शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

राज्य सरकारचा ‘नो रिप्लाय’

By admin | Updated: July 12, 2017 03:43 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते. त्यावरील पुढील सुनावणी ३ जुलैला होणार होती. मात्र, सरकारने कोणतेच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे याचिकेवर सुनवाणीच होऊ शकलेली नाही. दरम्यान, अन्य एका याचिकेप्रकरणीही सरकारने न्यायालयात उत्तर न दिल्याने सुनावणीची तारीख आॅक्टोबरमधील पडली आहे. ही तारीख लवकरची द्यावी, असा मागणी अर्ज १७ जुलैला न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांच्या वकिलामार्फत केला जाणार आहे. केडीएमसीत १ जून २०१५ ला २७ गावे समाविष्ट झाली. त्यानंतर या गावांसह केडीएमसीची निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू असताना ७ सप्टेंबर २०१५ ला सरकारने गावे वगळण्याची प्राथमिक अधिसूचना काढली. त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी रंगनाथ ठाकूर व इतर ११ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर ७ जून २०१७ ला सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सरकारला २७ गावे वगळण्याचा कालबद्ध कार्यक्रम ३० जूनला न्यायालयास सादर करावा. त्यावर ३ जुलैला सुनावणी केली जाईल, असे म्हटले होते. मात्र, सरकारने कालबद्ध कार्यक्रम सादर केलेली नाही. त्यामुळे ही याचिका न्यायालयात सुनावणीसाठी येऊ शकली नाही. संगणकीय प्रक्रियेनुसार या याचिकेच्या सुनावणीची तारीख आॅक्टोबरमध्ये दिली आहे. ही तारीख लांबची असल्याने जवळची तारीख मिळावी, यासाठी १७ जुलैला न्यायालयासमोर विनंती अर्ज करणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील अस्मिता सारंगधर यांनी दिली.२७ गावांप्रकरणी २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील व अन्य ५९ जणांनीही एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, सरकारने १४ मे २०१५ ला २७ गावे पालिकेत घेण्याचा अध्यादेश काढला. १ जूनला गावे महापालिकेत समाविष्ट झाली. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात सरकारने हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याची सुनावणी १२ मे पर्यंत सुरू होती. जवळपास आठशे-हजारपेक्षा जास्त हरकती सूचना होत्या. त्या विचारात न घेता अत्यंत घाईगडबडीत गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. मात्र, त्यावेळी सरकारने कोणतेच कारण दिले नाही. १९९५ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट केली होती. मात्र, गावांचा विकास होत नसल्याने पुन्हा ही गावे वगळावीत, यासाठी आंदोलने झाली. त्यामुळे सरकारने २००२ मध्ये गावे महापालिकेतून वेगळली. त्यानंतर १ जून २०१५ ला पुन्हा पालिकेत घेतली.सरकारचा वेळकाढूपणा : चंद्रकांत पाटीलरंगनाथ ठाकूर व अन्य ११ जण आणि चंद्रकांत पाटील व अन्य ५९ जणांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिकांसंदर्भात सरकारने कोणतेही उत्तर दिलेले नाही. सरकार वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे, असा आरोप याचिकाकर्ते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले, सरकारने काढलेला अध्यादेशच खोटा आहे. त्यांनी गावे समाविष्ट करताना बाधितांना विचारात घेतलेले नाही. याच मुद्यावर आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. यापूर्वी १५ मार्च २०१७ मध्ये याच याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने दोन आठवड्यांत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी निवडणुका आणि विधिमंडळाच्या कामकाजाचे कारण सरकारने पुढे केले होते. मार्चपासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात सरकारकडूनच चालढकल सुरू असल्याची बाब समोर आली आहे. गावे पुन्हा पालिकेत घेताना सरकारने बॉम्बे व्हिलेज अ‍ॅक्टचे पालन केलेले नाही, असा युक्तीवाद याचिकर्त्यांच्या वकील नेहा भिडे यांनी केला होता. त्यावरही सरकारने त्यांचे म्हणणे सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले होते.