शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

विधानसभेच्या इतिहासात तिस:यांदा राष्ट्रपती राजवट

By admin | Updated: September 28, 2014 01:58 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या 77 वर्षाच्या इतिहासात आज तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू होते आहे.

वसंत भोसले - कोल्हापूर
महाराष्ट्र विधानसभेच्या 77 वर्षाच्या इतिहासात आज तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू होते आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष अल्पमतात येऊन राजकीय अस्थिरता निर्माण होऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही पहिल्यांदाच वेळ आली आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात एकदा आणि 198क्मध्ये पुलोद सरकार बहुमतात असतानाही बरखास्त केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 
राज्यात गेली 15 वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.  बाराव्या  विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आघाडीत जागावाटपावरून मतभेद झाले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने परवा (गुरुवारी) रात्री सरकारचा पाठिंबा काढून घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. या सरकारला कॉँग्रेसच्या 82 आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या 62 आमदारांचा तसेच 13 अपक्ष आमदारांचे पाठबळ होते. जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे आघाडीचे सरकार अखेर अल्पमतात आले. 
महाराष्ट्र विधानसभेचे हे 77वे वर्ष आहे. 19 जुलै 1937 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे पहिले सरकार सत्तेत आले होते. त्या वेळी ‘मुंबई प्रांत विधानसभा’ असे म्हटले जात असे. 1939मध्ये सुरू झालेल्या दुस:या महायुद्धामध्ये भारताला ब्रिटिशांनी युद्धराष्ट्र म्हणून घोषित केले. त्याच्या निषेधार्थ  खेर मंत्रिमंडळाने 3क् ऑक्टोबर 1939 रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल लॉरेन्स रॉजर लुम्लेह यांनी मुंबई प्रांतात राज्यपाल राजवट लागू केली होती. ती सलग 7 वर्षे 5 महिने 1946मध्ये मुंबई प्रांत विधानसभेची निवडणूक होईर्पयत अस्तित्वात होती. फेब्रुवारी 1946मध्ये विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या आणि बाळासाहेब खेर यांच्याच नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे सरकार 3क् मार्च 1946 रोजी अधिकारावर आले. यामुळे विधानसभेच्या इतिहासामध्ये 1939 ते 1946 या 7 वर्षात मुंबई प्रांतात पहिल्यांदा राज्यपाल राजवट होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातत्याने स्थिर आणि बहुमतातील सरकार अधिकारावर होते. जनता पक्षाची राजवट जाऊन केंद्रात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर 198क्मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार 17 फेब्रुवारी 198क् रोजी बरखास्त करण्यात आले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्या वेळी राज्याच्या राज्यपालपदी सादिक अली होते. ही राजवट विधानसभेची निवडणूक होईर्पयत राहिली. मे अखेर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळाले. आणि 9 जून 198क् रोजी राष्ट्रपती राजवट उठून बॅ. अ.र. अंतुले यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्रात आजवर दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्हीवेळी सत्ताधारी पक्ष बहुमतात होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध खेर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता; तर 198क्मध्ये बहुमतात  असलेले  पुलोद सरकार राजकीय कारणास्तव बरखास्त करण्यात आले होते. या वेळी तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू करीत असताना कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार होते. पण, ते अल्पमतात आल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्रात तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली. या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात अनेकवेळा राजकीय उलथापालथी झाल्या असल्या तरी, सरकार अस्थिर किंवा अल्पमतात केव्हाच आले नव्हते. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने ते प्रथमच अल्पमतात आले आहे.