शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By admin | Updated: July 10, 2017 01:48 IST

पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत. पूर्व भागातील पेरलेले बी उगवण्यासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७५०० हेक्टरवर भातची लागवड केली जाते. त्यासाठी ७०० हेक्टरवर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण भागात वळवाचे पाऊस झाल्यावरच धूळवाफेवर भाताचे बी पेरले जाते. मात्र, एप्रिल व मे महिन्यात वळवाचे एक दोन पाऊस पडले नाही, त्यामुळे भाताची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर जून महिन्यात १८ जूनला रिमझिम पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झालाच नाही. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना डोंगरातील झऱ्यांना पाणीच आले नाही. थाड्या फार प्रमाणात सुरूअसलेल्या पावसावर नीरादेवघर व भाटघर धरण भागातील शेतकऱ्यांनी भाताच्या लावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, मागील चार दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने खाचरातील पाणी कमी झाल्याने सुरू असलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा रखडल्या आहेत. पूर्व भागात पावसाअभावी उशिराने पेरलेले बी उगविण्यासाठी पावसाची गरज आहे.वेल्हे : तालुक्याच्या पूर्व भागातील अतिपावसाच्या वेळवंडी नदीखोऱ्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून, सतत चालू असणारी संततधार थांबून पावसाने उघडझाप करत बरसण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे भातलागणीवर काहीसा परिणाम होत आहे. तर वेल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भातलागणी खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.पुणे जिल्ह्यातील ‘प्रतिमहाबळेश्वर’ अशी वेल्हे तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरी ३००० ते ४००० मि.मि. इतक्या विक्रमी पावसाची नोंद होत असल्याने हा परिसर अतिवृष्टी क्षेत्रामधे समाविष्ट होतो. जून ते सप्टेंबर दरम्यान अखंडित पाऊस चालू असतो. यात प्रामुख्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील १८ गावे मावळ भागातील वेळवंडी नदी खोरे, मढेघाट परिसर, मोसे खोरे, पानशेत धरण क्षेत्र या भागात विक्रमी सरासरी ३५०० मि.मि. पाऊस पडतो. वेळवंडी नदीतील सर्व पाणी वाहत जाऊन भाटघर धरणाला मिळते. या धरणातील एकूण पाण्यापैकी ६०% पाणी वेळवंडी नदीतून धरणाला मिळते. तर तालुक्याच्या पूर्व भागातील तोरणा-राजगड किल्ले परिसर, कानंदी नदी खोरे या भागात दरवर्षी सरासरी २५०० मि.मि. पावसाची नोंद होते. आजअखेर वेल्हे तालुक्यात सरासरी ७५० मि.मि. पावसाची नोंद झाली असून, जुलैअखेर २००० मि.मि. पाऊस होणे अपेक्षित आहे. वेल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अद्याप सरासरी पाऊस न झाल्याने भातलागणीची कामे रखडली आहेत. वेल्हे, विंझर, मार्गासनी, दापोडे, अंबवणे या पंचक्रोशीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही काही ठिकाणी लागणी सुरू आहे.पश्चिम भागातील ओढ्याकाठच्या खाचरांना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे. मात्र माळरानावरील खाचरांना पाणीच नसल्याने लागवड करता येत नाही. तर पूर्व भागात पेरलेले बी उगविण्यसाठी पाणी देण्याची धडपड शेतकरी करत आहेत. एकतर पावसामुळे पेरणी उशिरा, लावण्या उशिराने होत असून, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पिकांवर होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या भाताच्या लागवडीसाठी पावसाची अत्यंत गरज असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या पाण्यावरच सदरची शेती अवलंबून असल्याने पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे.