शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By admin | Updated: July 10, 2017 01:48 IST

पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत. पूर्व भागातील पेरलेले बी उगवण्यासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७५०० हेक्टरवर भातची लागवड केली जाते. त्यासाठी ७०० हेक्टरवर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण भागात वळवाचे पाऊस झाल्यावरच धूळवाफेवर भाताचे बी पेरले जाते. मात्र, एप्रिल व मे महिन्यात वळवाचे एक दोन पाऊस पडले नाही, त्यामुळे भाताची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर जून महिन्यात १८ जूनला रिमझिम पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झालाच नाही. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना डोंगरातील झऱ्यांना पाणीच आले नाही. थाड्या फार प्रमाणात सुरूअसलेल्या पावसावर नीरादेवघर व भाटघर धरण भागातील शेतकऱ्यांनी भाताच्या लावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, मागील चार दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने खाचरातील पाणी कमी झाल्याने सुरू असलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा रखडल्या आहेत. पूर्व भागात पावसाअभावी उशिराने पेरलेले बी उगविण्यासाठी पावसाची गरज आहे.वेल्हे : तालुक्याच्या पूर्व भागातील अतिपावसाच्या वेळवंडी नदीखोऱ्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून, सतत चालू असणारी संततधार थांबून पावसाने उघडझाप करत बरसण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे भातलागणीवर काहीसा परिणाम होत आहे. तर वेल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भातलागणी खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.पुणे जिल्ह्यातील ‘प्रतिमहाबळेश्वर’ अशी वेल्हे तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरी ३००० ते ४००० मि.मि. इतक्या विक्रमी पावसाची नोंद होत असल्याने हा परिसर अतिवृष्टी क्षेत्रामधे समाविष्ट होतो. जून ते सप्टेंबर दरम्यान अखंडित पाऊस चालू असतो. यात प्रामुख्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील १८ गावे मावळ भागातील वेळवंडी नदी खोरे, मढेघाट परिसर, मोसे खोरे, पानशेत धरण क्षेत्र या भागात विक्रमी सरासरी ३५०० मि.मि. पाऊस पडतो. वेळवंडी नदीतील सर्व पाणी वाहत जाऊन भाटघर धरणाला मिळते. या धरणातील एकूण पाण्यापैकी ६०% पाणी वेळवंडी नदीतून धरणाला मिळते. तर तालुक्याच्या पूर्व भागातील तोरणा-राजगड किल्ले परिसर, कानंदी नदी खोरे या भागात दरवर्षी सरासरी २५०० मि.मि. पावसाची नोंद होते. आजअखेर वेल्हे तालुक्यात सरासरी ७५० मि.मि. पावसाची नोंद झाली असून, जुलैअखेर २००० मि.मि. पाऊस होणे अपेक्षित आहे. वेल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अद्याप सरासरी पाऊस न झाल्याने भातलागणीची कामे रखडली आहेत. वेल्हे, विंझर, मार्गासनी, दापोडे, अंबवणे या पंचक्रोशीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही काही ठिकाणी लागणी सुरू आहे.पश्चिम भागातील ओढ्याकाठच्या खाचरांना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे. मात्र माळरानावरील खाचरांना पाणीच नसल्याने लागवड करता येत नाही. तर पूर्व भागात पेरलेले बी उगविण्यसाठी पाणी देण्याची धडपड शेतकरी करत आहेत. एकतर पावसामुळे पेरणी उशिरा, लावण्या उशिराने होत असून, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पिकांवर होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या भाताच्या लागवडीसाठी पावसाची अत्यंत गरज असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या पाण्यावरच सदरची शेती अवलंबून असल्याने पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे.