शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

By admin | Updated: February 28, 2016 02:27 IST

तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे.

- सुदीप गुजराथी, नाशिकतमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे. अनेक होतकरू तरुण-तरुणींना निव्वळ जातीच्या दाखल्याअभावी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतावे लागत असल्याने इच्छा असूनही त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तमाशा कलावंतांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांमुळे निदान आपली मुले तरी या व्यवसायात पडू नयेत, असे अनेकांना वाटते. हे कलावंत वर्षातले सहा-आठ महिने फिरतीवर असल्याने दौऱ्यातच त्यांची लग्ने जुळतात आणि त्यांना मुलेही होतात. या कलावंतांत जवळपास सगळेच विवाह आंतरजातीय होतात. अनेकांच्या घरातून लग्नाला विरोध असतो. दोघांचे कुटुंबीय हा विवाह स्वीकारत नसल्याने घरातून कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकदा पुरुष विवाहानंतर महिलांना वाऱ्यावर सोडून देतात. अशा महिला आपल्या मुलांना शाळेत घालताना त्याच्या नावापुढे पतीचे नाव लावतात; मात्र जात स्वत:ची लावतात. या मुला-मुलींना दहावीपर्यंत अडचण जाणवत नाही. महाविद्यालयीन व उच्चस्तरीय शिक्षणात मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य असतो. जातीचा दाखला मिळवण्यासाठी अनुसूचित जाती (एससी) व जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना सन १९४९ पूर्वीचा, भटक्या-विमुक्तांना (एनटी) सन १९६१ पूर्वीचा, तर इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सन १९६७ पूर्वीचा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मतारीख व जातीचा पुरावा आवश्यक असतो. या मुलांच्या पित्याचाच ठावठिकाणा नसल्याने त्यांच्याकडे सध्याची कागदपत्रेही नसतात, तर पन्नास वर्षांपूर्वीची कागदपत्रे कोठून मिळवावीत, असा प्रश्न त्यांना पडतो. अनेकदा शिक्षणाचे शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने तमाशा कलावंतांच्या मुलांवर अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे. राज्यात तमाशाची १० ते १५ मोठी मंडळे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५-२० लहान पार्ट्या आहेत. या सगळ्या कलावंतांच्या मुलांची हीच व्यथा असून, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी किमान ५० वर्षे पूर्वीच्या पुराव्याची अट तरी रद्द करावी, अशी मागणी होत आहे. इच्छा असूनही... सरकार दरबारी हेलपाटे मारल्यावर, जातपडताळणी समितीने गावात येऊन खात्री केल्यानंतर माझ्या मुलांना जातीचा दाखला मिळाला; पण वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशीच तऱ्हा असंख्य कलावंतांच्या मुला-मुलींची आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येतात. सरकारने त्यांच्यासाठी काही अटी शिथिल कराव्यात.- सोनाली महाडिक, नांदूरशिंगोटे