शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

साहित्य संमेलनात थरारक युद्ध अनुभवांचे कथन

By admin | Updated: February 4, 2017 19:50 IST

१९६५ची लढाई झाली, ७१चे युद्ध झाले, कारगील घडले. भारतीय लष्कराने प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 4 -  १९६५ची लढाई झाली, ७१चे युद्ध झाले, कारगील घडले. भारतीय लष्कराने प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर दिले. परंतु भारतावर वाईट नजर ठेवणाºया शत्रूंचा धोका अद्याप संपलेला नाही. सीमेवर तैनात भारतीय लष्कर असो की सीमेआत सुरक्षा सांभाळणारे  पोलीस. प्रत्येकांसाठी रात्रंदिन युद्वाचा प्रसंग अजूनही कायमच आहे, अशी भावना माजी लष्करी अधिकाºयांनी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘युद्धस्थ कथा’ या प्रत्यक्ष रणभूमीवरील अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या चर्चेत निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन व कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील सहभागी झाले होते. युद्धकाळातील आपले अनुभव सांगताना निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, भारतीय सेनेने आपल्या पराक्रमाने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. भारताचा सैनिक म्हणून मला हे युद्ध अनुभवता आले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. केवळ १४ दिवसात आम्ही शत्रूला पाणी पाजले. 
परंतु नंतर घडलेल्या कारगील युद्धाची स्थिती फार वेगळी होती. शत्रू वर होता त्यामुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु भारतीय वायूसेनेने आॅपरेशन सफेद सागरचे योग्य नियोजन करून अचूक बॉम्बहल्ले केले आणि शत्रूला शस्त्र टाकावे लागले.  निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे म्हणाले, लष्कर युद्धाचे सर्व नियोजन करून मैदानात जात असते. परंतु शत्रू आणि निसर्ग दोघेही त्या ल्ष्कराला नियोजनाप्रमाणे युद्ध लढू देत नाहीत. पित्रे यांनी युद्धावर लिहिलेल्या. एका पुस्तकात त्यांनी शहीद झालेल्या पाकिस्तानी सैनिकाचे कौतुक केले आहे, हे कसे असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, शत्रू जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत तो शत्रू असतो. तो ठार झाला तर तो युद्धातला शहीद ठरतो. 
तो आपला शत्रू असला तरी त्याच्या देशासाठी लढताना शहीद झालेला असतो. योद्धाला कधीही भौगोलिक सीमा नसतात, अशा शब्दात त्यांनी ती भूमिका कशी योग्य होती ते सांगितले. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी आॅपरेशन ब्लू स्टारचा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले, हे आॅपरेशन फार कठीण काम होते कारण ते देशाच्या आत आणि पवित्र सुवर्ण मंदिरात करायचे होते. समोर शत्रू म्हणून उभा ठाकलेला नाविरसिंग एकेकाळी भारतीय लष्कराचा प्रशिक्षक होता. त्यामुळे त्याला लष्कराचे डावपेच माहीत होते. परंतु भारतीय लष्कराने या आॅपरेशनमध्ये अलौकिक पराक्रम गाजवित मंदिराला मुक्त केले. 
 
अन जेवण सोडून बंदूक हातात घेतली 
२६/११ ची ती काळरात्र अजूनही डोळयापुढून पुढे सरकत नाही. मी नुकताच जेवायला बसलो होतो. हल्ल्याची बातमी कळली आणि जेवण सोडून पिस्टल घेत घराबाहेर पडलो, असा थरारक अनुभव कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ९.४० ला अतिरेकी हल्ला झाला आणि ९.५१ला मी हॉटेल ताजमध्ये होतो. हेमंत करकरेंपासून हवालदार ओंबळेपर्यंत सर्वच जण हातात असेल त्या शस्त्रासह अतिरेक्यांशह लढत होतो. प्रसंग कठीण होता. परंतु पोलिसांचे योग्य नियोजन व धैर्याच्या बळावर आम्ही चारही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. असे बाहेरचे हल्ले सुरू असतानाच देशात सामाजिक सलोखा व सुरक्षितता सांभाळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या प्रयत्नात मी पोलिस खात्याच्या चौकटी बाहेर काही उपक्रम राबवित आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती उत्सवातील डॉल्बी साऊंडचा आवाज कमी झाला आहे. निर्भया उपक्रमाने महिलांना सुरक्षित वाटायला लागले आहे. प्रत्येक वाईट गोष्टीचा पराभव दंडुक्याच्या बळावर होऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.