हणाले, पुर्वी कांदा, बटाटा, भाजीपाला, टोमॅटो यासह मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक बाजार समित्यात झाल्यावर बड्या व्यापाºयांनी कोंडी करुन त्या मालाचे भाव पाडायचे आणि शेतकºयांची कोंडी करायची, असे प्रकार बाजार समितीत सर्रास सुरु होते. अशा बाबींना अडतबंदी मुळे चांगलाच चाफ बसला आहे.
 वडकी भागातून आलेले शेतकरी भिवाजी कोळपे म्हणाले, पुर्वी एक भाजीची पेंडी पंधरा रुपयाला विक ली गेली तर अडत सहा टक्के व हमाली दोन टक्के अशी एकुण आठ टक्के रक्कम कापली जात होती. आता मात्र संपुर्ण फायदा आम्हाला होत आहे. शिवाय हमालीची कामे स्वत: केल्याने त्याचे सुद्धा पैसे वाचत आहेत. 
 
 
शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या अडतबंदीचे स्वागत व शेतक-यांना संरक्षण देण्याच्या हेतुने शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालटकर यांनी मोर्चा काढुन जोरदार घोषणाबाजी केली. शेतक-यांनी खचून न जाता आपला शेतमाल विकावा व स्वत: नफा कमवावा असे आव्हान केले. यावेळी तोलणार संघटनेने या अंदोलनाला पाठिंबा घोषीत केला.  शेतक-यांना मदत म्हणून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपले काम सुरळीत चालू ठेवले.