शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात थरारक युद्ध अनुभवांचे कथन

By admin | Updated: February 4, 2017 19:50 IST

१९६५ची लढाई झाली, ७१चे युद्ध झाले, कारगील घडले. भारतीय लष्कराने प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 4 -  १९६५ची लढाई झाली, ७१चे युद्ध झाले, कारगील घडले. भारतीय लष्कराने प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर दिले. परंतु भारतावर वाईट नजर ठेवणाºया शत्रूंचा धोका अद्याप संपलेला नाही. सीमेवर तैनात भारतीय लष्कर असो की सीमेआत सुरक्षा सांभाळणारे  पोलीस. प्रत्येकांसाठी रात्रंदिन युद्वाचा प्रसंग अजूनही कायमच आहे, अशी भावना माजी लष्करी अधिकाºयांनी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘युद्धस्थ कथा’ या प्रत्यक्ष रणभूमीवरील अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या चर्चेत निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन व कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील सहभागी झाले होते. युद्धकाळातील आपले अनुभव सांगताना निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, भारतीय सेनेने आपल्या पराक्रमाने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. भारताचा सैनिक म्हणून मला हे युद्ध अनुभवता आले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. केवळ १४ दिवसात आम्ही शत्रूला पाणी पाजले. 
परंतु नंतर घडलेल्या कारगील युद्धाची स्थिती फार वेगळी होती. शत्रू वर होता त्यामुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु भारतीय वायूसेनेने आॅपरेशन सफेद सागरचे योग्य नियोजन करून अचूक बॉम्बहल्ले केले आणि शत्रूला शस्त्र टाकावे लागले.  निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे म्हणाले, लष्कर युद्धाचे सर्व नियोजन करून मैदानात जात असते. परंतु शत्रू आणि निसर्ग दोघेही त्या ल्ष्कराला नियोजनाप्रमाणे युद्ध लढू देत नाहीत. पित्रे यांनी युद्धावर लिहिलेल्या. एका पुस्तकात त्यांनी शहीद झालेल्या पाकिस्तानी सैनिकाचे कौतुक केले आहे, हे कसे असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, शत्रू जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत तो शत्रू असतो. तो ठार झाला तर तो युद्धातला शहीद ठरतो. 
तो आपला शत्रू असला तरी त्याच्या देशासाठी लढताना शहीद झालेला असतो. योद्धाला कधीही भौगोलिक सीमा नसतात, अशा शब्दात त्यांनी ती भूमिका कशी योग्य होती ते सांगितले. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी आॅपरेशन ब्लू स्टारचा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले, हे आॅपरेशन फार कठीण काम होते कारण ते देशाच्या आत आणि पवित्र सुवर्ण मंदिरात करायचे होते. समोर शत्रू म्हणून उभा ठाकलेला नाविरसिंग एकेकाळी भारतीय लष्कराचा प्रशिक्षक होता. त्यामुळे त्याला लष्कराचे डावपेच माहीत होते. परंतु भारतीय लष्कराने या आॅपरेशनमध्ये अलौकिक पराक्रम गाजवित मंदिराला मुक्त केले. 
 
अन जेवण सोडून बंदूक हातात घेतली 
२६/११ ची ती काळरात्र अजूनही डोळयापुढून पुढे सरकत नाही. मी नुकताच जेवायला बसलो होतो. हल्ल्याची बातमी कळली आणि जेवण सोडून पिस्टल घेत घराबाहेर पडलो, असा थरारक अनुभव कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ९.४० ला अतिरेकी हल्ला झाला आणि ९.५१ला मी हॉटेल ताजमध्ये होतो. हेमंत करकरेंपासून हवालदार ओंबळेपर्यंत सर्वच जण हातात असेल त्या शस्त्रासह अतिरेक्यांशह लढत होतो. प्रसंग कठीण होता. परंतु पोलिसांचे योग्य नियोजन व धैर्याच्या बळावर आम्ही चारही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. असे बाहेरचे हल्ले सुरू असतानाच देशात सामाजिक सलोखा व सुरक्षितता सांभाळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या प्रयत्नात मी पोलिस खात्याच्या चौकटी बाहेर काही उपक्रम राबवित आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती उत्सवातील डॉल्बी साऊंडचा आवाज कमी झाला आहे. निर्भया उपक्रमाने महिलांना सुरक्षित वाटायला लागले आहे. प्रत्येक वाईट गोष्टीचा पराभव दंडुक्याच्या बळावर होऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.