शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा संकटात

By admin | Updated: December 1, 2014 00:51 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे.

दुष्काळाच्या झळा : ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आतनागपूर : यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रबी हंगामात पीक येण्याची शाश्वती नाही. या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आस हवालदिल शेतकऱ्यांना लागली आहे.सोयाबीन, धान व संत्र्याचे पीक बुडाले आहे. कापसाला उतारा नाही, त्यातच कवडीमोल भावाने कापसाची खरेदी सुरू आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १६४५ पैकी ५२५ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अद्याप अहवाल आलेला नाही. या अहवालानंतर दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसोबच जमिनीची हानी झाली होती. मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली होती. जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारकडून मदत मिळालेली नाही. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत पंचनाम्याची गरज राहणार नाही. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा सरसकट सर्व गावांनाच दुष्काळी गावे जाहीर करून तेथे मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीक कापणी प्रयोगावरून नुकसानीचा अंदाजपीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरून नुकसानीचा अंदाज काढला जातो. यात कृषी व महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. खरीप हंगामातील हा अहवाल अद्याप यावयाचा आहे. सोयाबीनचा हंगाम संपला आहे. या पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. धानाची काढणी पूर्णपणे व्हायची असून कपाशीचे पीक अद्याप उभे असल्याने या पिकाच्या कापणीचा अहवाल येण्याला विलंब आहे. या अहवालावरून पैसेवारी निश्चित केली जाते. यावरून दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील शहरी भागातही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार आहे. यासाठी नगरपालिका आणि नगर पंचायतींना नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषदांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. दोन लाख हेक्टरातील पीक बुडालेखरीप हंगामात जिल्ह्यात ५,०९,९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,०००, सोयाबीन १,९२,५०० तर धानाची ८५,००० हेक्टर लागवड करण्यात आली होती. याचा विचार करता जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पीक बुडाले आहे. रबी हंगामालाही याचा फटका बसला असून, १,४४,६३० पैकी ५,६८९३ हेक्टर क्षेत्रात रबी हंगामात पेरणी झाली आहे. यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. पिण्याच्या पाण्याची समस्यादरवर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५०० ते ६०० गावांत कमी-अधिक प्रमाणात टंचाई भासते. यंदाच्या हंगामात पाऊ स कमी झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. उपायोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे.