शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाची लाट

By admin | Updated: February 24, 2017 06:19 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम

नंदकिशोर पाटील / मुंबईलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम असल्याचे राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालावरून दिसून येते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, त्याचीच पुनर्रावृत्ती या निवडणुकीत झाली. नोटाबंदी, शेतीमालाचे पडलेले भाव, सहकारी संस्थांवर सरकारने आणलेला अंकुश आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा जबर फटका राज्यातील सत्ताधारी भाजपाला बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मतदारांनी सगळे राजकीय अंदाज धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणले. भाजप-शिवसेनेच्या लाटेत सांगली, लातूर, वर्धा हे काँग्रेसचे बालेकिल्ले अक्षरश: भुईसपाट झाले. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादीला २५ पैकी ११ तर शिवसेना-भाजपाला १३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. सर्वाधिक ४११ जागा जिंकून भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून गतवेळी क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादीला ३५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शेकापला रायगडची जिल्हा परिषद मिळाली आहे.मागील २०१२ च्या निवडणुकीत भाजपला सातारा, सांगली, सोलापूर व हिंगोली या जिल्हा परिषदांमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. तिथे जोरदार मुसंडी मारत या पक्षाने सांगलीत परिवर्तन घडवून आणले, तर सोलापूरमध्ये १५ आणि हिंगोलीत दहा जागा  जिंकल्या. शिवाय, लातूर वर्धा, जळगाव, बुलडाणा आणि चंद्रपूर या जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला सातारा, सांगली व सोलापूरमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती.तिथे आता सेनेने खाते उघडले आहे. एवढेच नव्हे, तर रत्नागिरी, रायगड , औरंगाबाद आणि नाशिकमध्ये भाजपाच्या मदतीने सेनेला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सांगली आणि लातूर हे दोन मोठे गड ढासळले. सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील भाडणाचा फटका बसला. तर लातुरात मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाचे कमळ फुलवून काँग्रेसला धोबीपछाड दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिंकून काँग्रेसची लाज राखली. २०१२ च्या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेत एकही उमेदवार निवडून आणता आलेला नव्हता, यावेळी सहा जागा मिळाल्या आहेत. गतवेळी जिल्हा परिषदांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बीड, पुणे आणि सातारा या तीनच जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राखता आली. या निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तर परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर आणि गडचिरोली अशा आठ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळू शकते. सांगलीत सत्तांतर सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट सत्तेपर्यंत मजल मारली. पुण्यात राष्ट्रवादीपुणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी विश्वास दाखवत जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात दिल्या आहेत.साताऱ्यात उदयनराजेकाँग्रेस, भाजप, शिवसेना या पारंपरिक शत्रूंना तोंड देत असतानाच पक्षाचेच खासदार उदयनराजेंविरोधात संघर्ष करण्याची पाळी आलेल्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपले पाशवी बहुमत सिद्ध केले. पंकजा मुंडे यांना धक्काराज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जोरदार धक्का बसला आहे. परळी पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नगरपालिकेपाठोपाठ पंचायत समितीत एकहाती सत्ता आणली. अजित पवार यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे परळीत राष्ट्रवादीला फटका बसेल , असे मानण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही.राणेंनी गड राखलाकाँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.