शेगाव: शेतकरी संघटनेचे सर्वे- सर्व्हा शरद जोशी यांची बुधवारी न्यायालयाने जामीनावर सुटका केली सन २0१0 साली शेगाव येथे एका कार्यक्रमात चिथावणी देणारे भाषण केल्याने शेतकर्यांनी शेगावात रेल रोको केल्याच्या त्यांच्यासह ९ जणांवर आरोप आहे. ११ ऑटोंबर २0१0 साली शेगाव येथे शेतकरी संघटनेने शेतकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. स्व.गजाननदादा पाटील मार्के ट यार्डात पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या भाषणातुन शेतकर्यांना लगेच रेल रोको सुचविल्या नंतर हजारो शेतकर्यांनी शेगावचे रेल्वेस्थानक गाठुन ३ तास रेल रोको केले. या प्रकरणात शरद जोशी यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वामनराव चटप, रवि देवांग, नामदेव जाधव, अनिल घनवत, सरोज काटीकर, शैलेजा देशपांडे आणि ै कैलास फाटे अशा ९ जणांविरुध्द शहर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तेव्हा पासुन या प्रकरणातील ४ आरोपी पोलीसांच्या रेकॉर्डवर फरार होते. बुधवारी या फरार आरोपींपैकी शरद जोशी, वामनराव चटप, रवि देवांग हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. समाधान बनकर रा.वरखेड यांनी शरद जोशी यांची जामीन घेतली. या प्रकरणात अनिल घनवत रा.श्रीगोंदा जि.अहमदनगर हे आरोपी सद्या फरार घोषीत केले आहेत.
शरद जोशीं यांची जामिनावर सुटका
By admin | Updated: July 10, 2014 23:22 IST