शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

By admin | Updated: February 28, 2016 02:27 IST

तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे.

- सुदीप गुजराथी, नाशिकतमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे. अनेक होतकरू तरुण-तरुणींना निव्वळ जातीच्या दाखल्याअभावी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतावे लागत असल्याने इच्छा असूनही त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तमाशा कलावंतांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांमुळे निदान आपली मुले तरी या व्यवसायात पडू नयेत, असे अनेकांना वाटते. हे कलावंत वर्षातले सहा-आठ महिने फिरतीवर असल्याने दौऱ्यातच त्यांची लग्ने जुळतात आणि त्यांना मुलेही होतात. या कलावंतांत जवळपास सगळेच विवाह आंतरजातीय होतात. अनेकांच्या घरातून लग्नाला विरोध असतो. दोघांचे कुटुंबीय हा विवाह स्वीकारत नसल्याने घरातून कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकदा पुरुष विवाहानंतर महिलांना वाऱ्यावर सोडून देतात. अशा महिला आपल्या मुलांना शाळेत घालताना त्याच्या नावापुढे पतीचे नाव लावतात; मात्र जात स्वत:ची लावतात. या मुला-मुलींना दहावीपर्यंत अडचण जाणवत नाही. महाविद्यालयीन व उच्चस्तरीय शिक्षणात मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य असतो. जातीचा दाखला मिळवण्यासाठी अनुसूचित जाती (एससी) व जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना सन १९४९ पूर्वीचा, भटक्या-विमुक्तांना (एनटी) सन १९६१ पूर्वीचा, तर इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सन १९६७ पूर्वीचा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मतारीख व जातीचा पुरावा आवश्यक असतो. या मुलांच्या पित्याचाच ठावठिकाणा नसल्याने त्यांच्याकडे सध्याची कागदपत्रेही नसतात, तर पन्नास वर्षांपूर्वीची कागदपत्रे कोठून मिळवावीत, असा प्रश्न त्यांना पडतो. अनेकदा शिक्षणाचे शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने तमाशा कलावंतांच्या मुलांवर अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे. राज्यात तमाशाची १० ते १५ मोठी मंडळे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५-२० लहान पार्ट्या आहेत. या सगळ्या कलावंतांच्या मुलांची हीच व्यथा असून, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी किमान ५० वर्षे पूर्वीच्या पुराव्याची अट तरी रद्द करावी, अशी मागणी होत आहे. इच्छा असूनही... सरकार दरबारी हेलपाटे मारल्यावर, जातपडताळणी समितीने गावात येऊन खात्री केल्यानंतर माझ्या मुलांना जातीचा दाखला मिळाला; पण वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशीच तऱ्हा असंख्य कलावंतांच्या मुला-मुलींची आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येतात. सरकारने त्यांच्यासाठी काही अटी शिथिल कराव्यात.- सोनाली महाडिक, नांदूरशिंगोटे