शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा संकटात

By admin | Updated: December 1, 2014 00:51 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे.

दुष्काळाच्या झळा : ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आतनागपूर : यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रबी हंगामात पीक येण्याची शाश्वती नाही. या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आस हवालदिल शेतकऱ्यांना लागली आहे.सोयाबीन, धान व संत्र्याचे पीक बुडाले आहे. कापसाला उतारा नाही, त्यातच कवडीमोल भावाने कापसाची खरेदी सुरू आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १६४५ पैकी ५२५ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अद्याप अहवाल आलेला नाही. या अहवालानंतर दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसोबच जमिनीची हानी झाली होती. मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली होती. जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारकडून मदत मिळालेली नाही. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत पंचनाम्याची गरज राहणार नाही. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा सरसकट सर्व गावांनाच दुष्काळी गावे जाहीर करून तेथे मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीक कापणी प्रयोगावरून नुकसानीचा अंदाजपीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरून नुकसानीचा अंदाज काढला जातो. यात कृषी व महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. खरीप हंगामातील हा अहवाल अद्याप यावयाचा आहे. सोयाबीनचा हंगाम संपला आहे. या पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. धानाची काढणी पूर्णपणे व्हायची असून कपाशीचे पीक अद्याप उभे असल्याने या पिकाच्या कापणीचा अहवाल येण्याला विलंब आहे. या अहवालावरून पैसेवारी निश्चित केली जाते. यावरून दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील शहरी भागातही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार आहे. यासाठी नगरपालिका आणि नगर पंचायतींना नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषदांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. दोन लाख हेक्टरातील पीक बुडालेखरीप हंगामात जिल्ह्यात ५,०९,९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,०००, सोयाबीन १,९२,५०० तर धानाची ८५,००० हेक्टर लागवड करण्यात आली होती. याचा विचार करता जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पीक बुडाले आहे. रबी हंगामालाही याचा फटका बसला असून, १,४४,६३० पैकी ५,६८९३ हेक्टर क्षेत्रात रबी हंगामात पेरणी झाली आहे. यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. पिण्याच्या पाण्याची समस्यादरवर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५०० ते ६०० गावांत कमी-अधिक प्रमाणात टंचाई भासते. यंदाच्या हंगामात पाऊ स कमी झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. उपायोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे.