शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

भात बियाणे खरेदी करताना घ्या काळजी

By admin | Updated: May 21, 2016 01:45 IST

हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे.

वडगाव मावळ : भात हे मावळ विभागातील प्रमुख पीक आहे. त्यातच हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे. यामुळे शेतकरी भात पीक नियोजनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी भात बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. भाताच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी. बियाणे मान्यताप्राप्त व योग्य प्रकारचेच खरेदी करावे. बियाणाच्या पिशवीवर लेबल व सील असावे. लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी. खरेदीची पावती घ्यावी. लेबलवर बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, आनुवंशिक शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख असेल, याची खात्री करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळात भाताचे पारंपरिक व सुधारित वाणांचा वापर शेतकरी करतात. प्रामुख्याने इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती, कर्जत-३, कर्जत-५ आदी येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांचा शेतकरी वापर करतात. यापैकी काही वाणांची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यातील शासनाच्या वडगाव मावळ संशोधन केंद्रात मिळणाऱ्या इंद्रायणी वाणांचे प्रसारण हे १९८७ रोजी झाले असून, हे वाण लांब, पातळ सुवासिक दाण्याची निमगरवी जात असून, करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक असे हे वाण आहे. याचे उत्पादन हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल मिळते. फुले समृद्धी हा वाण २००७ साली लागवडीखाली आणलेला वाणही इंद्रायणीप्रमाणे भरघोस उत्पादन देतो. तेदेखील लांब आणि पातळ असून, करपा, खोड रोगास मध्यम प्रतिकारक आहे. (वार्ताहर)>योग्य बीजप्रक्रिया आवश्यकबियाणास योग्य ती बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. बी निरोगी व वजनदार असावे. बियाणास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची म्हणजेच १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करावे. त्यात बी बुडवावे. पाण्यावर तरंगणारे हलके बी नंतर काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक तसेच अनुजीवनाशकाची बीजप्रक्रिया करावी. करपा, पर्ण, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रमाणित औषध २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बी आठ तास भिजवावे. >गादी वाफ्यावर करावी पेरणीखरिपासाठी भाताची पेरणी २५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. पेरणीकरिता १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करणे शक्य नसेल, तर रोप तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडून चारी बाजूने खोलगट चरी काढावी. त्यामुळे जास्त पाऊस झाला, तरी पाण्याचा निचरा होईल. एक हेक्टरवर भात लागवडीसाठी १० आर क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. >शेणखत किंवा कंपोस्टचा वापरवाफे तयार करताना १ आर क्षेत्रास २५० किलोग्रॅम शेणखत किवा कंपोस्ट खत आणि १ किलो आवश्यक रासायनिक खत चांगल्या प्रकारे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपाच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति आर १ किलो रासायनिक खत द्यावे. पावसाअभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडली, तर प्रति आर क्षेत्रातील रोपास १ किलो रासायनिक खताचा तिसरा हप्ता द्यावा.